शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा’

By admin | Updated: August 10, 2015 02:50 IST

पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते

पवनानगर : पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते? सत्तेत असताना एक व विरोधी पक्षात असताना एक, असे खोटे राजकारण मावळची जनता सहन करणार नाही, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी शोकसभेचे आयोजन केले होते. त्या वेळी आमदार भेगडे बोलत होते.ते म्हणाले, ‘‘सरकारने शब्द देऊन तीन वर्षांत मृतांच्या नातेवाइकांना नोकऱ्या दिल्या नाहीत. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. भाजपा-सेना सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबातील नातेवाइकांना नोकरीत घेण्यासाठी आदेश काढला आहे. शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि ते मागे घेतले जातील. कांताबाई ठाकर या नितीनच्या एकट्याच्या आई नसून, पाण्याच्या लढ्यासाठी त्याचे बलिदान गेले आहे. त्यामुळे त्या मावळच्या आई आहेत. या शहिदांचे पुण्यस्मरण हे प्रत्येक वेळी करण्यात येईल.’’या वेळी मावळचे माजी सभापती व पवना बंद जलवाहिनी आंदोलनाचे नेते ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, ‘‘पाणी हे मावळचे वैभव असून, कोणालाही कदापि बंद जलवाहिनीने नेऊ देणार नाही.’’ या वेळी बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, भास्करराव म्हाळसकर, लक्ष्मण भालेराव, शांताराम भोते आदींची भाषणे झाली. या वेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, गुलाबराव वरघडे, पांडुरंग ठाकर, गणेश गायकवाड, रघुवीर शेलार, प्रशांत ढोरे, सुकन बाफना अमित कुंभार, किसन खैर उपस्थित होते. (वार्ताहर)