शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शहर पिछाडीबाबत चौकशी प्रक्रिया होणार कधी?; आयुक्तांना पडला आश्वासनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 04:08 IST

निष्क्रिय प्रशासन आणि सल्लागारांमुळे राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराला अपयश आले. ६९ व्या क्रमांकावर पिछाडी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते.

पिंपरी : निष्क्रिय प्रशासन आणि सल्लागारांमुळे राहण्यायोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड शहराला अपयश आले. ६९ व्या क्रमांकावर पिछाडी झाली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. चौकशी कधी पूर्ण होणार, याबाबत दोषींवर कारवाई कधी होणार, याबाबत उत्सुकता आहे.केंद्र सरकारच्या वतीने राहण्यायोग्य शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचे काम महापालिकेने ‘पॅलिडीयम’ या खासगी संस्थेवर सोपविले होते. केंद्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर स्मार्ट पिंपरी-चिंचवड पिछाडीवर गेल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली. यावर ‘लोकमत’ने सर्वात प्रथम ‘निष्क्रिय प्रशासनच पिछाडीला जबाबदार’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर विविध पक्षांच्या गटनेत्यांनीही चौकशीची मागणी केली होती.सत्ताधारी भाजपाच्या सदस्यांनी अपयशाचे खापर प्रशासनावर फ ोडले होते. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल. दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर दोन महिने होत आले तरी चौकशी पूर्ण झालेली नाही. ही चौकशी कधी पूर्ण होणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे.राहण्यायोग्य शहरांचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम महापालिकेने पॅलिडीयम या खासगी सल्लागार संस्थेवर सोपविले होते. या सर्वेक्षणात शहराला ६९वा क्रमांक मिळाला आहे. सर्वेक्षणासाठी गव्हर्नन्स, संस्कृती, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, रोजगार, गृहनिर्माण, सार्वजनिक मोकळ्या जागा, संमिश्र जागेचा वापर, वीजपुरवठा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, मैला सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण अशा विविध विभागांनुसार माहिती विचारली होती, तर औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, आरोग्य या चार पिलरच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये पुण्यास पहिला क्रमांक मिळाला आणि पिंपरी ६९ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे.१५ प्रकारांसाठी शंभर गुणांकन, गव्हर्नन्ससाठी २५, कल्चरल, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा यासाठी २५ गुण आणि त्यानंतर रोजगार, गृहनिर्माण, सार्वजनिक मोकळ्या जागा, संमिश्र जागांचा वापर, वीजपुरवठा, सार्वजनिक वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण यासाठी प्रत्येकी पाच असे पन्नास गुण असे एकूण शंभर गुण देण्यात आले होते. संस्थात्मक (२५ गुण), सामाजिक (२५ गुण), आर्थिक (५ गुण) आणि शारीरिक (४५ गुण), आत प्रत्येक स्तंभातील, गुणसंख्या त्यानुसार खालील श्रेणींमध्ये तितकीच विभागली जाते.माहिती नसल्याची प्रशासनाची कबुलीपोलीस, भविष्य निर्वाहनिधी, विक्रीकर, प्राप्तिकर आदी विविध विभागांनी माहिती न दिल्याने राहण्यायोग्य शहरासाठी पाठविलेल्या अहवालात त्रुटी राहिल्याची कबुली महापालिकेच्या संगणक विभागाचे प्रमुख निळकंठ पोमण यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड हे पुणे जिल्ह्यांतर्गत येते. त्यामुळे विविध शासकीय कार्यालयांच्या दृष्टीने पुणे हाच विभाग आहे. त्यामुळे आम्ही अहवालासाठी माहिती मागविली होती. मात्र, त्यास शासकीय कार्यालयाकडून प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सांख्यिकीय माहिती मिळालेली नाही.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड