शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कोपरी पाचपाखाडीमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी साधला विजयाचा चौकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 22:17 IST

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णायक आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत ठेवत ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला.

ठळक मुद्दे८९ हजार ३०० चे मताधिक्यपहिल्या फेरीपासूनच आघाडीमतदारांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला. त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा पराभव करून विजयाचा चौकार साधला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मतदारांनी दाखविलेले प्रेम आणि आशीर्वाद यामुळे हा विजय मिळवू शकल्याची प्रतिक्रिया विजयानंतर त्यांनी व्यक्त केली.मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. पहिल्या फेरीत त्यांना चार हजार २३० मते मिळाली. त्यावेळी काँग्रेसच्या घाडीगावकर यांना ८९८, तर मनसेच्या महेश यांना ५५५ मते मिळाली. वंचित आघाडीचे उन्मेष बागवे हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना अवघी २३१ मते मिळाली. पुढे २७ व्या फेरीपर्यंत शिंदे यांनी आघाडी कायम राखली. एक लाख १३ हजार ४९७ अर्थात एकूण मतदानाच्या ६५.३६ टक्के मते मिळवून ते विजयी झाले. पराभूत घाडीगावकर यांना २४ हजार १९७ मते मिळाली. तर, मनसेच्या कदम यांना २१ हजार ५१३ मते मिळाली. २०१४ मध्ये शिवसेना व भाजप युती नसतानाही शिंदे यांना एक लाख १४८ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपच्या संदीप लेले यांचा त्यांनी पराभव केला होता. गेल्या विधानसभेच्या शिवसेना, भाजपच्या एक लाख ४८ हजार ५९५ मतांसह एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिंदे यांना होता. अपेक्षित मताधिक्य साधता न आल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान, २००९ मध्येही ३२ हजार ७७६ चे मताधिक्य शिंदे यांना होते. २०१४ च्या तुलनेत यावेळी १३ हजार ३४९ चे मताधिक्य त्यांना मिळाले आहे. यावेळी ८९ हजार ३०० चे मताधिक्य साधून चौथ्यांदा यशस्वी ठरल्याने चौदाव्या फेरीलाच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचा सत्कार करून जल्लोष केला.‘‘महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत, मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या जोरावर ही निवडणूक जिंकलो. सर्व मतदार, कार्यकर्ते तसेच आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी देणाऱ्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे.’’एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित आमदार, कोपरी-पाचपाखाडी..................‘‘जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून ठाणे शहराला व ठाणेकरांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. ’’संजय घाडीगावकर, पराभूत उमेदवार, काँग्रेस.........................नोटाचे प्रमाण २.९६ टक्केया मतदारसंघात ४४३ पैकी ३४४ मतदारांनी शिंदे यांना टपाली मतदानातून कौल दिला. काँग्रेसच्या घाडीगावकर यांना २२ मते मिळाली. तब्बल पाच हजार १४७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले. हे प्रमाण एकूण मतदानाच्या २.९६ इतके टक्के आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकkopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी