शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

"संधीची वाटच पाहतोय! फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नव्याने सरकार स्थापन करू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 06:14 IST

Ramdas Athavle News औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याने, उद्धव ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे सांगता येत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत असल्याने, उद्धव ठाकरे किती दिवस मुख्यमंत्री राहतील, हे सांगता येत नाही. या संधीची आम्ही वाटच बघत असून, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सरकार स्थापन करू, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले पालघरमध्ये आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा प्रश्न महत्त्वाचा नसून कोणीही वाद करू नये. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता होती. मागच्या आमच्या सरकारमध्येही ते सत्तेत सहभागी असताना त्यांनी नामांतराबाबत काहीही निर्णय घेतला नाही. सध्या नामांतरावरून शिवसेना-काँग्रेसमध्ये जोराचे मतभेद सुरू असल्याने काँग्रेस कधीही आपला पाठिंबा काढून घेऊ शकते. त्यामुळे या संधीची आम्ही वाटच बघत असल्याने, आमच्या ११७ आमदारांसह देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे आठवले यांनी सांगितले.यूपीएमध्ये शरद पवारांना अध्यक्षपद द्यावे, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मागणीला काँग्रेसमधून विरोध आहे. आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याने काँग्रेसमध्ये तणाव असल्याचेही आठवले यांनी सांगितले.  

वाढवण बंदरासाठी ६५ हजार कोटींची गुंतवणूक   n वाढवण बंदर प्रोजेक्टसाठी केंद्र शासनाने ६५ हजार कोटींची गुंतवणूक केल्याने सव्वालाख लोकांना रोजगार उत्पन्न होणार आहे. यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि जमिनींचा चांगला मोबदला मिळणार आहे. त्यामुळे वाढवण बंदराला विरोध न करता पाठिंबा द्यावा, असे सांगून आपला वाढवण बंदराला पाठिंबा असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पालघरमध्ये केली.n देशातील सर्वात मोठे बंदर म्हणून वाढवण बंदर ओळखले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६५ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. स्थानिकांचा या वाढवण बंदराला विरोध असून मच्छीमार व्यवसायाला धोका निर्माण होणार असल्याची माझी माहिती आहे. परंतु माझी सर्वांना नम्र विनंती आहे की, बऱ्याच वर्षांनंतर इतका महत्त्वपूर्ण आणि मोठा प्रोजेक्ट होणार आहे. 

n वाढवण प्रोजेक्टमुळे सव्वालाख लोकांना रोजगार निर्माण होऊन स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. यात अनेकांचा फायदा होणार असून दुसरीकडे रस्त्यासाठी ५५० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना