शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचा सामना करण्यासाठी बंगालमध्ये होणार महाआघाडी? काँग्रेस-डाव्यांना TMCचं निमंत्रण

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: January 13, 2021 19:15 IST

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत...

ठळक मुद्देपश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत...रॉय म्हणाले, वेगवेगळ्या ठिकाणी भोजन करण्याऐवजी त्यांनी सीमेवर जाऊन, बीएसएफ अपले काम व्यवस्थित करते की नाही, हे बघायला हवे होते.ममता बॅनर्जी याच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या खरा चेहरा - रॉय

कोलकाता - काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या पक्षांनी भाजपच्या सांप्रदायिक तसेच फुटिरतावादी राजकारणाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना साथ द्यावी, असे आवाहन तृणमूल काँग्रेसने केले आहे. येथे एप्रिल-मे महिन्यात 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 

तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार सौगत रॉय यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले, ''जर डावे आणि काँग्रेस खरोखरच भाजपविरोधात आहेत, तर त्यांनी भाजपच्या सांप्रदायिक तथा फुटिरतावादी राजकारणाविरोधातील लढाईत ममता बॅनर्जी यांना साथ द्यायला हवी.'' एवढेच नाही, तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी याच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या खरा चेहरा आहेत, असेही रॉय म्हणाले.

यावेळी रॉय यांनी दावा केला, की केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील सरकारने सुरू केलेली एकही योजना यशस्वी झाली नाही. तसेच, तृणमूल काँग्रेसचा विकासासंदर्भात योग्य टीका करण्यावर विश्वास आहे. पश्चिम बंगालमध्ये राजकीय स्वरूप घेतलेल्या पशू-तस्करीसंदर्भात बोलताना रॉय म्हणाले, हे रोखण्याची जबाबदारी राज्य पोलिसांची नसून, सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) आहे. बीएसएफ, देशाच्या सीमांचे संरक्षण करत असते आणि ते केंद्र सरकारच्या आधीन आहेत. यामुळे सीमेवरील पुश-तस्करी रोखणे, ही पोलिसांची नाही, तर त्यांचीच जबाबदारी आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्यावर निशाणासाधत रॉय म्हणाले, ''वेगवेगळ्या ठिकाणी भोजन करण्याऐवजी त्यांनी सीमेवर जाऊन, बीएसएफ अपले काम व्यवस्थित करते की नाही, हे बघायला हवे होते." गेल्या महिन्यात शाह पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले होते. 

अनेक नेते सोडतायत टीएमसीची साथ -पश्चिम बंगालमध्ये येणाऱ्या मे महिन्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापूर्वी टीएमसीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सर्वप्रथम सुवेंदू अधिकारी यांनी मंत्री पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला आणि ते भाजपत दाखल झाले. त्यांच्याशिवाय त्यांचे अनेक समर्थक आणि टीएमसी आमदारही पक्ष सोडून भाजपत गेले.

पक्षात अभिषेक बॅनर्जी आणि प्रशांत किशोर यांचा दबदबा वाढल्यापासून पक्षाचे काम व्यवस्थितपणे सुरू नाही, असा आरोप टीएमसीला रामराम ठोकणाऱ्या नेत्यांनी केला आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले होते, की काही जणांना नेल्याने त्यांच्या पक्षावर कसलाही परिणाम होणार नाही. बंगालमध्ये टीएमसीचेच सरकार बनेल.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक