शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आळंदीत १५ हजार गणेशमूर्ती दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:49 IST

आळंदी येथील गणपती मिरवणुकीचे खास आकर्षण ठरला तो ढोलताशाचा गजर आणि हरिनाम जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

आळंदी : येथील गणपती मिरवणुकीचे खास आकर्षण ठरला तो ढोलताशाचा गजर आणि हरिनाम जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. आळंदीत याही वर्षी भाविकांनी गणेशमूर्ती दान करण्यास प्रतिसाद दिल्याने आळंदी नगर परिषदेकडे १५ हजार गणेशमूर्ती दान मिळाल्या.पारंपरिक ढोलताशा आणि शिस्तबद्ध वाजतगाजत मिरवणुका आणि गुलाल, भंडाराची मुक्त उधळण करीत श्रीना पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत निरोप भक्तिमय उत्साहात देण्यात आला.बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबतच नागरिक, कार्यकर्ते यांनी जनजागृती केली. विसर्जनानंतर श्रींचे मूर्ती तात्काळ नगरसपरिषदेने इंद्रायणी बाहेर काढत दान म्हणून भक्तांकडून गणेश मूर्ती स्वीकारल्या. यावर्षीही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन लवकर व्हावे, याकरिता आळंदी पोलिस ठाण्याचे वतीने नियोजन करून मंडळ पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते. भाविकांनी निर्माल्य कुंडात देत नदी प्रदूषण रोखण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला.जय गणेश मंडळाचे श्रींचे विसर्जनाने सांगता झाली. पालिकेने निर्माल्यासाठी घंटा गाड्या सेवा रुजू केली. पोलिसांनी नियोजन केले. मुख्याधिकारी समीर भूमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, मंडलाधिकारी चेतन चासकर, आपत्ती निवारण यंत्रणा यांनी घाटावर सुरक्षा यंत्रणा विकसित केली.पोलिसांना सहकार्यआळंदी परिसरातील विसर्जन मिरवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र, नागरिक, कार्यकर्ते यांनी मदत केली. जय गणेश प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, शिवस्मृती प्रतिष्ठान, अखिल भाजी मंडई मंडळ, हनुमान मित्र मंडळ, ज्ञानराज मित्र मंडळ, पद्मावती मित्र मंडळ, नवशिवशक्ती मित्र मंडळ, राजे शिवछत्रपती मित्र मंडळ आदी सार्वजनिक गणेश मंडळांनी या वर्षी उत्सव साजरा केला.

टॅग्स :AlandiआळंदीGanesh Visarjanगणेश विसर्जन