शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भाजपचा सामना करण्यासाठी बंगालमध्ये होणार महाआघाडी? काँग्रेस-डाव्यांना TMCचं निमंत्रण

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 13, 2021 19:15 IST

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत...

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत...रॉय म्हणाले, वेगवेगळ्या ठिकाणी भोजन करण्याऐवजी त्यांनी सीमेवर जाऊन, बीएसएफ अपले काम व्यवस्थित करते की नाही, हे बघायला हवे होते.ममता बॅनर्जी याच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या खरा चेहरा - रॉय

कोलकाता - काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या पक्षांनी भाजपच्या सांप्रदायिक तसेच फुटिरतावादी राजकारणाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ द्यावी, असे आवाहन तृणमूल काँग्रेसने केले आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार सौगत रॉय यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले, ''जर डावे आणि काँग्रेस खरोखरच भाजपविरोधात आहेत, तर त्यांनी भाजपच्या सांप्रदायिक तथा फुटिरतावादी राजकारणाविरोधातील लढाईत ममता बॅनर्जी यांना साथ द्यायला हवी.'' एवढेच नाही, तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी याच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या खरा चेहरा आहेत, असेही रॉय म्हणाले.

यावेळी रॉय यांनी दावा केला, की केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील सरकारने सुरू केलेली एकही योजना यशस्वी झाली नाही. तसेच, तृणमूल काँग्रेसचा विकासासंदर्भात योग्य टीका करण्यावर विश्वास आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय स्वरूप घेतलेल्या पशू-तस्करीसंदर्भात बोलताना रॉय म्हणाले, हे रोखण्याची जबाबदारी राज्य पोलिसांची नसून, सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) आहे. बीएसएफ, देशाच्या सीमांचे संरक्षण करत असते आणि ते केंद्र सरकारच्या आधीन आहेत. यामुळे सीमेवरील पुश-तस्करी रोखणे, ही पोलिसांची नाही, तर त्यांचीच जबाबदारी आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणासाधत रॉय म्हणाले, ''वेगवेगळ्या ठिकाणी भोजन करण्याऐवजी त्यांनी सीमेवर जाऊन, बीएसएफ अपले काम व्यवस्थित करते की नाही, हे बघायला हवे होते." गेल्या महिन्यात शाह पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले होते. 

अनेक नेते सोडतायत टीएमसीची साथ -पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापूर्वी टीएमसीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सर्वप्रथम सुवेंदू अधिकारी यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आणि ते भाजपत दाखल झाले. त्यांच्याशिवाय त्यांचे अनेक समर्थक आणि टीएमसी आमदारही पक्ष सोडून भाजपत गेले.

पक्षात अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांचा दबदबा वाढल्यापासून पक्षाचे काम व्यवस्थितपणे सुरू नाही, असा आरोप टीएमसीला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांनी केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले होते, की काही जणांना नेल्याने त्यांच्या पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही. बंगालमध्ये टीएमसीचेच सरकार बनेल.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक