शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

‘आरेला कारे’मध्ये कार्यकर्त्यांची फरफट

By admin | Updated: January 23, 2017 02:55 IST

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील

महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारांना प्रवेश देत असल्याने भाजपा गुंडांचा पक्ष होत असल्याची खरमरीत टीका करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘आम्ही कोणाच्या वाटेला जाणार नाही. परंतु, आमच्या वाटेला कोणी गेले, तर ‘आरे ला कारे’ उत्तर देण्याची तयारी आहे. आरे ला कारे या पद्धतीने आम्हीही कृती करू शकतो, असे संकेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.’ त्यानंतर दुस-याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी अजित पवार यांच्यावर ‘दादा, आता तरी दादागिरी थांबवा’ अशी नाव न घेता टीका केली. टीकेमागील उद्देश लक्षात घेतला तर राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले स्थानिक नेतेच भारती चव्हाण यांचे बोलविते धनी असल्याचे सर्वांच्या लक्षात आले. मग, राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्या निकटवर्तीय व राष्ट्रवादीच्या महापौर शकुंतला धराडे यांना भारती चव्हाण यांच्यावर टीका करण्यास सांगितले. महापौर पदामुळे धराडे यांचे हात अद्यापही राष्ट्रवादीच्या दगडाखाली असल्याने त्यांनी मनापासून नसलीतरी भारती चव्हाण यांचे ‘बोलविते धनी वेगळे’ असल्याची थेट टीका केली. या घटनेवरून एवढेच लक्षात येते की, नेत्यांनी ‘आरेला कारे’ने उत्तर देण्याचे आवाहन केले, तरी लढणारे सैनिक दोन्ही पक्षातील, सीमेवरील आणि पक्षांतराच्या वाटेवरील कार्यकर्तेच भरडले जाणार आहेत. हे मात्र निश्चित आहे. सध्या भाजपा-शिवसेना स्थानिक पदाधिकाऱ्यांचे जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. केवळ वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्यामुळे एकामागून एक औपचारिक बैठका सुरू आहेत. पहिल्या बैठकीला ५०:५० असा फार्म्युला देण्यात आला. त्यानंतर शिवसेनेने ५५:५८ चा फार्म्युला देत चेंडू भाजपाच्या कोर्टात टाकला आहे. परंतु, भाजपाचे नेते १०० जागांवरून ७५ जागांपर्यंत खाली आले आहेत. त्यापेक्षा कमी जागा घेतल्यास भाजपामध्ये गटबाजी उफाळून येऊ शकते. शिवाय राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले स्थानिक नेते व समर्थकांत युतीच्या चर्चेने अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाचे होऊ घातलेले ‘राष्ट्रवादी’करण हाच युतीसाठी प्रमुख अडथळा ठरत आहे. दोन्ही पक्षातील प्रमुख स्थानिक नेते हे आमच्या युतीची चर्चा उमेदवारी अर्ज भरेपर्यंत सुरू राहणार आहे. असे खासगीत (आॅफ द रेकार्ड) सांगतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. दुसऱ्या बाजुला महापालिका व जिल्हा परिषदांची निवडणूक ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील स्थानिक नेते व पदाधिकारी आघाडीसाठी अनुकूल प्रतिसाद देत आहेत. अजित पवार यांनी दोन्ही पक्षातील विद्यमान नगरसेवकांसह प्रतिस्पर्धी पक्षाच्या प्रभागांतील दोन नंबरची मते घेणारे उमेदवार असा उमेदवारी देण्याचा नवा ‘फार्म्युला’ काँग्रेसपुढे ठेवला आहे. त्यानुसार महापालिकेतली ३२ प्रभागांच्या १२८ जागांचे वाटप करायचे ठरविल्यास राष्ट्रवादीला १०० व काँग्रेसच्या वाट्याला २५ ते २८ जागा येण्याची शक्यता आहे. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांचासह नगरसेवकांचा एक गट राष्ट्रवादीत गेल्यामुळे काँग्रेसची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे कदाचित भाजपाचा स्थानिक स्वराज्य संस्थातील विजयाचा वारु रोखण्यासाठी दोन्ही पक्ष आघाडीस अनुकूल असल्याची सध्या तरी परिस्थिती आहे. महापालिका निवडणुकीत भाजपा व शिवसेनेची युती, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची होणारी आघाडी यावरच विजयाचा फार्म्युला ठरण्याची शक्यता आहे. - हणमंत पाटील