शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दगडफेकीत पीएमपीचे २ कोटींचे नुकसान

By admin | Updated: June 12, 2014 05:07 IST

शहरात विविध कारणांस्तव राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून लक्ष्य करण्यात आलेल्या पीएमपीला गेल्या ४ वर्षांत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

पुणे : शहरात विविध कारणांस्तव राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून लक्ष्य करण्यात आलेल्या पीएमपीला गेल्या ४ वर्षांत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. पीएमपी प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या माहितीनुसार, शहरात ५ जुलै २०१० रोजी केंद्रातील विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. यामध्ये १११ बसवर दगडफेक करण्यात आली. त्यात सर्वाधिक ५६,३७,४५५ रुपयांचे नुकसान झाले, तर दिनांक २८ डिसेंबर २०१० रोजी पुणे जिल्हा बंद आंदोलनात ६० बसवर दगडफेक झाल्याने तब्बल ३१,५१,३१२ रुपयांचे नुकसान झाले. कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नोव्हेंबर २०११मध्ये शहरात १८ बसवर हल्ला करण्यात आला.त्यात २ लाख २० हजारांचे नुकसान झाले.याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या अतिक्रमण कारवाईदरम्यान झालेल्या हिंसाचारात दगडफेकीत ८३,000 आणि ३१ मे रोजी पेट्राल दरवाढ झाल्याने ३३ बसवर दगडफेक करण्यात आली, त्यात ४ लाख ६५ हजारांचे नुकसान झाले. तसेच ३१ मे २०१२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची फेसबुकवर विटंबना झाल्याने १ लाख १४ हजारांची आणि १ आॅक्टोबरला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याने, १७ नोव्हेंबर २०१२ रोजी विविध पक्षांतर्फे बंद पुकारण्यात आला होता. यामध्ये १० बसच्या काचा फोडण्यात आल्याने १ लाख ६२ हजारांचे नुकसान झाले. तर फेब्रुवारी २०१४मध्ये मनसेने पुकारलेल्या टोल बंद आंदोलनादरम्यानही झालेल्या दगडफेकीत १,७५,५०० आणि २६ फेब्रुवारी २०१४ रोजी रोजी मुंबईत मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ स्वारगेट परिसरात ४ बसचे ९३ हजारांचे नुकसान झाले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.मागील आठवड्यात फेसबुकवर महापुरुषांच्या करण्यात आलेल्या बदनामीच्या घटनेनंतर शहरात ४३ बस फोडण्यात आल्या असून, १६ लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)