शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

बेदरकार टँकरचे वर्षभरात १९ बळी

By admin | Updated: January 21, 2016 01:28 IST

वाघोलीजवळच्या बकोरी गावच्या हद्दीमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेमुळे जीव गमवावा लागला.

पुणे : वाघोलीजवळच्या बकोरी गावच्या हद्दीमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाला पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेमुळे जीव गमवावा लागला. चटका लावून जाणाऱ्या अशा एक ना अनेक घटना दररोजपुण्यामध्ये घडत असून, टँकरचालकांच्या बेदरकारपणामुळे गेल्या वर्षभरात तब्बल १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. चालकांच्या या बेजबाबदारपणाला आळा घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. शहरालगतच्या उपनगरांचा परीघ विस्तारत चालला आहे. तेथील लोकवस्ती वाढत चालल्यामुळे शहरातील आणि जिल्ह्यातील टँकरचालकांचे चांगलेच फावले आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधून अनेकदा पाणी सांडत असते. त्यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघात घडतात. रस्त्यांवर वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या केलेल्या टँकर्समुळेही अपघाताला निमंत्रण मिळते. गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण अपघातांपैकी टँकरमुळे १८ प्राणांतिक अपघात झाले असून, त्यामध्ये १९ नागरिकांचा जीव गेला आहे. चालकांचे वाहतुकीविषयीचे अपुरे ज्ञान, वेळेत पोचण्याची झालेली घाई, वेगावर नसलेले नियंत्रण ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. या वाहनांना रिफ्लेक्टर्सही नसतात.टँकर्समुळे झालेल्या अपघातांचे गांभीर्य ना महापालिकेला आहे; ना ठेकेदारांना. अपघातग्रस्त टँकर्स आणि चालकांवर कडक कारवाईची आवश्यकता आहे. ठेकेदार आणि टँकरचालकांची मुजोरी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर उठत चालली आहे. (प्रतिनिधी)वाघोली : टँकरची दुचाकीला धडक बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बकोरी गावच्या हद्दीतील वारघडेवस्ती येथे वाघोली-बकोरी रोडवर बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास घडली. अपघातानंतर चालक फरार झाला असून, चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने तणावपूर्ण वातावरण झाले होते.अभिषेक राजेंद्र वारघडे (वय १४, रा. बकोरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा कंपनीमध्ये आईला सोडून दुचाकीवरून पुन्हा घराच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता. मगरवस्ती चौक सोडून पुढे वारघडेवस्ती येथून जात असताना टँकरने दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक फरार झाला़ अपघाताचे वृत्त समजताच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली़ चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पवित्रा नातेवाइक आणि ग्रामस्थांनी घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची खबर समजताच लोणी कंद पोलिसांनी परिस्थिती हाताळत मृतदेह हलविला. अधिक तपास लोणी कंद पोलीस करीत आहेत.