शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

खडकवासला धरण प्रकल्पात १९.५१ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:12 IST

गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह ...

गेल्या वर्षी पुण्यासह राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, पुण्यासह राज्यातील बहुतांश सर्वच धरणे १०० टक्के भरली. त्यामुळे यंदा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खडकवासला धरण प्रकल्पात २.३१ टीएमसी एवढे पाणी अधिक आहे.

वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातील पाण्यासह आता पुण्यातील काही भागाला आंद्रा धरणातील पाणी मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला धरण प्रकल्पावर येणारा भार कमी झाला आहे. परिणामी, प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडणे अधिक शक्य होणार आहे. सुमारे आठवड्याभरापूर्वी खडकवासला धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून सोडलेले आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

---

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्याची आवकडेवारी

टेमघर : ०.५१

वरसगाव : ८.९१

पानशेत : ९.१६

खडकवासला : ०.९४