शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

फुटिरवादी राजकारण हाणून पाडा- प्रियांका गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 04:02 IST

खोटारड्या व्यक्तीला मते देऊ नका; सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करा

फतेहपूर : नकारात्मक तसेच फूट पाडणाऱ्या राजकारणाला हद्दपार करा. जो व्यक्ती खोटारडेपणा करतो, जनतेची कामे करत नाही त्याला मते देऊ नका, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मतदारांना बुधवारी केले. मात्र त्यांनी यासंदर्भात भाजप वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घ्यायचे टाळले.प्रचारसभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, सध्या गंभीर परिस्थितीतून जात असलेला आपल्या देशाला वाचविण्यासाठी तसेच भावी पिढ्यांचा विचार करून मतदारांनी भेदभाव करणाºया प्रवृत्तींना, त्यांच्या राजकारणाला अजिबात थारा देऊ नये. फुटिरवादी राजकारण हाणून पाडायला हवे. जनतेच्या समस्या समजून घेणाºया, त्या सोडविण्याची धडपड करणाऱ्यांनाच पाठिंबा द्या. लोकशाहीमध्ये जनशक्ती सर्वात महत्त्वाची आहे.मतदानाचा अधिकार हे आपले मोठे सामर्थ्य आहे. ते त्याच्या हातातील ते मोठे शस्त्रही आहे. सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून प्रत्येकाने या हक्काचा उपयोग करायला हवा, असे प्रियांका गांधी प्रचारसभे म्हणाल्या. प्रियांका गांधी यांच्या राजकीय हालचाली व भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवेन असे प्रियांका गांधी यांनी सांगितल्याने त्याबाबतची उत्सुकताही ताणली गेली आहे. मोदींविरोधात प्रियांका गांधी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेस नेते, कार्यकर्ते सातत्याने करत असतात. (वृत्तसंस्था)हे खपवून घेऊ नकादेशात गेर्लं पाच वर्षे फुटिरवादी राजकारणाला बळ देण्याचे काम सुरू आहे. सामान्य जनतेत जात, धर्म, पंथ, भाषा याआधारे फूट पाडण्याचे प्रयत्न जनतेने खपवून घेता कामा नयेत.कोणी काय खावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण त्यातही सरकार व पक्ष हस्तक्षेप करू पाहत आहेत. विविधतेतील एकता पुसण्याचा हा डाव फार काळ चालणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधी