शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 18:19 IST

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिला हात

कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी झिडकारला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं म्हणत खोत यांनी दिलजमाईचे संकेत दिले होते. मात्र खोत यांचे परतीचे दोर कापण्यात आल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. ज्यांना संघटनेनं समिती नेमून हाकलून दिलं, त्यांचा परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले.जिल्हाच्या राजकारणात भाजपकडून डावललं जात असल्यानं सध्या सदाभाऊ खोत नाराज असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी राजू शेट्टींना हात देण्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र राजू शेट्टींनी खोतांना पुन्हा सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला. संघटनेत काम करण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष आहेत. स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य. या दोन्ही गोष्टी खोत यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्यांना संघटनेत पुन्हा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं शेट्टींनी म्हटलं.राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?आपल्या आणि राजू शेट्टींच्या मागण्या एकच असून शेतकऱ्यांचं हित हेच प्राधान्य असल्याचं खोत म्हणाले होते. मात्र खोत यांच्या विधानांचा शेट्टींनी समाचार घेतला. 'शेतकऱ्यांबद्दल अनेक जण पुतना मावशीचं प्रेम दाखवतात. पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर त्यांनी कडकनाथमध्ये अडकलेले शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत. कदाचित त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल, म्हणून ते आता असं बोलत असावेत. मात्र त्यांच्या मायावी बोलण्याला आम्ही फसणार नाही,' अशी टीका राजू शेट्टींनी केली.काय म्हणाले सदाभाऊ खोत?शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमचं काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमचं आणि त्यांचं मत एकच आहे, असं सदाभाऊ म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न खोत यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्यानं आमच्यात दरी निर्माण झाली, असं खोत पुढे म्हणाले. सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींचं राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपनं त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपवर नाराज असल्याचं समजतं. केंद्रानं आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोतांनी टीका केली होती. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी