शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेकवर्क पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी १४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर ...

लोकमत न्यूज नेकवर्क

पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी १४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर तयार केली. इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे १०८ कोटी लिटरचे उद्दिष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे.

इथेनॉल विक्रीतून रक्कम रोख मिळाल्याने कारखान्यांना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे शक्य झाले. एकूण ९३ टक्के एफआरपी दिली गेली. १९ कारखान्यांवर सुमारे ४५० कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही म्हणून जप्तीची कारवाई झाली. आणखी १० कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकाही ऊसऊत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दक्ष राहणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. अर्थ विभागाचे संचालक ज्ञानदेव मुकणे, उपपदार्थ सहसंचालक संजय भोसले, पांडुरंग शेळके (विकास), उत्तम इंदलकर, राजेश सुरवसे (प्रशासन) या वेळी उपस्थित होते.

इथेनॉल निर्मितीमुळे उतारा कमी झाला. मात्र, त्याची किंमत जमेस धरली जाणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे गायकवाड म्हणाले. राज्यात यंदा १०१२ लाख टन उसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला. आजमितीस राज्यात कुठेही गाळपासाठी ऊस शिल्लक नाही.

चौकट

‘जवाहर’चा पहिला नंबर

हातकणंगले (ता. हुपरी, जि. कोल्हापूर) येथील जवाहर कारखान्याने राज्यात सर्वाधिक १८.८८ लाख टन उसाचे गाळप केले. याच कारखान्याने सर्वाधिक ५२८ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी दिले. त्यांच्याकडून २२ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव कारखान्यांबरोबरच आता आणखी १९ कारखाने ऑक्सिजननिर्मिती करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.