शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
4
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
5
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
6
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
7
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
8
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
9
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
10
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
11
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
12
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
13
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
15
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
16
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
17
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
18
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
19
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
20
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray: भाजपाने राज ठाकरेंना दाखवला मुस्कटदाबीचा 'खरा' व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 13:04 IST

भाजपाने 'बघाच तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंना 'जशास तसं' उत्तर दिलं.

ठळक मुद्देमोदी सरकारकडून प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता.मुस्कटात मारणाऱ्यांनी आम्हाला मुस्कटदाबी शिकवू नये - आशिष शेलारराज ठाकरे यांनीच आपल्या सैनिकांना, ट्रोलर्सना ठोकून काढण्याचे आदेश दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राज्यभर सभा घेणाऱ्या, 'ए लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदींवर आरोपांचे बाण सोडणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज भाजपाने 'बघाच तो व्हिडीओ' म्हणत 'जशास तसं' उत्तर दिलं. नरेंद्र मोदी विरोधात असताना काय बोलायचे आणि सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका कशी बदलली, त्यांनी केलेले दावे कसे खोटे आहेत, नोटाबंदीने देश कसा खड्ड्यात गेला, देशभरात हुकूमशाही कशी सुरू आहे, या संदर्भातील व्हिडीओ राज ठाकरे यांनी अनेक सभांमध्ये दाखवले होते. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावर, टीका केली म्हणून मुस्कटात मारणाऱ्यांनी आम्हाला मुस्कटदाबी शिकवू नये, अशी चपराक मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावली आणि सोबत आकडे आणि व्हिडीओही दाखवले. 

६ एप्रिल ते २६ एप्रिलपर्यंत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. या २० दिवसांत २,६०० मिनिटं इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज ठाकरे दिसत होते. म्हणजेच, दिवसभरात १३० मिनिटं त्यांचं दर्शन घडत होतं. जर मीडियावर भाजपाचा किंवा सरकारचा दबाव असता तर हे झालं असतं का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला. त्यानंतर स्क्रीनवर तीन व्हिडीओ दाखवण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एका मराठी वृत्तवाहिनीला प्रवेश बंदी केल्याची बातमी त्यात होती. उर्वरित दोन व्हिडीओंमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी ट्रोलर्सना केलेली मारहाण होती. राज ठाकरेंवर टीका केली म्हणून मनसैनिकांनी काही जणांना घरी जाऊन मारहाण केल्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी घडले होते. किंबहुना, राज ठाकरे यांनीच जाहीर कार्यक्रमात आपल्या सैनिकांना, ट्रोलर्सना ठोकून काढण्याचे आदेश दिले होते. तोच आधार घेत, दुसऱ्यावर आरोप करणाऱ्याने आधी स्वतःकडे पाहावे, असा टोला शेलारांनी लगावला. 

कुठे गेले हे शिलेदार?

मनसेच्या स्थापनेवेळी जे राज यांच्यासोबत होते, त्यांच्यापैकी अनेक शिलेदारांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यावरूनही भाजपाने राज यांना लक्ष्य केलं. शिशीर शिंदे, वसंत गीते, प्रवीण दरेकर, श्वेता परुळेकर, अतुल चांडक, दगंबर कांडरकर, दीपक पायगुडे, शिरीष पारकर यांच्यापैकी कुणीही राज ठाकरेंसोबत राहिलेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. 

मित्रा, तू खरंच चुकलास!

जे चुकतंय त्यावर टीका व्हायलाच हवी. त्यामुळे टीकेला विरोध करायचं कारण नाही. आजची सभा हा प्रतिहल्ला किंवा प्रतिशोध नाही. पलटवार किंवा व्यक्तिगत आरोपही आम्ही करणार नाही. केवळ सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी ही सभा असल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. कुठलेही ठोस पुरावे नसताना, माहितीची खातरजमा न करता, भाषणं तोडून-मोडून दाखवत राज यांनी मोदी सरकारवर आरोप केल्याचं त्यांनी नमूद केलं आणि 'मित्रा तू खरंच चुकलास', अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. राज ठाकरे आणि आशिष शेलार हे राजकीय विरोधक असले तरी चांगले मित्र असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे.