शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

स्वाइनने घेतले जिल्ह्यात १२ जणांचे बळी

By admin | Updated: March 17, 2015 23:14 IST

नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने १२ जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अ‍ॅलर्ट झाले आहे.

पुणे : नवीन वर्षात आतापर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूने १२ जणांचा बळी घेतला असून, जिल्हा प्रशासन अ‍ॅलर्ट झाले आहे. जिल्ह्यात टॅमीफ्लूचा आवश्यक साठा असून, लहान मुलांसाठी ‘सायरस’ हे सिरफही उपलब्ध करून दिले आहे. जिल्हा परिषदेकडून १६० बाटल्या व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १५० बाटल्या उपलब्ध झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्ह्यात सिरपही उपलब्ध होणार, असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ते उपलब्ध करून देण्याचे देशमुख यांना सांगितले होते. त्यानुसार १६० बाटल्या जिल्हा परिषदेकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये बारामती, इंदापूर, खेडला प्रत्येकी २; तर आंबेगाव, हवेली, जुन्नर, मावळ, पुरंदर, दौंडला प्रत्येक १ रुग्णाचा मृत्यू झाला. यात नऊ पुरुषांचा व ३ महिलांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूबाधित रुग्णांमध्ये १५ ते ५० वयोगटातील ७४ पैकी ५३ रुग्णांचा समावेश आहे. ५०च्या पुढे १३ व ० ते १४ वयोगटातील ८ रुग्ण सापडले. ११ मृत रुग्णांपैकी रुबीमध्ये ३ , नोबलमध्ये ३, पूना हॉस्पिटल २ , के.ई.एम १, वायसीएम १ , आदित्य बिर्लामध्ये १ रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला. (प्रतिनिधी)हवेलीत सर्वाधिक ३६ जिल्ह्यात आढळलेल्या एकूण ७६ रुग्णांपैकी हवेली तालुक्यात सर्वाधिक ३६ रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर इंदापूरला ७, खेडला ७, बारामतीला ५, आंबेगाव, भोर, मावळ, पुरंदर, शिरूरला प्रत्येकी ३; तर दौंड, जुन्नर, मुळशीला २ रुग्ण सापडले. टॅमीफ्लूचा मुबलक साठाजिल्ह्यात प्रत्येक केंद्रावर टॅमीफ्लूच्या ४०० गोळ््या उपलब्ध आहेत. ४० रुग्णांना पुरू शकतील एवढा साठा उपलब्द असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. सर्व स्तरावर प्रशिक्षणजिल्हास्तरावर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तरावर सर्व आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचेही प्रशिक्षण घेतले असून, संशयित रुग्णांवर कसे उपचार करायचे, याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या व आशांनाही याबाबत माहिती दिली आहे.