शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
4
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
5
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
6
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
9
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
10
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
11
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
12
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
13
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
14
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
15
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
16
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?

कुणी घर देतंय का घर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 01:07 IST

लासुर्णे (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांची नावे २००२ च्या दारिद्र्यरेषेच्या सर्वेक्षणात आली खरी, परंतु यांना घर बांधण्यासाठी जागा नसल्याने आजपर्यंत

लासुर्णे : लासुर्णे (ता. इंदापूर) ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांची नावे २००२ च्या दारिद्र्यरेषेच्या सर्वेक्षणात आली खरी, परंतु यांना घर बांधण्यासाठी जागा नसल्याने आजपर्यंत या लोकांना स्वत:चे घर मिळाले नाही. गेल्या वर्षी शासनाकडून पंचायत समितीला भूमिहीन लोकांना घरकुल बांधणीच्या जागा खरेदीसाठी ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. परंतु, यासाठी नागरिक, ग्रामसेवक व बीडीओ यांच्याकडे गेले असता त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे या कुटुंबांना ‘कोणी घर देता का घर’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना कायमस्वरूपी निवारा मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत सन १९९६ पासून बेघर व्यक्तींना इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत लासुर्ण्यातील १५ ते २० कुटुंबांची नावे या दारिद्र्यरेषेच्या यादीत घरकुल योजनेसाठी मंजूर झाली. परंतु, या लोकांना घर बांधण्यासाठी जागा नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. यासाठी शासनाने पंचायत समितीला अशा भूमिहीन लोकांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. आजच्या जमिनीच्या वाढत्या दरामुळे ५० हजारांत खासगी मालकाची जागा मिळू शकत नाही. जागा न मिळाल्याने हे नागरिक कायमचे बेघर राहणार आहेत. तर, दुसरीकडे याच गावात गायरान व गावठाण आणि शेतीमहामंडळ व वनविभागाची शेकडो एकर पडीक जमीन आहे.त्यावर दिवसेंदिवस गावपुढाऱ्यांचे वाढते अतिक्रमण होत असतानाही या बेघर लोकांना घर बांधण्यासाठी ती जागा शासन का देत नाही, अशी विनंती धोंडिराम भडंगे यांनी केली आहे. भूमिहीन कुटुंबाची मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी अवहेलना करू नये. त्यांना ५० हजार रुपये देण्यापेक्षा याच गावातील गायरान गावठाण अथवा शेतीमहामंडळाची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन वाकसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)