शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कोरोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता १-२ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

पुणे : कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर विकसित होणाऱ्या अंँटिबॉडी किती दिवस टिकतात, पुन्हा लागण होण्याची शक्यता किती असते, ...

पुणे : कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर विकसित होणाऱ्या अंँटिबॉडी किती दिवस टिकतात, पुन्हा लागण होण्याची शक्यता किती असते, याबाबत विविध स्तरांवर संशोधन सुरू आहे. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलतर्फे याबाबतचे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनानुसार, १०८० लोकांपैकी केवळ १३ लोकांना कोरोनाची पुन्हा लागण झाली. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा लागण होण्याचे प्रमाण केवळ १.२० टक्केच असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

साथरोगतज्ज्ञ आणि वैद्यकतज्ज्ञांच्या टीमकडून पिंपरी चिंचवड परिसरात सिरो सर्वेक्षण करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील ५००० लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ३४ टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात अ‍ँटिबॉडी विकसित झाल्याचे दिसून आले. यावर्षी जून महिन्यात १७०० लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यापैकी १०८० लोकांशी संपर्क झाला. त्यांचा फॉलो अप घेतला असता, १०८० लोकांपैकी केवळ १३ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यांना झालेली लागणही सौम्य स्वरुपाची होती. म्हणजेच, सिरो सर्वेक्षणानंतर ८ महिन्यांनी बहुतांश लोकांच्या शरीरात आयजीजी अँटिबॉडी उपस्थित असल्याचे दिसून आले. नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकू शकते, याचा प्रत्यय आल्याची माहिती मुख्य संशोधक अमितव बॅनर्जी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर लागण होऊन गेलेल्या लोकसंख्येमध्ये विकसित होणाऱ्या अँटिबॉडी किमान वर्षभर राहू शकतात, असे जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एकदा कोरोना होऊन गेल्यावर पुन्हा लागण होण्याची शक्यता कमी असते, असेही निष्कर्ष समोर येत आहेत. त्यामुळेच तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरियंट समोर येत असताना शरीरात कोरोनानंतर विकसित झालेली नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती अथवा लसीकरणानंतर विकसित झालेली रोगप्रतिकारकशक्तीची परिणामकारकता कमी होते का, याबद्दलही अभ्यास सुरु आहे.

-------------------

एकदा कोरोना होऊन गेल्यावर पुन्हा लागण होण्याची शक्यता १-२ टक्केच असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून समोर आला आहे. लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या अँटिबॉडीप्रमाणेच कोरोनाची लागण होऊन गेल्यावर विकसित होणारी नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्तीही दीर्घकाळ टिकू शकते. अँटिबॉडीचे प्रमाण कमी झाले तरी टी-सेल, मेमरी सेल शरीरात सक्रिय होतात.

- अमितव बॅनर्जी