शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रोख कोणाकडे?

By admin | Updated: May 27, 2016 04:12 IST

इंधन म्हणून डिझेलचा वापर करणाऱ्या वाहनांवर सरसकट बंदी लागू करणे हा काही पर्यावरणास आळा घालण्याचा एकमात्र अक्सीर इलाज होऊ शकत नाही, उलट अशा बंदीमुळे

इंधन म्हणून डिझेलचा वापर करणाऱ्या वाहनांवर सरसकट बंदी लागू करणे हा काही पर्यावरणास आळा घालण्याचा एकमात्र अक्सीर इलाज होऊ शकत नाही, उलट अशा बंदीमुळे अनेक प्रकारचे आर्थिक-सामाजिक प्रश्न जन्मास येऊ शकतात असे उद्गार केन्द्रीय भूपृष्ठ म्हणजे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले असून त्यांच्या या उद्गारांचा नेमका रोख कोणाकडे आहे याचा स्पष्ट खुलासा होत नाही. केवळ प्रायोगिक तत्त्वावर राजधानी दिल्लीमध्ये डिझेल वाहनांवर बंदी लागू करण्यात आली आहे. सम-विषम क्रमांकाच्या वाहनांना तारखेनुसार रस्त्यावर येण्यास अनुमती वा बंदी लागू करण्याची व त्याचबरोबर डिझेलचा वापर करणाऱ्या वाहनांना प्रतिबंध करण्याची कल्पना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची. त्यांनी त्यानुसार निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाची तळी मग उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरली. त्यामुळेच गडकरींचा रोख नेमका कोणाकडे हा प्रश्न निर्माण होतो. अर्थात गडकरींचे प्रतिपादन अगदीच तथ्यहीन आहे असे मात्र नाही. पर्यावरणास आळा घालण्यासाठी केन्द्र सरकार प्रयत्न करते आहे आणि त्यादृष्टीने केवळ डिझेलच नव्हे तर पेट्रोलवरही धावणाऱ्या मोटारींमध्ये पर्यावरणरोधक यंत्रणा बसविण्याचे निकष निर्धारित करुन देत आहे. शिवाय जे इंधन प्रदूषणकारी नाही अशा इथेनॉल आणि बायोडिझेलच्या वापरास प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाचे वाहतूक मंत्री या नात्याने दिल्ली शहरातील वाहतूक सुरळित आणि जलद व्हावी व जेणेकरुन वाहतूक कोंडी व प्रदूषणवृद्धी यांना आळा बसावा म्हणून तब्बल तीस हजार कोटींच्या योजनेचेही त्यांनी सूतोवाच केले आहे. स्वयंरोजगाराच्या हेतूने ज्या युवकांनी वित्तसंस्थांकडून डिझेल टॅक्सीज खरेदी केल्या आहेत त्यांच्या व्यवसायावरच घाला घालण्यात आल्याने त्यातून आर्थिक-सामाजिक प्रश्न निर्माण झाल्याचे गडकरींचे निरीक्षण आहे. शिवाय वाहन निर्मिती क्षेत्रात होणाऱ्या गुंतवणुकीवर या बंदीचा प्रतिकूल परिणाम होणार असून त्याचा थेट फटका रोजगार निर्मितीवर होऊ शकतो असेही गडकरींना वाटते.