शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पाणीबाणी

By admin | Updated: May 24, 2016 05:55 IST

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीपातळी घटत असल्याने महापालिकेने पाणीकपात केली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केला असला, तरी त्यानुसार जुलै

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीपातळी घटत असल्याने महापालिकेने पाणीकपात केली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केला असला, तरी त्यानुसार जुलै अखेरपर्यंत शहराची तहान भागू शकेल. मात्र, हवामानाचे अंदाज दिवसेंदिवस बदलत असून, जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास शहरावरही पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीस लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पाणीकपातीचे नियोजन हाती घेतले. मागील पावसाळ्यात पवना धरण क्षेत्रात केवळ ८० टक्के पाणीसाठा जमा झाला. हा पाणीसाठा वर्षभर पुरविणे अशक्य असल्याने महापालिकेने ९ डिसेंबर २०१५ला शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली. त्यानंतर ११ मार्च २०१६ मध्ये १० टक्क्यांवरून ही पाणीकपात १५ टक्क्यांवर नेण्यात आली होती. दरम्यान, पाणीपातळी जास्त खालावू लागल्याने तसेच जूनमध्ये पावसाचा नेमका अंदाज नसल्याने ३ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरूकरण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी धरणात २.१९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तर सध्या पवना धरणात केवळ १.७७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दर दिवशी २१ दशलक्ष घनफूट लिटर पाण्याचा विसर्ग होतो. सध्याचा पाणीसाठा शहराला जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल, असा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. मात्र, सध्या उपलब्ध पाणीसाठ्यात महापालिका दिवसाला ३०० ते ३१५ एमएलडी पाणी उचलत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) दरदिवशी ८० एमएलडी, तसेच वाघोलीसाठी दरदिवशी ३० एमएलडी पाणी उचलले जात आहे. यासह तळेगाव, देहूरोड या मोठ्या शहरांसह पवना धरणापासून ते रावेत बंधाऱ्यापर्यंतच्या नदीपात्रालगत शेतीसाठीही पाणी उचलले जाते. (प्र्रतिनिधी)सध्या १.७७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच १७५६ दशलक्ष घनफूट लिटर पाणीसाठा आहे. यातून दर दिवशी २१ दशलक्ष घनफूट विसर्ग होत आहे. यापैकी १६ दशलक्ष घनफूट महापालिका आणि औद्योगिकसाठी असून, ४ दशलक्ष घनफूट शेतीसाठी आणि वहनात जाते. सध्याचा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरू शकेल.- मनोहर खाडे, शाखा अभियंता, पवना धरण