शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वीजपुरवठा कधी होणार सुरळीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:52 IST

कामशेतसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कामशेत : कामशेतसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील वीजपुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मावळ तालुक्यातील मध्यवर्ती शहर कामशेतच्या आजूबाजूला अनेक गावे व वाड्यावस्त्या आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक लोक कामशेतमध्ये स्थायिक होत असल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कामशेत येथील वीजवितरण मंडळ कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे ५० गावे येत असून ७५०० ग्राहक आहेत. या भागातील ६० ते ७० किलोमीटर लांबीच्या मुख्य वीज वाहिनीची दुरुस्ती व इतर अनेक कामांसाठी कर्मचारी अत्यंत कमी संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळे बºयाचदा खंडित झालेला वीजपुरवठा वेळेवर पूर्ववत होत नाही. कार्यालयात एक कनिष्ठ उपअभियंता, दोन लाईनमॅन, दोन विद्युत सहायक व पाच आऊटसोर्सिंगचे तात्पुरत्या नेमणुकीवरील कर्मचारी आहेत. ग्राहकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी वर्ग कमी असल्याने येथील वीजविषयक समस्या गंभीर होत आहेत.कार्यालय क्षेत्रातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तसेच विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने येथे सब स्टेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कामशेत महावितरण कार्यालयातील अधिकाºयांनी वरिष्ठ पातळीवर समस्या मांडल्या. राणे या अधिकाºयांनी गतवर्षी जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या शेतकी फार्मची दोन एकर जागा सब स्टेशनसाठी मिळावी यासाठी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजून विचार विनिमय सुरू आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास कामशेतसह ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न संपुष्टात येणार असल्याची माहिती राणे यांनी सांगितली. शिवाय कामशेत व परिसरातील राजकीय, सामाजिक व प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून कामशेतच्या वीजवितरण कार्यालयास मदत केल्यास त्याची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न निकाली निघेल.वडगाव मावळ, कामशेत परिसरात विजेचा लंपडाव सतत सुरू असतो. १०० के. व्ही. विद्युत उपकेंद्र तळेगाव दाभाडे येथून २२ के. व्ही. कामशेत फीडर आहे. त्या फीडरवर वडगाव, कामशेत, खांडी, सावळा, कान्हे, टाकवे आदी २० ते २५ गावे येतात. सदर फीडरचे अंतर अंदाजे ४० किलोमीटर आहे. परंतु अनेक गावांत वीजवाहिनी गेल्या मुळे सदर फीडरचे अंतर १०० ते १२० किलोमीटर झाले आहे. सदर वीजवाहिनी रानावनातून, जंगलातून गेली आहे. या वाहिनीजवळ अनेक मोठमोठी झाडे आहेत. अनेकदा झाडांच्या फांद्या वारा किंवा इतर कारणाने वाहिनीवर पडतात. नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होतो. सदर फीडरवर अनेक गावे व गावांमधील शेती पंप, पीठ गिरण्या आदी असल्यामुळे प्रचंड लोड येतो. त्यामुळेही वाहिनीतील तारा वितळून तुटतात. कामगारसंख्या अपुरी असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करणेस वेळ लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागते. दुर्गम भागात चार ते पाच दिवस वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेती पंप बंद पडतात. विशेषत: पावसाळ्यात ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.