शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

कळकराईला होणार विकासाचा स्पर्श?

By admin | Updated: December 26, 2016 03:03 IST

कळकराई हे वस्तीवजा गाव सावळा ग्रामपंचायत हद्दीत आहे. सावळा गावापासून साधारणत: चार ते पाच किलोमीटर दूर असून

कळकराई हे वस्तीवजा गाव सावळा ग्रामपंचायत हद्दीत आहे. सावळा गावापासून साधारणत: चार ते पाच किलोमीटर दूर असून, येथे जाण्यासाठी रस्ता नाही. या ठिकाणी ४३ कुटुंबे राहतात. या सर्व कुटुंबांना रात्री एकत्र करून त्यांची सभा घेण्यात आली व त्यांना त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यात आल्या. ग्रामस्थांना ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत बांधावयाच्या शौचालय व त्याच्या अनुदानाची माहिती देण्यात आली. कळकराई गावासाठी सुवर्ण जयंती योजनेतून २४ शौचालय मंजूर असून, शौचालय बांधल्यानंतर सदरचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.या वेळी ग्रामस्थांनी बीडीओंकडे सभामंडप बांधून देण्याची मागणी केली. तसेच मोगरज-चौधरीवाडीमार्गे (ता. कर्जत) वनक्षेत्रातून असणाऱ्या पायवाट दुरुस्ती संदर्भात संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. गावात असणाऱ्या पाणीटंचाईसाठी पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे विस्तारीकरण व खोलीकरण करण्याचा प्रस्ताव करण्यात आला. गावात कार्यरत बचत गटांना शासकीय योजनेतून नियमानुसार होणाऱ्या पतपुरवठाचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले. ३० ते ३२ वर्षांपूर्वी गावातील घरांना आग लागली होती. त्यात घरातील सर्व कागदपत्रे जळून गेली असल्यामुळे त्यांना आता मुलांसाठी जातीचे दाखले काढता येत नसल्याचे बीडीओंना सांगण्यात आले. त्यामुळे कळकराई येथील सर्व कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुले देण्यासाठीच्या प्रस्तावाबाबत माजी सरपंच अर्जुन कावळे व ग्रामसेवक सचिन दुबके यांना मार्गदर्शन केले. या वेळी विस्तार अधिकारी एम. एस. कांबळे, महेंद्र गिरमे, संदीप औटी आदी उपस्थित होते. सावळा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या कळकराई ग्रामस्थांना दळणवळणासाठी रस्ताच नसल्याने विकास पोहोचूच शकलेला नाही.(वार्ताहर) रुग्णांना झोळीतच न्यावे लागते रुग्णालयात या गावच्या परिसरात वनक्षेत्राची हद्द असून, हे गाव रायगड जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली असून, देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना, सावळा येथून जाण्यासाठी साडेचार किलोमीटर अंतर कापत डोंगराच्या दरीतून बिकट पायवाटेने मार्ग काढावा लागतो. पावसाळ्यात डोंगराच्या दरडीचे लहान-मोठे दगड कोसळून पायवाट बंद होते.  पायवाट पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क तुटतो. गावात आरोग्य सुविधा पोहोचत नसून, अनेक रुग्ण आजार अंगावर काढत आहेत. गंभीर आजारी रुग्णाला झोळी करून बिकट दरीच्या रस्त्याने न्यावे लागते. अनेकदा रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी कसरत होते. इतर वेळी अंत्यसंस्काराच्या वेळी वणवे लागतात. वीज आली पण असते अनियमित गावात स्वच्छ पिण्याचे पाणी नसून मे महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गावात वीज आली, पण ती नियमित नसते. जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा असून, १३ विद्यार्थी पट आहे. त्यांना शिकवण्यासाठी स्थानिक शिक्षक सूर्यकांत तळपे आहेत. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च व पायपीटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्ध्यावरच सोडले आहे. ग्रामस्थांना रेशन, मतदान, ग्रामपंचायत कार्यालय व तालुक्यात जाण्यासाठी बिकट पायवाटेने ये-जा करावी लागते. पायवाटेच्या दगडावरून पाय घसरून व तोल जाऊन पडल्याने किरकोळ व गंभीर जखमी झाल्याने प्रसंगी मृत्यू ओढवल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामस्थ आपल्या नशिबाला दोष देत आहेत. कधीतरी दळणवळणासाठी रस्ता तयार होईल, या अपेक्षेत गावकरी आहेत.