शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

‘जलवाहिनी प्रकल्प बंद होईपर्यंत लढा’

By admin | Updated: August 10, 2015 02:50 IST

पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते

पवनानगर : पवना बंद जलवाहिनीला विरोध कायम असून, प्रकल्प रद्द होईपर्यंत लढत राहणार आहोत. आता बंद जलवाहिनीला विरोध करणाारे राष्ट्रवादीचे नेते त्या वेळी कोठे होते? सत्तेत असताना एक व विरोधी पक्षात असताना एक, असे खोटे राजकारण मावळची जनता सहन करणार नाही, असे आमदार बाळा भेगडे यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून नेण्यात येणाऱ्या बंद जलवाहिनी विरोधातील आंदोलनात ४ वर्षांपूवी ९ आॅगस्टला मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावर रास्ता रोको केले होते. त्या वेळी कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्याम तुपे हे तीन शेतकरी मृत्युमुखी पडले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथील एका मंगल कार्यालयात रविवारी शोकसभेचे आयोजन केले होते. त्या वेळी आमदार भेगडे बोलत होते.ते म्हणाले, ‘‘सरकारने शब्द देऊन तीन वर्षांत मृतांच्या नातेवाइकांना नोकऱ्या दिल्या नाहीत. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. भाजपा-सेना सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबातील नातेवाइकांना नोकरीत घेण्यासाठी आदेश काढला आहे. शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि ते मागे घेतले जातील. कांताबाई ठाकर या नितीनच्या एकट्याच्या आई नसून, पाण्याच्या लढ्यासाठी त्याचे बलिदान गेले आहे. त्यामुळे त्या मावळच्या आई आहेत. या शहिदांचे पुण्यस्मरण हे प्रत्येक वेळी करण्यात येईल.’’या वेळी मावळचे माजी सभापती व पवना बंद जलवाहिनी आंदोलनाचे नेते ज्ञानेश्वर दळवी म्हणाले, ‘‘पाणी हे मावळचे वैभव असून, कोणालाही कदापि बंद जलवाहिनीने नेऊ देणार नाही.’’ या वेळी बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, भास्करराव म्हाळसकर, लक्ष्मण भालेराव, शांताराम भोते आदींची भाषणे झाली. या वेळी ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, गुलाबराव वरघडे, पांडुरंग ठाकर, गणेश गायकवाड, रघुवीर शेलार, प्रशांत ढोरे, सुकन बाफना अमित कुंभार, किसन खैर उपस्थित होते. (वार्ताहर)