शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

इंदापुरातील २२ गावांच्या तोंडचे पाणी पळणार !

By admin | Updated: October 24, 2016 01:21 IST

जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकरी संतप्त झाले आहेत

बावडा : जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या १ आणि २ उपविभागीय कार्यालयांचे सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतरित केला आहे. त्यानुसार पुणे पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तालुक्यातील २२ गावांची होरपळ अधिक वाढणार आहे. शासन निर्णयात २२ गावांच्या हक्काचे पाणी कसे देणार, याचा समावेश करा, मगच आदेश लागू करा, अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केली. हा निर्णय दि. २१ आॅक्टोबर २०१६ रोजी झाला असल्याने इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणारा आहे. शासनाने असा आदेश काढल्याने या गावांचे शेतीचे पाणी गुल होणार आहे. नीरा डाव्या कालव्यावरील अधिपत्याखाली असणारे २२ गावचे क्षेत्र थेट चासकमान प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्याचा घाट यामुळे सुरू झाला आहे. एकाच फाट्यावर दोन वेगळी यंत्रणा असणार आहे. यामध्ये अंथुर्णे शाखा एकच्या वरचा संपूर्ण भाग कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभागाकडे ठेवला आहे. २२ गावांचा सर्वच भाग चासकमानकडे वळवला आहे. एकतर पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत हे कार्यक्षेत्र असतानादेखील २२ गावच्या शेतीला पाणी न मिळाल्याने या गावांवर अन्याय झाला आहे. समान पाणीवाटप कायदा सन २००५ नुसार ‘टेल टू हेड’ पाणी समान हक्क पद्धतीने देण्याचे धोरण असताना गेल्या दोन-तीन वर्षांत पाटबंधारे विभागाकडून अत्यल्प पाणी देण्यात आले. मात्र, शेळगाव पासूनवर असणारे मोठे उसाचे क्षेत्र याला जादा पाणी देऊन या २२ गावांवर अन्याय केला आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ व श्रीमंत ढोले यांनी केला आहे. नव्या निर्णयामुळे २२ गावांचा भाग पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे येत नाहीत. त्यामुळे वीर, भाटघरचे पाणी मिळणे अशक्य होणार आहे.