शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी सीईटीसाठी ११ लाख अर्ज, प्रवेशास प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतर्गत एकूण १५ लाख ७५ हजार ८०६ नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक नसली तरी सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी दहावीचे नियमित विद्यार्थी व पुनर्परीक्षार्थी या दोन्ही विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे १६ लाख विद्यार्थी सीईटी परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. त्यातील १० लाख ८० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी शनिवारी साडेचार वाजेपर्यंत सीईटीसाठी अर्ज केला होता. विद्यार्थ्यांना येत्या २ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यामुळे सीईटीसाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

---------------------------

काही विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी योग्य तो एकच अर्ज ठेऊन जादाचा अर्ज डिलीट करावा. येत्या १ ऑगस्टपासून ही सुविधा उपलब्ध असेल. मात्र, विद्यार्थ्यांनी एक अर्ज संगणकीय प्रणालीमध्ये असल्याची खातरजमा करावी. तसेच विद्यार्थी, पालक व अन्य घटकांनी या संदर्भातील अन्य शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

----------------------------

अर्जात दुरूस्तीची संधी

अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरूस्ती करण्याची संधी देण्यात आली असून विद्यार्थी ई-मेल आयडी, परीक्षेचे माध्यम, निवासाचा पत्ता व त्यानुसार परीक्षा देण्यासाठी निवडलेला जिल्हा /तालुका / शहराचा भाग निवडू शकतात. ईडब्ल्युएस प्रवर्ग आदी माहितीत विद्यार्थी बदल करू शकतात. अर्जातील इतर माहिती शाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे मंडळाने अर्जात घेतली आहे. त्यामुळे उर्वरित माहितीमध्ये बदल करण्यासाठी शाळेशी संपर्क साधावा,असे आवाहन राज्य मंडळातर्फे करण्यात आले आहे.

-----------------------------