शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

पावसाळ्यापूर्वी तरी नालेसफाई होणार का?

By admin | Updated: May 11, 2017 04:35 IST

पावसाच्या आगमनास काहीच दिवस शिल्लक आहेत. पावसाळ्यापूर्वी म्हणजे १ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्करावेत : पावसाच्या आगमनास काहीच दिवस शिल्लक आहेत. पावसाळ्यापूर्वी म्हणजे १ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित असताना मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला, तरी नालेसफाईला प्रत्यक्षात सुरुवात झाली नसून, याला महापालिकेचे अधिकारीच जबाबदार आहेत. नालेसफाईच्या नावाखाली करदात्यांच्या पैशावर हात साफ केला जातो. वेळेत नालेसफाईचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.रावेत, वाल्हेकरवाडी, शिंदेवस्ती, राजयोग कॉलनी, गुरुद्वारा परिसर आदी भागासह शहरात जवळपास १९० नाले आहेत. बहुतांश नाल्यांमध्ये गवत, झाडे, झुडपे वाढल्यामुळे आणि कचरा साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. सतत पाणी साचून राहिल्यामुळे डासांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेतर्फे सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयामार्फत स्वतंत्र नालेसफाईचे कामकाज केले जाते. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्याची सफाई न झाल्यामुळे या नाल्यातील पाणी साचून राहत आहे. रावेतसह इतर ठिकाणी असणाऱ्या नाल्यातील पाणी नदीला जाऊन मिळते. काही ठिकाणी नैसर्गिक नाला बुजविण्याकरिता नाल्याच्या शेजारी मातीचे मोठे ढिगारे घालण्यात आले आहेत. त्यामुळे नाल्याची रुंदी कमी झाली आहे अशा नाल्यात माती आल्याने हा नाला तुंबून दुर्गंधी येत आहे. रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक आदी भागातील नागरी वसाहतीत नैसर्गिक नाले असून, नाल्यांमध्ये परिसरातील नागरिक घाण व कचरा टाकतात. परंतु या नाल्यांची कधीही स्वच्छता होत नसल्याने त्यात कचऱ्याचे ढीगच तयार झाले आहे. महापालिकेने हे उघडे नाले साफसफाई करणे गरजेचे आहे.