शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

प्रभागरचनेवर १४३० हरकती

By admin | Updated: October 26, 2016 05:53 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर एकूण एक हजार ४३० हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यातील तब्बल एक हजार ३०० हरकती-सूचना प्रभाग क्रमांक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर एकूण एक हजार ४३० हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यातील तब्बल एक हजार ३०० हरकती-सूचना प्रभाग क्रमांक एकच्या रचनेवर घेण्यात आल्या आहेत. या हरकतींवर ३ व ४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून, या निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबरला आरक्षण सोडत काढण्यात आली. याच दिवशी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर निवडणूक विभागामार्फत १० ते २५ आॅक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी हरकती व सूचना सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनीही महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर एकूण एक हजार ४३० हरकती, सूचना नोंदविल्या आहेत. दरम्यान, त्यातील १३०० हरकती या केवळ प्रभाग क्रमांक १ च्या रचनेवर घेण्यात आल्या आहेत. तळवडेचा परिसर चिखली गावठाण भागाचा समावेश असलेल्या प्रभागाला जोडण्यास येथील नागरिकांनी हरकत घेतली आहे. उर्वरित हरकती इतर प्रभागांसाठी आहेत. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागांना नावे देण्यात आलेली नाहीत. हे प्रभाग केवळ क्रमांकाने ओळखले जाणार आहेत. परंतु, प्रभागांना नाव न देण्याच्या मुद्द्याबाबत एकाही नागरिकाने हरकत घेतलेली नाही. या हरकतींवर ३ व ४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या महापालिका निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग असल्याने प्रभागाचा विस्तारही वाढला आहे. मात्र, अगोदरपासूनच तयारी केलेल्या काही इच्छुकांचे मात्र या प्रारूप प्रभागरचनेमुळे नियोजन बिघडले आहे. अमुक भाग आपल्याकडे येईल, या अंदाजाने अनेक इच्छुकांनी तयारीही केली होती. त्या भागांमध्ये कामेही केली होती. मात्र, संबंधित भागच प्रभागरचनेत नसल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. दरम्यान, मोठ्या प्रमाणात हरकती, सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकती, सुचनांवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात येणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या विशेष मतदारनोंदणी मोहिमेची मुदत २१ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. यामध्ये एक लाख ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.