शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतावर १५ दिवसांनी अंत्यसंस्कार

By admin | Updated: July 1, 2015 23:42 IST

प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी बेवारस मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहर बोडखे, दौंडप्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी बेवारस मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्यथा, बेवारस मृताच्या अंत्यसंस्कारांसाठी नेहमीच टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रेल्वे पोलिसांनी केला आहे़ त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांचा प्रश्न ऐरणीवर आहे. बेवारस मृतदेह सापडल्यानंतर त्याच्यावर शवविच्छेदन करून तीन दिवस तो पोलिसांच्या ताब्यात असतो. कोणी नातेवाईक आढळून न आल्यास मृतदेहाच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी शहरी भागात नगर परिषद, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची असल्याचा कायदा आहे, असे सहायक पोलीस निरीक्षक वसंतराव शेटे यांनी सांगितले. दरम्यान, बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता टाळाटाळ केली जाते, अशी तक्रार तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे केली होती. ही तक्रार करण्यापूर्वी बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावावी म्हणून नगर परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, नगर परिषदेने जागेची अडचण सांगून त्या संदर्भात चालढकलीचे धोरण अवलंबले. परिणामी, बेवारस मृतदेह पुण्याला ससून रुग्णालयात पाठवा, असाही सल्ला नगर परिषदेने पोलिसांना दिला असल्याचे शेटे म्हणाले.याबाबत रेल्वे पोलिसांना कळविले असून, बेवारस मृतदेह ससून येथे पाठविण्यात यावा, अशाही सूचना करण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांनी तहसीलदारांना लेखी उत्तर दिले आहे. १५ दिवसांपासून मृतदेह रुग्णालयात१५ दिवसापूर्वी रेल्वे स्थानक परिसरात बेवारस मृतदेह आढळला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या ठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह घेऊन जा, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. परंतु, नगर परिषद मृतदेह नेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने १५ दिवस तो ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात पडून होता. त्यामुळे परिसरात उग्र वास सुटल्याने या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते. दफनासाठी जागा नाही बेवारस मृतदेहांचे दफन करण्यासाठी नगर परिषदेकडे सध्या मोकळी जागा उपलब्ध नाही. पूर्वी ज्या ठिकाणी बेवारस मृताला दफन करण्यात येत होते, त्या परिसरातील नागरिकांचा विरोध होऊ लागल्याने आता तेथे दफन करता येत नाही़ कारण, मध्यंतरी पोलिसांनी एका मृतदेहाचे दफन केले होते. त्याचा खड्डा वरच्यावर खोदला गेला. पोलीस गेल्यानंतर कुत्र्यांनी खड्डा उकरला आणि प्रेताचे अवयव परिसरात अस्ताव्यस्त पसरविले. यामुळे रहिवाशांनी या परिसरात दफन करण्यासाठी विरोध केला आहे. अगोदर पहिले मृतदेह न्या, नंतरच शवविच्छेदनदोन दिवसांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एक बेवारस मृतदेह सापडला. तेव्हा तो शवविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेला असता तेथील अधिकारी म्हणाले, की १५ दिवसांपासून शवविच्छेदन गृहातील मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी घेऊन जा, नंतरच आलेल्या नवीन मृतदेहाचे शवविच्छेदन केले जाईल, असे सांगितल्यानंतर आम्ही तहसीलदार उत्तम दिघे यांच्याकडे नगर परिषदेच्या तक्रारीसाठी गेलो. या वेळी प्रांताधिकारी समीर शिंगटे उपस्थित होते. त्यांना बेवारसांच्या अंत्यसंस्कारांविषयी टाळाटाळ होत असल्याची कल्पना दिल्यानंतर त्यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबधित मृतदेहावर तातडीने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्यानंतर मंगळवारी (दि. ३0) सायंकाळी उशिरा पोलिसांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या वतीने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.