शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

इंदापुरातील २२ गावांच्या तोंडचे पाणी पळणार !

By admin | Updated: October 24, 2016 01:21 IST

जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकरी संतप्त झाले आहेत

बावडा : जलसंपदा विभागाने घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणार आहे. त्यामुळे या गावांमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाच्या १ आणि २ उपविभागीय कार्यालयांचे सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतरित केला आहे. त्यानुसार पुणे पाटबंधारे मंडळाच्या अंतर्गत कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यपालांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून तालुक्यातील २२ गावांची होरपळ अधिक वाढणार आहे. शासन निर्णयात २२ गावांच्या हक्काचे पाणी कसे देणार, याचा समावेश करा, मगच आदेश लागू करा, अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी केली. हा निर्णय दि. २१ आॅक्टोबर २०१६ रोजी झाला असल्याने इंदापूर तालुक्यातील २२ गावांच्या मुळावर उठणारा आहे. शासनाने असा आदेश काढल्याने या गावांचे शेतीचे पाणी गुल होणार आहे. नीरा डाव्या कालव्यावरील अधिपत्याखाली असणारे २२ गावचे क्षेत्र थेट चासकमान प्रकल्प विभागाकडे वर्ग करण्याचा घाट यामुळे सुरू झाला आहे. एकाच फाट्यावर दोन वेगळी यंत्रणा असणार आहे. यामध्ये अंथुर्णे शाखा एकच्या वरचा संपूर्ण भाग कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभागाकडे ठेवला आहे. २२ गावांचा सर्वच भाग चासकमानकडे वळवला आहे. एकतर पुणे पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत हे कार्यक्षेत्र असतानादेखील २२ गावच्या शेतीला पाणी न मिळाल्याने या गावांवर अन्याय झाला आहे. समान पाणीवाटप कायदा सन २००५ नुसार ‘टेल टू हेड’ पाणी समान हक्क पद्धतीने देण्याचे धोरण असताना गेल्या दोन-तीन वर्षांत पाटबंधारे विभागाकडून अत्यल्प पाणी देण्यात आले. मात्र, शेळगाव पासूनवर असणारे मोठे उसाचे क्षेत्र याला जादा पाणी देऊन या २२ गावांवर अन्याय केला आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते बाळासाहेब करगळ व श्रीमंत ढोले यांनी केला आहे. नव्या निर्णयामुळे २२ गावांचा भाग पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे येत नाहीत. त्यामुळे वीर, भाटघरचे पाणी मिळणे अशक्य होणार आहे.