शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपातीमुळे २ टीएमसी बचत

By admin | Updated: January 4, 2016 01:13 IST

शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे.

पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यापासून पुणेकरांची सुटका होण्यास मदत होणार आहे. यंदा सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. यापार्श्वभुमीवर पुणे शहराच्या पाण्यात ३० टक्के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपलब्ध असलेले पाणी शहराला जुलै २०१६ अखेर पर्यंत पुरविण्याबरोबरच इतर दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविण्याचे आव्हान उभे राहिलेले आहे. यापार्श्वभुमीवर गेल्या ४ महिन्यात वाचलेले २ टिएमसी पाणी उन्हाळयात खूप उपयोगी पडणार आहे. पाणीकपात लागू करण्यापूर्वी शहराला दररोज १२५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यामध्ये कपात करण्यात आल्यापासून दररोज ८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यानुसार ४ महिन्यात २ टिएमसी पाणी वाचविण्यात यश आले आहे. पाणी कपातीबरोबरच जलवाहिन्यांमधील पाणी गळती रोखणे, त्याचा अपव्यय टाळणे. बांधकाम, जलतरण तलाव आणि अन्य व्यवासयिक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी आदी उपाययोजना महापालिकेकडून राबविण्यात आल्या. त्यामुळेही पाणी बचत होण्यास मदत झाली आहे. ही बचत अशीच सुरू राहिल्या जुलै २०१६ अखेर पर्यंत अजून ४ टिएमसी पाण्याची बचत होऊ शकणार आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी एक हेल्पलाइन महापालिकेत सुरू करण्यात आली आहे. पाणी गळती होत असल्याचा फोन या हेल्पलाइनवर आल्यास लगेच त्याची दुरूस्ती केली जात आहे.