शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेकवर्क पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी १४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर ...

लोकमत न्यूज नेकवर्क

पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी १४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर तयार केली. इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे १०८ कोटी लिटरचे उद्दिष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे.

इथेनॉल विक्रीतून रक्कम रोख मिळाल्याने कारखान्यांना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे शक्य झाले. एकूण ९३ टक्के एफआरपी दिली गेली. १९ कारखान्यांवर सुमारे ४५० कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही म्हणून जप्तीची कारवाई झाली. आणखी १० कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकाही ऊसऊत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दक्ष राहणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. अर्थ विभागाचे संचालक ज्ञानदेव मुकणे, उपपदार्थ सहसंचालक संजय भोसले, पांडुरंग शेळके (विकास), उत्तम इंदलकर, राजेश सुरवसे (प्रशासन) या वेळी उपस्थित होते.

इथेनॉल निर्मितीमुळे उतारा कमी झाला. मात्र, त्याची किंमत जमेस धरली जाणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे गायकवाड म्हणाले. राज्यात यंदा १०१२ लाख टन उसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला. आजमितीस राज्यात कुठेही गाळपासाठी ऊस शिल्लक नाही.

चौकट

‘जवाहर’चा पहिला नंबर

हातकणंगले (ता. हुपरी, जि. कोल्हापूर) येथील जवाहर कारखान्याने राज्यात सर्वाधिक १८.८८ लाख टन उसाचे गाळप केले. याच कारखान्याने सर्वाधिक ५२८ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी दिले. त्यांच्याकडून २२ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव कारखान्यांबरोबरच आता आणखी १९ कारखाने ऑक्सिजननिर्मिती करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.