शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १९० कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेकवर्क पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी १४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर ...

लोकमत न्यूज नेकवर्क

पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांंनी यंदा सरासरी १४० दिवस गाळप करून १०६ लाख टन साखर तयार केली. इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे १०८ कोटी लिटरचे उद्दिष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे.

इथेनॉल विक्रीतून रक्कम रोख मिळाल्याने कारखान्यांना ऊसउत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाची रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे शक्य झाले. एकूण ९३ टक्के एफआरपी दिली गेली. १९ कारखान्यांवर सुमारे ४५० कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही म्हणून जप्तीची कारवाई झाली. आणखी १० कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे. एकाही ऊसऊत्पादक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी दक्ष राहणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. अर्थ विभागाचे संचालक ज्ञानदेव मुकणे, उपपदार्थ सहसंचालक संजय भोसले, पांडुरंग शेळके (विकास), उत्तम इंदलकर, राजेश सुरवसे (प्रशासन) या वेळी उपस्थित होते.

इथेनॉल निर्मितीमुळे उतारा कमी झाला. मात्र, त्याची किंमत जमेस धरली जाणार असल्याने त्यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, असे गायकवाड म्हणाले. राज्यात यंदा १०१२ लाख टन उसाचे गाळप झाले. १२ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला. आजमितीस राज्यात कुठेही गाळपासाठी ऊस शिल्लक नाही.

चौकट

‘जवाहर’चा पहिला नंबर

हातकणंगले (ता. हुपरी, जि. कोल्हापूर) येथील जवाहर कारखान्याने राज्यात सर्वाधिक १८.८८ लाख टन उसाचे गाळप केले. याच कारखान्याने सर्वाधिक ५२८ कोटी रुपये ‘एफआरपी’पोटी दिले. त्यांच्याकडून २२ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव कारखान्यांबरोबरच आता आणखी १९ कारखाने ऑक्सिजननिर्मिती करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.