शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

उद्योजक जाचमुक्त होणार कधी?

By admin | Updated: October 27, 2015 01:03 IST

एलबीटी हटाव, इन्स्पेक्टरराज कमी करणे, परवान्यांची संख्या कमी करणे, एमआयडीसी परिसरातील बांधकामे नियमितीकरण, हस्तांतरण, अशी आश्वासने विविध राजकीय पक्षांनी दिली होती

पिंपरी : एलबीटी हटाव, इन्स्पेक्टरराज कमी करणे, परवान्यांची संख्या कमी करणे, एमआयडीसी परिसरातील बांधकामे नियमितीकरण, हस्तांतरण, अशी आश्वासने विविध राजकीय पक्षांनी दिली होती. त्यापैकी एलबीटी रद्द करून भारतीय जनता पक्ष, शिवसेनेच्या सरकारने उद्योगांना दिलासा दिला आहे. इन्स्पेक्टरराज कमी होणे, विविध परवानग्या कमी, हस्तांतरण, बांधकामे नियमितीकरण होण्यासंदर्भात ठोस निर्णय कधी होणार? असा प्रश्न शहरातील उद्योगांना पडला आहे. जागतिक पटलावर पिंपरी-चिंचवड या शहराने उद्योगनगरी म्हणून लौकिक मिळविला आहे. मात्र, शासकीय धोरणांचा अभाव व उद्योगांना पोषक असे वातावरण नसल्याने उद्योगांचे स्थलांतर होऊ लागले आहे. अगोदर जकात आणि त्यानंतर एलबीटीने उद्योजक, व्यापारी त्रस्त झाले होते. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासह अनेक घटक पक्षांनी उद्योजकांना विविध आश्वासने दिली होती. त्यांच्या अजेंड्यावर अनेक विषय होते. त्यापैकी एलबीटी आणि काही परवाने वगळता अद्याप कोणतेही उद्योगांना पूरक असे निर्णय वर्षभरात दिसून आलेले नाहीत. एलबीटी रद्द करू, परवान्यांची संख्या कमी करू, करांचे सुसूत्रीकरण करू, एमआयडीसी हद्दीतील बांधकामे नियमितीकरण आणि झोपड्यांचे पुनर्वसन, इन्स्पेक्टरराज घालवू, आॅनलाइन परवानग्यांची सोय करू, उद्योगवाढीसाठी स्वतंत्र योजना राबवू, तसेच आर्थिक अडचणींत सापडलेल्या पिंपरीतील एचए कंपनीला केंद्राकडून विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी विविध आश्वासने सर्वच प्रमुख पक्षांनी दिली होती. सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या भाषणांमधून उद्योगनरीचे प्रश्न प्राधान्याने सोडवू, अशी आश्वासने दिली होती. त्यापैकी बहुतांशी आश्वासने पूर्ण झालेली नाहीत. एलबीटीतून सुटकानिवडणुकीपूर्वी एलबीटी आंदोलनात भाजपा आणि सेना सक्रियपणे सहभागी झाली होती. त्यानुसार आम्हाला सत्ता दिल्यास एलबीटी हटवू, असे आश्वासन दिले होते. भाजपा-सेनेच्या सरकारने सत्तांतर झाल्यानंतर नऊ महिन्यांनी एलबीटी रद्दचा निर्णय घेतला आहे. पन्नास कोटींच्या पुढे उलाढाल असणाऱ्या सुमारे तीस हजार व्यापारी, उद्योजकांपैकी केवळ ६५ उद्योगांनाच एलबीटी भरावा लागणार आहे. उर्वरित व्यावसायिकांनाही एलबीटीतून सूट देण्याचे धोरण अर्थमंत्र्यांनी चिंचवड येथील कार्यक्रमात जाहीर केले आहे. ‘इन्स्पेक्टरराज’ घालवू या भाजपाच्या आश्वासनावर ठोस निर्णय झालेला नाही. त्यात कायदेशीर अडचण असल्याची सबब सरकार पुढे करीत आहे. परंतु, उद्योगांसाठी लागणारे विविध परवान्यांची संख्या उद्योगमंत्र्यांनी निम्म्यावर आणली आहे. त्यापैकी महापालिकेतील उद्योगधंदा परवाना, कामगार परवान्यासंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. झोपड्यांचे पुनर्वसन रखडलेएमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे. तसेच गृहप्रकल्पांच्या बाल्कनींचा प्रश्न तसेच झोपडपट्ट्यांचेही पुनर्वसन झालेले नाही. याविषयी दिलेले आश्वासनही सरकारने पूर्ण केलेले नाही. याबाबतही गेल्या वर्षभरात ठोस निर्णय झालेला नाही. धोरणात्मक पावले उचललेली नाहीत.(प्रतिनिधी)