शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

कोरोनाची साखळी तोडताना ११ पोलीस हुतात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. पोलिसांनी विनवणी करुन कधी वर्दीचा हिसका दाखवून लॉकडाऊन काळात २४ तास बंदाेबस्त केला. या कार्यात पुण्यातील १ अधिकारी आणि १० कर्मचारी हुतात्मा झाला. तसेच दीडशे पोलीस अधिकारी व १ हजार ३३८ कर्मचारी कोरोना बाधित झाले. पोलिसांचे अनेक नातेवाईक कोरोना बाधित झाले होते. या सर्वांना आरोग्य सुविधा पुरविणे, त्यांच्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली.

लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला सर्वत्र भीतीचे वातावरण होते. अशावेळी दिवसरात्र बंदोबस्त करुन घरी गेलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:ला घरात वेगळे करुन घेतले होते.

लॉकडाऊन शिथील करण्यास सुरुवात झाल्यानंतर लोकांशी संपर्क वाढल्याने पोलीसांमधील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले. त्याचवेळी ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्यक्ष फिल्डवर पाठविता येत नव्हते. अशावेळी बंदोबस्तासाठी मनुष्यबळ कमी पडू लागले. तेव्हा विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांच्याकडून बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली.

बंदोबस्ताबरोबरच या काळात पोलिसांनी शहरात अडकून पडलेल्या परप्रांतीयांसह काही लाख लोकांना जीवनावश्यक साहित्य पुरविण्याची सर्वात मोठी मोहीम राबबिली. परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांची यादी करुन त्यांना प्रत्यक्ष रेल्वे, बसमध्ये बसवून लाखो लोकांची त्यांच्या मुळगावी रवानगी केली.

लसीकरणात आघाडी

पोलीस दलासाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर पुणे पोलिसांनीलसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलीस दलातील ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांपैरी आतापर्यंत ४६२ पोलीस अधिकारी आणि ५ हजार ६ पोलीस कर्मचारी अशा ५ हजार ४६८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

......

मुलांना पाठविले गावी

कोरोनाचे संकट शहरात घोंगावू लागल्यानंतर मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याची जाणीव पोलीसांना झाली. आपल्यामुळे मुलांना त्रास होऊ नये म्हणून असंख्य पोलीसांनी त्यांच्या मुलांना गावाकडे किंवा सासूसासरे, आईवडिलांकडे पाठवून दिले. काहींची घरी मुले असली तरी काळजावर दगड ठेवून त्यांना महिनोमहिने आपल्यापासून दूर ठेवले होते.