शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

दहावीची परीक्षा रद्द झाली, पण पुढे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST

पुणे : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल तयार करण्यासंबंधीचे निकष नुकतेच जाहीर केले. येत्या जूनअखेर दहावीचा निकाल ...

पुणे : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल तयार करण्यासंबंधीचे निकष नुकतेच जाहीर केले. येत्या जूनअखेर दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. जे विद्यार्थी या निकालाबाबत समाधानी होणार नाहीत, त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेंतर्गत दोन संधी दिल्या जाणार असल्याचे शासनाने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील गोंधळ, चिंता, प्रश्न आहेत. मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी या संदर्भात समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न : दहावीची परीक्षा होणार आहे का?

महाराष्ट्र सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मूल्यमापन व अन्य बाबींसंदर्भात शंकानिरसन शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील ‘एफऐक्यू’त उपलब्ध आहे.

प्रश्न : परीक्षा नाही तर मग मूल्यांकन कसे होणार?

उत्तर : अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मुलांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे.

प्रश्न : अंतर्गत मूल्यांकन नेमकं कसं होणार?

उत्तर - दहावीच्या वर्षातील लेखी मूल्यमापनला ३० गुण असतील. दहावीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिकातंर्गत २० गुण असतील. तसेच नववीचे विषयानिहाय गुण याला ५० गुण असतील. असे एकूण १०० गुणांचे मूल्यमापन असेल.

प्रश्न : म्हणजे दहावीचे सरसकट सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होतील का?

उत्तर : जर एखाद्या विद्यार्थ्याने लेखी मूल्यमापन, गृहपाठ किंवा तोंडी परीक्षा योग्यप्रकारे दिली नसेल, किंवा नववीलाही काठावर उत्तीर्ण असेल तर त्याच्या निकालाबाबत सरसकट उत्तीर्ण असं होणार नाही.

प्रश्न : मला मिळालेले दहावीचे गुण मान्य नसतील तर काय?

उत्तर : दहावीचे गुण मान्य नसतील तर तुम्हाला श्रेणी सुधारची संधी असेल. कोविड परिस्थिती सुधारल्यानंतर तुम्हाला परत परीक्षा देता येईल.

प्रश्न : इयत्ता अकरावीचा प्रवेश कसा होणार?

उत्तर : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी वैकल्पिक (ऑप्शनल) ‘सीईटी’ परीक्षा आयोजित केली जाईल. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.

प्रश्न : अकरावीसाठी ‘सीईटी’ परीक्षेतील प्रश्न कोणत्या आधारे विचारणार?

उत्तर : इयत्ता अकरावीच्या प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील.

प्रश्न : इयत्ता अकरावीची ‘सीईटी’ परीक्षा किती गुणांची?

उत्तर : ही परीक्षा शंभर गुणांची असेल.

प्रश्न : इयत्ता अकरावीचे प्रवेश कसे होणार?

उत्तर : ‘सीईटी’ परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयात प्रवेश दिला जाईल. ही परीक्षा देणाऱ्यांना अकरावी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल.

प्रश्न : ‘सीईटी’ न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश कसा मिळणार?

उत्तर : ‘सीईटी’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. ही परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार होईल.

चौकट

असा लागेल दहावीचा निकाल

नियमित विद्यार्थी :

वर्षातील लेखी मूल्यमापन - ३० गुण

दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत - २० गुण

नववीचे विषयानिहाय गुण - ५० गुण