शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा कधी होणार सुरळीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:52 IST

कामशेतसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कामशेत : कामशेतसह ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील वीजपुरवठा कधी सुरळीत होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.मावळ तालुक्यातील मध्यवर्ती शहर कामशेतच्या आजूबाजूला अनेक गावे व वाड्यावस्त्या आहेत. नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक लोक कामशेतमध्ये स्थायिक होत असल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कामशेत येथील वीजवितरण मंडळ कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे ५० गावे येत असून ७५०० ग्राहक आहेत. या भागातील ६० ते ७० किलोमीटर लांबीच्या मुख्य वीज वाहिनीची दुरुस्ती व इतर अनेक कामांसाठी कर्मचारी अत्यंत कमी संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त भार येत आहे. त्यामुळे बºयाचदा खंडित झालेला वीजपुरवठा वेळेवर पूर्ववत होत नाही. कार्यालयात एक कनिष्ठ उपअभियंता, दोन लाईनमॅन, दोन विद्युत सहायक व पाच आऊटसोर्सिंगचे तात्पुरत्या नेमणुकीवरील कर्मचारी आहेत. ग्राहकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी वर्ग कमी असल्याने येथील वीजविषयक समस्या गंभीर होत आहेत.कार्यालय क्षेत्रातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तसेच विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने येथे सब स्टेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी कामशेत महावितरण कार्यालयातील अधिकाºयांनी वरिष्ठ पातळीवर समस्या मांडल्या. राणे या अधिकाºयांनी गतवर्षी जुना मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या शेतकी फार्मची दोन एकर जागा सब स्टेशनसाठी मिळावी यासाठी संबंधित अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर अजून विचार विनिमय सुरू आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास कामशेतसह ग्रामीण भागातील विजेचा प्रश्न संपुष्टात येणार असल्याची माहिती राणे यांनी सांगितली. शिवाय कामशेत व परिसरातील राजकीय, सामाजिक व प्रतिष्ठित नागरिकांनी मिळून कामशेतच्या वीजवितरण कार्यालयास मदत केल्यास त्याची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर हा प्रश्न निकाली निघेल.वडगाव मावळ, कामशेत परिसरात विजेचा लंपडाव सतत सुरू असतो. १०० के. व्ही. विद्युत उपकेंद्र तळेगाव दाभाडे येथून २२ के. व्ही. कामशेत फीडर आहे. त्या फीडरवर वडगाव, कामशेत, खांडी, सावळा, कान्हे, टाकवे आदी २० ते २५ गावे येतात. सदर फीडरचे अंतर अंदाजे ४० किलोमीटर आहे. परंतु अनेक गावांत वीजवाहिनी गेल्या मुळे सदर फीडरचे अंतर १०० ते १२० किलोमीटर झाले आहे. सदर वीजवाहिनी रानावनातून, जंगलातून गेली आहे. या वाहिनीजवळ अनेक मोठमोठी झाडे आहेत. अनेकदा झाडांच्या फांद्या वारा किंवा इतर कारणाने वाहिनीवर पडतात. नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित होतो. सदर फीडरवर अनेक गावे व गावांमधील शेती पंप, पीठ गिरण्या आदी असल्यामुळे प्रचंड लोड येतो. त्यामुळेही वाहिनीतील तारा वितळून तुटतात. कामगारसंख्या अपुरी असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करणेस वेळ लागतो. त्यामुळे नागरिकांना अंधारात रहावे लागते. दुर्गम भागात चार ते पाच दिवस वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेती पंप बंद पडतात. विशेषत: पावसाळ्यात ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.