शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला १२ गावांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:14 IST

दावडी: पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास आराखड्याच्या विरोधात पूर्व भागातील सेझ परिसरातील गावांनी विरोध दर्शविला आहे. बारा ...

दावडी: पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) विकास आराखड्याच्या विरोधात पूर्व भागातील सेझ परिसरातील गावांनी विरोध दर्शविला आहे. बारा गावांतील ग्रामस्थांनी धामणटेक (ता. खेड) येथे आंदोलन करून आराखड्याचा निषेध व्यक्त केला आहे.

सेझ परिसरातील रेटवडी ,गोसासी ,निमगाव ,दावडी, कनेरसर ,पूर ,वरुडे ,गाडकवाडी, वाफगाव व इतर गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी प्रस्तावित विकास आराखड्यास तीव्र विरोध करून धामणटेक येथे समर्थ फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विजयसिंह शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सेझ परिसरातील औद्योगीकरण मोठ्या प्रमाणात असताना आजूबाजूच्या गावांमध्ये वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात आवश्यक असणाऱ्या रहिवासी व कमर्शियल झोनची आवश्यकता असताना पीएमआरडीने स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांना विश्वासात न घेता फक्त ग्रीन १ व ग्रीन- असे झोन टाकले आहे. त्याला विरोध आहे.

वाढत्या नागरीकरणामुळे स्थानिकांना भविष्यात व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सेझ परिसरातील गावांचे झोन बदलण्यात यावे, तसेच अनेक चुकीची आरक्षण टाकण्यात आलेले आहेत, ती बदलण्याची मागणी नागरिकांनी या वेळी केली आहे. आंदोलनाचे प्रास्ताविक मारुती गोरडे यांनी केले. विजयसिंह शिंदे पाटील यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. या वेळी गाडकवाडीचे सरपंच वैभव गावडे, गोसासीचे सरपंच संतोष गोरडे, कनेससरचे सरपंच सुनीता केदारी, दावडीचे सरपंच आबा घारे, वाफगावचे सरपंच उमेश रामाणे, निमगावचे उपसरपंच संतोष शिंदे, दिलीप डुबे, मारूती गोरडे, दिलिप माशेरे, बापू पठारे व शेतकरी उपस्थित होते.

.............................................................

खेड तालुक्याच्या पूर्व भागात यापूर्वी सेझ प्रकल्प आला आहे. पूर्व भागात कायम पाणीटंचाई असते. या भागात ग्रीन झोन करून काय फायदा होणार आहे. ग्रीन झोन करताना गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्या जामिनीतून ५० फुटांचे रस्ते टाकण्यात आले आहे. पीएमआरडीएने ऑगस्ट २०२१ मध्ये पुढील वीस वर्षाकरिता डेव्हल्पमेंट प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार पूर्व भागातील गोसासी, निमगाव, गाडकवाडी, चिंचबाईवाडी, वाफगाव, गुळाणी रेटवडी, कनेरसर, पूर,दावडी, वरुडे , चौधरवाडी, वाकळवाडी या गावात ग्रीन झोन दाखविण्यात आला आहे. भविष्यात ग्रीन झोनमध्ये शेती व्यतिरिक्त शेतीपूरक व्यवसाय सोडून कुठलाही व्यवसाय करता येणार नाही. ग्रीन झोन बदलावा, अन्यथा मोठ्या स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल.

विजयसिंह शिंदे-पाटील ( संस्थापक अध्यक्ष, समर्थ फाऊंडेशन)

१६ दावडी

पीएमआरडीएच्या विकास आराखड्याला पूर्व भागातील गावांनी आंदोलन करून विरोध दर्शविला.