शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

बिहारमध्ये NDA सरकारवर संकट?; जेलमधून लालू प्रसाद यादवांचा आमदारांना फोन, मोदींचा गंभीर आरोप

By प्रविण मरगळे | Updated: November 24, 2020 22:51 IST

Bihar BJP Sushil Modi, Lalu Prasad yadav News: तुम्ही करताय ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने करत आहात, यात अयशस्वी व्हाल असं मोदींनी लालू प्रसाद यादव यांना सांगितलं.

ठळक मुद्देरांचीमधून लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करत आहेत, या आमदारांना महाआघाडीत येण्यासाठी गळ घालत आहेतइतकचं नाही तर लालूंनी अनेक नेत्यांना मंत्रिपद देण्याचं आमिषदेखील दाखवलं हळूहळू निकाल बदलले आणि महाआघाडीला मागे टाकत एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवलं

पटणा – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आले, त्याठिकाणी जेडीयू आणि भाजपाचं सरकार स्थापन झालं, परंतु अवघ्या काही दिवसांतच एनडीएच्या सरकारवर संकट येण्याची चिन्हे दिसत आहेत. बिहारमध्ये भाजपाला ७४ जागा मिळाल्या तर जेडीयूला ४३ जागा मिळाल्या आहेत, एनडीएला बिहारमध्ये काठावरचं बहुमत असल्याने आगामी काळात सरकार कोसळण्याचं संकट कायम आहे.

यातच बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा आरोप लावला आहे. लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करून त्यांना महाआघाडीत सहभागी होण्यासाठी लालच देत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. याबाबत सुशील मोदींनी ट्विटमध्ये लिहिलंय की, रांचीमधून लालू प्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना फोन करत आहेत, या आमदारांना महाआघाडीत येण्यासाठी गळ घालत आहेत. इतकचं नाही तर लालूंनी अनेक नेत्यांना मंत्रिपद देण्याचं आमिषदेखील दाखवलं असल्याचं त्यांनी सांगितले.

सुशील कुमार मोदींनी या ट्विटमध्ये एक नंबरही जारी केला आहे. माहिती मिळाल्यानंतर मी लालू प्रसाद यादव यांना 8051216302 या नंबरवर कॉल केला, त्यांनी फोन उचलला. तुम्ही करताय ते बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने करत आहात, यात अयशस्वी व्हाल असं मोदींनी लालू प्रसाद यादव यांना सांगितलं.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सुरुवातीला महाआघाडीचं सरकार बनेल अशी खात्री वाटत होती, मात्र हळूहळू निकाल बदलले आणि महाआघाडीला मागे टाकत एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवलं, एनडीएला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या, यावेळी महाआघाडीने राज्यात सरकार बनवणार असल्याचं अनेकदा सांगितले.

आम्ही हरलो नाही, आम्हाला हरवलं गेलं

बिहार निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादव यांनी बिहारमधील जनतेचे आभार मानले होते, तसेच बिहारची जनता आमच्या सोबत असल्याचं म्हटलं आहे. आम्ही हरलो नसून आम्हाला हरवलं गेलं आहे असं देखील तेजस्वी यांनी म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी पोस्टल बॅलेट पुन्हा एकदा मोजण्यात यावीत अशी मागणी केली होती. "जनादेश महाआघाडीसोबत होता, मात्र निवडणूक आयोगाचा निकाल एनडीच्या पक्षात होता. हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाल्यानंतर मते आमच्या बाजूने होती, मात्र भाजपाने सत्ता हस्तगत करण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला" असं देखील तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. उमेदवाराच्या मनातील संशय दूर करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. तेव्हा पुन्हा मतं मोजणं अत्यंत आवश्यक असल्याचं देखील ते म्हणाले. या बरोबरच आम्हाला रेकॉर्डिंग दाखवणेही आवश्यक आहे असंही तेजस्वी यादव यांनी सांगितले होते.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक