शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

राज्यात २० लाख मतदार पत्त्याविना; ११ लाख मृत

By नितीन चौधरी | Updated: September 29, 2023 07:05 IST

मतदार पडताळणीत पुणे जिल्हा तळात; वाशीम, गडचिरोलीत शंभर टक्के

नितीन चौधरी

पुणे : मतदारांनी दिलेला पत्ता योग्य आहे का, ते त्याच पत्त्यावर राहत आहेत का, त्या पत्त्यावरील मृत मतदारांची नावे कायम आहेत का, तसेच नवमतदारांचा समावेश करायचा आहे का, या कारणांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑगस्टपासून मतदार पडताळणी मोहीम देशभर सुरू केली आहे. राज्यातही ही मोहीम सुरू असून वाशिम, गडचिरोली आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये १०० टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेत पुण्याचा क्रमांक तळात लागला असून जिल्ह्यात सर्वांत कमी अर्थात ८२ टक्के मतदारांची पडताळणी झाली आहे. या पडताळणीत ११ लाख १० हजारांहून मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

ही पडताळणी करत असताना राज्यात १९ लाख ८८ हजार ३६० मतदार त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळून आलेले नाहीत. तर ११ लाख १० हजार ८८१ मृत मतदार आढळले आहेत. तर ७ लाख ४० हजार १ मतदार संबंधित विधानसभा मतदारसंघातून अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे सुमारे १८ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याच मोहिमेत ४ लाख २८ हजार ९६० मतदारांची छायाचित्रे बदलण्यात आली आहेत. राज्यात ६२ हजार ७६५ मतदार हे एकापेक्षा अनेक मतदारसंघांमध्ये असल्याचे आढळून आले आहेत.

पावणेनऊ कोटी मतदारांची पडताळणी पूर्ण मतदार यादीच्या शुद्धीकरणासाठी मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात ९ कोटी ८ लाख ३२ हजार ११५ मतदार असून आतापर्यंत ८ कोटी ६४ लाख ३४ हजार ७०५ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत ही टक्केवारी ९५.१६ इतकी आहे. वाशिम, गडचिरोली व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये सर्व मतदारांची अर्थात शंभर टक्के पडताळणी पूर्ण झाली आहे. तर सर्वात कमी पडताळणी पुणे जिल्ह्यात झाली आहे. पुणे जिल्ह्यात ८० लाख ७३ हजार ११३ मतदारांपैकी ६६ लाख ५७ हजार ४३४ मतदारांची पडताळणी होऊ शकली आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत ही टक्केवारी ८२.५० इतकी आहे.

पुढील दहा दिवसांमध्ये पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रारूप मतदार यादी १७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ती २७ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ३० नोव्हेंबरपर्यंत नवमतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे.- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक