शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 18:19 IST

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिला हात

कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी झिडकारला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं म्हणत खोत यांनी दिलजमाईचे संकेत दिले होते. मात्र खोत यांचे परतीचे दोर कापण्यात आल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. ज्यांना संघटनेनं समिती नेमून हाकलून दिलं, त्यांचा परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले.जिल्हाच्या राजकारणात भाजपकडून डावललं जात असल्यानं सध्या सदाभाऊ खोत नाराज असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी राजू शेट्टींना हात देण्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र राजू शेट्टींनी खोतांना पुन्हा सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला. संघटनेत काम करण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष आहेत. स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य. या दोन्ही गोष्टी खोत यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्यांना संघटनेत पुन्हा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं शेट्टींनी म्हटलं.राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?आपल्या आणि राजू शेट्टींच्या मागण्या एकच असून शेतकऱ्यांचं हित हेच प्राधान्य असल्याचं खोत म्हणाले होते. मात्र खोत यांच्या विधानांचा शेट्टींनी समाचार घेतला. 'शेतकऱ्यांबद्दल अनेक जण पुतना मावशीचं प्रेम दाखवतात. पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर त्यांनी कडकनाथमध्ये अडकलेले शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत. कदाचित त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल, म्हणून ते आता असं बोलत असावेत. मात्र त्यांच्या मायावी बोलण्याला आम्ही फसणार नाही,' अशी टीका राजू शेट्टींनी केली.काय म्हणाले सदाभाऊ खोत?शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमचं काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमचं आणि त्यांचं मत एकच आहे, असं सदाभाऊ म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न खोत यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्यानं आमच्यात दरी निर्माण झाली, असं खोत पुढे म्हणाले. सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींचं राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपनं त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपवर नाराज असल्याचं समजतं. केंद्रानं आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोतांनी टीका केली होती. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी