शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

तृणमूल काँग्रेस महाराष्ट्रात निवडणुका लढवणार? ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 17:35 IST

शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जात भेट घेतली

मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असल्याने ममता बॅनर्जींची(Mamata Banerjee) भेट होऊ शकली नाही. परंतु शिवसेनेचे नेते मंत्री आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली.

शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांनी माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर जात भेट घेतली. या भेटीत ममता-पवार यांनी २०२४ च्या निवडणुकांबाबत चर्चा केली. या चर्चेत राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधात सक्षम पर्याय देण्याबाबत संवाद झाला. त्यासाठी भाजपाविरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे या भेटीत ममता यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेतृत्वावर टीका केली. त्याला पवारांनीही समर्थन दिले.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपाला धूळ चारली. अगदी पंतप्रधानांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र त्याठिकाणी भाजपाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता राष्ट्रीय स्तरावर मोर्चा उघडला आहे. गोवा, त्रिपुरा, मेघालय यासारख्या राज्यात ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने शिरकाव केला आहे. या राज्यातील प्रमुख नेते टीएमसीत प्रवेश करत असल्याने ममता बॅनर्जींच्या राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने जोरदार पाऊल टाकण्याचे संकेत मिळत आहेत.

त्यातच ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्याने महाराष्ट्रातही तृणमूल काँग्रेसचा शिरकाव होणार का? असा प्रश्न सगळीकडून विचारला जात होता. त्यावर ममता बॅनर्जींनीही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात मी येत नाही असं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामागे कारण दिलंय की, जिथं जिथं प्रादेशिक पक्ष चांगले काम करत आहेत तिथं टीएमसी जाणार नाही. ज्याठिकाणी भाजपाविरोधात ताकदीची गरज आहे तिथे आम्ही त्या ताकदीसोबत उभं राहणार आहोत. प्रादेशिक पक्षांना साथ देणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

 

शरद पवारांनी केले ममता बॅनर्जींचे स्वागत

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र जुने नाते आहे. भाजपविरोधात जे एकत्र येतील त्या पक्षांचे स्वागत असेल. भाजपाविरोधात देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्तरावर एकसारखा विचार करणाऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. २०२४ च्या निवडणुकीत हा पर्याय उपलब्ध हवा. त्यासाठीच आमची भेट झाल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवार