शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘आरेला कारे’मध्ये कार्यकर्त्यांची फरफट

By admin | Updated: January 23, 2017 02:55 IST

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांना प्रवेश देत असल्याने भाजपा गुंडांचा पक्ष होत असल्याची खरमरीत टीका करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही. परंतु, आमच्या वाटेला कोणी गेले, तर ‘आरे ला कारे’ उत्तर देण्याची तयारी आहे. आरे ला कारे या पद्धतीने आम्हीही कृती करू शकतो, असे संकेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.’ त्यानंतर दुस-याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर ‘दादा, आता तरी दादागिरी थांबवा’ अशी नाव न घेता टीका केली. टीकेमागील उद्देश लक्षात घेतला तर राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले स्थानिक नेतेच भारती चव्हाण यांचे बोलविते धनी असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. मग, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय व राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे यांना भारती चव्हाण यांच्यावर टीका करण्यास सांगितले. महापौर पदामुळे धराडे यांचे हात अद्यापही राष्ट्रवादीच्या दगडाखाली असल्याने त्यांनी मनापासून नसलीतरी भारती चव्हाण यांचे ‘बोलविते धनी वेगळे’ असल्याची थेट टीका केली. या घटनेवरून एवढेच लक्षात येते की, नेत्यांनी ‘आरेला कारे’ने उत्तर देण्याचे आवाहन केले, तरी लढणारे सैनिक दोन्ही पक्षातील, सीमेवरील आणि पक्षांतराच्या वाटेवरील कार्यकर्तेच भरडले जाणार आहेत. हे मात्र निश्चित आहे. सध्या भाजपा-शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांचे जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. केवळ वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे एकामागून एक औपचारिक बैठका सुरू आहेत. पहिल्या बैठकीला ५०:५० असा फार्म्युला देण्यात आला. त्यानंतर शिवसेनेने ५५:५८ चा फार्म्युला देत चेंडू भाजपाच्या कोर्टात टाकला आहे. परंतु, भाजपाचे नेते १०० जागांवरून ७५ जागांपर्यंत खाली आले आहेत. त्यापेक्षा कमी जागा घेतल्यास भाजपामध्ये गटबाजी उफाळून येऊ शकते. शिवाय राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले स्थानिक नेते व समर्थकांत युतीच्या चर्चेने अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाचे होऊ घातलेले ‘राष्ट्रवादी’करण हाच युतीसाठी प्रमुख अडथळा ठरत आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख स्थानिक नेते हे आमच्या युतीची चर्चा उमेदवारी अर्ज भरेपर्यंत सुरू राहणार आहे. असे खासगीत (आॅफ द रेकार्ड) सांगतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. दुसऱ्या बाजुला महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेते व पदाधिकारी आघाडीसाठी अनुकूल प्रतिसाद देत आहेत. अजित पवार यांनी दोन्ही पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रभागांतील दोन नंबरची मते घेणारे उमेदवार असा उमेदवारी देण्याचा नवा ‘फार्म्युला’ काँग्रेसपुढे ठेवला आहे. त्यानुसार महापालिकेतली ३२ प्रभागांच्या १२८ जागांचे वाटप करायचे ठरविल्यास राष्ट्रवादीला १०० व काँग्रेसच्या वाट्याला २५ ते २८ जागा येण्याची शक्यता आहे. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचासह नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीत गेल्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे कदाचित भाजपाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील विजयाचा वारु रोखण्यासाठी दोन्ही पक्ष आघाडीस अनुकूल असल्याची सध्या तरी परिस्थिती आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची होणारी आघाडी यावरच विजयाचा फार्म्युला ठरण्याची शक्यता आहे. - हणमंत पाटील