शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ खोतांना पुन्हा सोबत घेणार?; 'ते' दोन निकष उपस्थित करत राजू शेट्टी म्हणाले...

By कुणाल गवाणकर | Updated: November 16, 2020 18:19 IST

राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना दिला हात

कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी पुढे केलेला मैत्रीचा हात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी झिडकारला आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं म्हणत खोत यांनी दिलजमाईचे संकेत दिले होते. मात्र खोत यांचे परतीचे दोर कापण्यात आल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलं. ज्यांना संघटनेनं समिती नेमून हाकलून दिलं, त्यांचा परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचं राजू शेट्टी म्हणाले.जिल्हाच्या राजकारणात भाजपकडून डावललं जात असल्यानं सध्या सदाभाऊ खोत नाराज असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी राजू शेट्टींना हात देण्याचे स्पष्ट संकेत दिले. मात्र राजू शेट्टींनी खोतांना पुन्हा सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला. संघटनेत काम करण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष आहेत. स्वच्छ हात आणि स्वच्छ चारित्र्य. या दोन्ही गोष्टी खोत यांच्याकडे नाहीत. त्यामुळे त्यांना संघटनेत पुन्हा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं शेट्टींनी म्हटलं.राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना हात?आपल्या आणि राजू शेट्टींच्या मागण्या एकच असून शेतकऱ्यांचं हित हेच प्राधान्य असल्याचं खोत म्हणाले होते. मात्र खोत यांच्या विधानांचा शेट्टींनी समाचार घेतला. 'शेतकऱ्यांबद्दल अनेक जण पुतना मावशीचं प्रेम दाखवतात. पण मगरीचे अश्रू ढाळणाऱ्यांबद्दल आम्हाला काहीच वाटत नाही. सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांचा इतकाच कळवळा असेल, तर त्यांनी कडकनाथमध्ये अडकलेले शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत. कदाचित त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल, म्हणून ते आता असं बोलत असावेत. मात्र त्यांच्या मायावी बोलण्याला आम्ही फसणार नाही,' अशी टीका राजू शेट्टींनी केली.काय म्हणाले सदाभाऊ खोत?शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमच्यात काही वाद झाले. आमचं काही शेताच्या बांधावरचं भांडण नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारणीत आम्ही शेतकऱ्यांना एफआरपी एकरकमी मिळावा, अशी मागणी केली. स्वाभिमानीचीदेखील तीच मागणी आहे. चांगल्याला चांगली म्हणण्याची दानत आमच्यात आहे. आमचं आणि त्यांचं मत एकच आहे, असं सदाभाऊ म्हणाले. ते 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीशी बोलत होते.तुमची आणि राजू शेट्टींची मागणी आणि भूमिका एकच असली तर मग एकत्र येणार का, असा प्रश्न खोत यांना विचारण्यात आला. त्यावर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं अतिशय सूचक विधान त्यांनी केलं. काही मुद्द्यांवरून आमचे मतभेद झाले. पण आमची विचारधारा एकच आहे. राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेल्यानं आमच्यात दरी निर्माण झाली, असं खोत पुढे म्हणाले. सदाभाऊ खोत भाजपवर नाराज?स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडून खोत यांनी रयत क्रांती संघटना उभारली. राजू शेट्टींचं राजकारण कमकुवत करण्यासाठी भाजपनं त्यांच्याशी जवळीक साधली. मात्र आता जिल्ह्यातल्या राजकारणात त्यांना डावललं जात असल्याचा आरोप त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे खोत भाजपवर नाराज असल्याचं समजतं. केंद्रानं आणलेल्या शेतकरी कायद्यांवरही खोतांनी टीका केली होती. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी