शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोरोनाची साखळी तोडताना ११ पोलीस हुतात्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनच्या काळात व त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी करण्याची सर्व जबाबदारी पोलीस यंत्रणेवर सोपविण्यात आली आहे. पोलिसांनी विनवणी करुन कधी वर्दीचा हिसका दाखवून लॉकडाऊन काळात २४ तास बंदाेबस्त केला. या कार्यात पुण्यातील १ अधिकारी आणि १० कर्मचारी हुतात्मा झाला. तसेच दीडशे पोलीस अधिकारी व १ हजार ३३८ कर्मचारी कोरोना बाधित झाले. पोलिसांचे अनेक नातेवाईक कोरोना बाधित झाले होते. या सर्वांना आरोग्य सुविधा पुरविणे, त्यांच्यासाठी आवश्यक साहित्य पुरविण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली.

लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला सर्वत्र भीतीचे वातावरण होते. अशावेळी दिवसरात्र बंदोबस्त करुन घरी गेलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी स्वत:ला घरात वेगळे करुन घेतले होते.

लॉकडाऊन शिथील करण्यास सुरुवात झाल्यानंतर लोकांशी संपर्क वाढल्याने पोलीसांमधील कोरोना बाधितांचे प्रमाण वाढू लागले. त्याचवेळी ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्यक्ष फिल्डवर पाठविता येत नव्हते. अशावेळी बंदोबस्तासाठी मनुष्यबळ कमी पडू लागले. तेव्हा विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांच्याकडून बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली.

बंदोबस्ताबरोबरच या काळात पोलिसांनी शहरात अडकून पडलेल्या परप्रांतीयांसह काही लाख लोकांना जीवनावश्यक साहित्य पुरविण्याची सर्वात मोठी मोहीम राबबिली. परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांची यादी करुन त्यांना प्रत्यक्ष रेल्वे, बसमध्ये बसवून लाखो लोकांची त्यांच्या मुळगावी रवानगी केली.

लसीकरणात आघाडी

पोलीस दलासाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर पुणे पोलिसांनीलसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलीस दलातील ८ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांपैरी आतापर्यंत ४६२ पोलीस अधिकारी आणि ५ हजार ६ पोलीस कर्मचारी अशा ५ हजार ४६८ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

......

मुलांना पाठविले गावी

कोरोनाचे संकट शहरात घोंगावू लागल्यानंतर मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार असल्याची जाणीव पोलीसांना झाली. आपल्यामुळे मुलांना त्रास होऊ नये म्हणून असंख्य पोलीसांनी त्यांच्या मुलांना गावाकडे किंवा सासूसासरे, आईवडिलांकडे पाठवून दिले. काहींची घरी मुले असली तरी काळजावर दगड ठेवून त्यांना महिनोमहिने आपल्यापासून दूर ठेवले होते.