शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
2
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
3
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
4
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
5
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
6
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
7
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
8
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
9
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
10
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
11
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
12
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
13
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
14
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
15
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
16
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
17
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
18
आम्ही गप्पा मारतो, तर पोलिसांना बोलावून बैठक का मोडतात? बीडमध्ये कत्तीने केले वार
19
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
20
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
Daily Top 2Weekly Top 5

मीनथडी यात्रेत २० लाखांची उलाढाल

By admin | Updated: April 25, 2016 02:19 IST

महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना व्यवसायाची गोडी लागावी, या हेतूने नारायणगाव येथील इंद्रधनू ग्रुपच्या वतीने आयोजित केली

नारायणगाव : महिलांनी स्वावलंबी व्हावे, त्यांना व्यवसायाची गोडी लागावी, या हेतूने नारायणगाव येथील इंद्रधनू ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय मीनथडी यात्रेत महिलांनी स्वत: बनविलेले खाद्यपदार्थ, विविध कलात्मक वस्तू, कपडे आदी वस्तूंची विक्री करून सुमारे २० लाख रुपयांची उलाढाल केली, अशी माहिती इंद्रधनू ग्रुपच्या संस्थापिका राजश्री बोरकर यांनी दिली. या मीनथडी यात्रेचे ६ वे वर्ष आहे. त्याचे उद्घाटन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नारायणगावच्या सरपंच जयश्री मेहेत्रे, उपसरपंच संतोष पाटे, संतोष वाजगे, रामदास अभंग, रमेश पांचाळ, आशिष माळवदकर, रोहिदास केदारी, वन अधिकारी मनीषा काळे आदी मान्यवर उपस्थित होते. या मीनथडी यात्रेत ७० स्टॉल लावण्यात आले होते. यामध्ये मासवडी, शेंगोळ्या, पाणीपुरी, थालपीठ असे स्वत: बनविलेले स्वादिष्ट खाद्यपदार्थ, हाताने बनविलेल्या विविध लोकरीच्या वस्तू, विविध कलात्मक वस्तू, कपडे, कलाकुसर असलेल्या साड्या, आयुर्वेदिक औषधे, लहान मुलांसाठी विविध गेम्स, असे विविध प्रकारचे खास महिलांनी तयार केलेल्या वस्तूचे स्टॉल या यात्रेत लावण्यात आले होते. या यात्रेत कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. लहान मुलांना या यात्रेचे विशेष आकर्षण ठरले होते. दर वर्षी या यात्रेचे स्वरूप वाढत चालले असल्याने आर्थिक उलाढालही वाढली आहे. यामुळे महिलांना आपल्या कलागुणांना वाव मिळून आर्थिक प्रगतीही होऊन विक्रीला बाजारपेठ मिळत असल्याचे महिलांनी सांगितले.या यात्रेचे नियोजन इंद्रधनू ग्रुपच्या अध्यक्षा शीतल ठुसे, उपाध्यक्षा भारती खिवंसरा, जुई बनकर, अंजली खैरे, सुरेखा वाजगे, प्रांजल भुतडा, सुनीता बोरा, नंदा मुथ्था, ज्योती गांधी, सुलभा जठार, निर्मला गायकवाड, कल्पना भामरे, वर्षा कुऱ्हाडे, अरुंधती हाडवळे यांनी केले होते. (वार्ताहर)या यात्रेमुळे महिलांना स्वयंरोजगाराचे माध्यम मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काही महिलांनी स्वत:चे दुकान, मेस सुरू करून आर्थिक उत्पन्नाचे साधन सुरू करून संसाराला आर्थिक हातभार लावत आहे. ही यात्रा किमान तीन दिवस सुरू राहावी, अशी मागणी महिलांनी व ग्राहकांनी केली आहे. या यात्रेला पंचायत समिती सभापती संगीता वाघ, राष्ट्रवादीचे युवक उपाध्यक्ष अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती रघुनाथ लेंडे आदींनी भेट दिली.