शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

इंदापुरातील २२ गावांच्या तोंडचे पाणी पळणार !

By admin | Updated: October 24, 2016 01:21 IST

जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकरी संतप्त झाले आहेत

बावडा : जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या १ आणि २ उपविभागीय कार्यालयांचे सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतरित केला आहे. त्यानुसार पुणे पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तालुक्यातील २२ गावांची होरपळ अधिक वाढणार आहे. शासन निर्णयात २२ गावांच्या हक्काचे पाणी कसे देणार, याचा समावेश करा, मगच आदेश लागू करा, अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केली. हा निर्णय दि. २१ आॅक्टोबर २०१६ रोजी झाला असल्याने इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणारा आहे. शासनाने असा आदेश काढल्याने या गावांचे शेतीचे पाणी गुल होणार आहे. नीरा डाव्या कालव्यावरील अधिपत्याखाली असणारे २२ गावचे क्षेत्र थेट चासकमान प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्याचा घाट यामुळे सुरू झाला आहे. एकाच फाट्यावर दोन वेगळी यंत्रणा असणार आहे. यामध्ये अंथुर्णे शाखा एकच्या वरचा संपूर्ण भाग कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभागाकडे ठेवला आहे. २२ गावांचा सर्वच भाग चासकमानकडे वळवला आहे. एकतर पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत हे कार्यक्षेत्र असतानादेखील २२ गावच्या शेतीला पाणी न मिळाल्याने या गावांवर अन्याय झाला आहे. समान पाणीवाटप कायदा सन २००५ नुसार ‘टेल टू हेड’ पाणी समान हक्क पद्धतीने देण्याचे धोरण असताना गेल्या दोन-तीन वर्षांत पाटबंधारे विभागाकडून अत्यल्प पाणी देण्यात आले. मात्र, शेळगाव पासूनवर असणारे मोठे उसाचे क्षेत्र याला जादा पाणी देऊन या २२ गावांवर अन्याय केला आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ व श्रीमंत ढोले यांनी केला आहे. नव्या निर्णयामुळे २२ गावांचा भाग पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे येत नाहीत. त्यामुळे वीर, भाटघरचे पाणी मिळणे अशक्य होणार आहे.