शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

‘आरेला कारे’मध्ये कार्यकर्त्यांची फरफट

By admin | Updated: January 23, 2017 02:55 IST

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांना प्रवेश देत असल्याने भाजपा गुंडांचा पक्ष होत असल्याची खरमरीत टीका करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही. परंतु, आमच्या वाटेला कोणी गेले, तर ‘आरे ला कारे’ उत्तर देण्याची तयारी आहे. आरे ला कारे या पद्धतीने आम्हीही कृती करू शकतो, असे संकेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.’ त्यानंतर दुस-याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर ‘दादा, आता तरी दादागिरी थांबवा’ अशी नाव न घेता टीका केली. टीकेमागील उद्देश लक्षात घेतला तर राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले स्थानिक नेतेच भारती चव्हाण यांचे बोलविते धनी असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. मग, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय व राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे यांना भारती चव्हाण यांच्यावर टीका करण्यास सांगितले. महापौर पदामुळे धराडे यांचे हात अद्यापही राष्ट्रवादीच्या दगडाखाली असल्याने त्यांनी मनापासून नसलीतरी भारती चव्हाण यांचे ‘बोलविते धनी वेगळे’ असल्याची थेट टीका केली. या घटनेवरून एवढेच लक्षात येते की, नेत्यांनी ‘आरेला कारे’ने उत्तर देण्याचे आवाहन केले, तरी लढणारे सैनिक दोन्ही पक्षातील, सीमेवरील आणि पक्षांतराच्या वाटेवरील कार्यकर्तेच भरडले जाणार आहेत. हे मात्र निश्चित आहे. सध्या भाजपा-शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांचे जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. केवळ वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे एकामागून एक औपचारिक बैठका सुरू आहेत. पहिल्या बैठकीला ५०:५० असा फार्म्युला देण्यात आला. त्यानंतर शिवसेनेने ५५:५८ चा फार्म्युला देत चेंडू भाजपाच्या कोर्टात टाकला आहे. परंतु, भाजपाचे नेते १०० जागांवरून ७५ जागांपर्यंत खाली आले आहेत. त्यापेक्षा कमी जागा घेतल्यास भाजपामध्ये गटबाजी उफाळून येऊ शकते. शिवाय राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले स्थानिक नेते व समर्थकांत युतीच्या चर्चेने अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाचे होऊ घातलेले ‘राष्ट्रवादी’करण हाच युतीसाठी प्रमुख अडथळा ठरत आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख स्थानिक नेते हे आमच्या युतीची चर्चा उमेदवारी अर्ज भरेपर्यंत सुरू राहणार आहे. असे खासगीत (आॅफ द रेकार्ड) सांगतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. दुसऱ्या बाजुला महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेते व पदाधिकारी आघाडीसाठी अनुकूल प्रतिसाद देत आहेत. अजित पवार यांनी दोन्ही पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रभागांतील दोन नंबरची मते घेणारे उमेदवार असा उमेदवारी देण्याचा नवा ‘फार्म्युला’ काँग्रेसपुढे ठेवला आहे. त्यानुसार महापालिकेतली ३२ प्रभागांच्या १२८ जागांचे वाटप करायचे ठरविल्यास राष्ट्रवादीला १०० व काँग्रेसच्या वाट्याला २५ ते २८ जागा येण्याची शक्यता आहे. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचासह नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीत गेल्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे कदाचित भाजपाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील विजयाचा वारु रोखण्यासाठी दोन्ही पक्ष आघाडीस अनुकूल असल्याची सध्या तरी परिस्थिती आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची होणारी आघाडी यावरच विजयाचा फार्म्युला ठरण्याची शक्यता आहे. - हणमंत पाटील