शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पाणीकपातीमुळे २ टीएमसी बचत

By admin | Updated: January 4, 2016 01:13 IST

शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे.

पुणे : शहरामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून पाणीकपात लागू झाल्यानंतर गेल्या ४ महिन्यात तब्बल २ टीएमसी पाण्याची बचत करण्यात महापालिकेला यश आले आहे. यामुळे उन्हाळ्यामध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करण्यापासून पुणेकरांची सुटका होण्यास मदत होणार आहे. यंदा सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा झाला आहे. यापार्श्वभुमीवर पुणे शहराच्या पाण्यात ३० टक्के पाणीकपात करून एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. उपलब्ध असलेले पाणी शहराला जुलै २०१६ अखेर पर्यंत पुरविण्याबरोबरच इतर दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरविण्याचे आव्हान उभे राहिलेले आहे. यापार्श्वभुमीवर गेल्या ४ महिन्यात वाचलेले २ टिएमसी पाणी उन्हाळयात खूप उपयोगी पडणार आहे. पाणीकपात लागू करण्यापूर्वी शहराला दररोज १२५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात होता. त्यामध्ये कपात करण्यात आल्यापासून दररोज ८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात८५० एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यानुसार ४ महिन्यात २ टिएमसी पाणी वाचविण्यात यश आले आहे. पाणी कपातीबरोबरच जलवाहिन्यांमधील पाणी गळती रोखणे, त्याचा अपव्यय टाळणे. बांधकाम, जलतरण तलाव आणि अन्य व्यवासयिक कारणांसाठी पिण्याचे पाणी वापरण्यास बंदी आदी उपाययोजना महापालिकेकडून राबविण्यात आल्या. त्यामुळेही पाणी बचत होण्यास मदत झाली आहे. ही बचत अशीच सुरू राहिल्या जुलै २०१६ अखेर पर्यंत अजून ४ टिएमसी पाण्याची बचत होऊ शकणार आहे. पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसेच पाणी गळती रोखण्यासाठी एक हेल्पलाइन महापालिकेत सुरू करण्यात आली आहे. पाणी गळती होत असल्याचा फोन या हेल्पलाइनवर आल्यास लगेच त्याची दुरूस्ती केली जात आहे.