शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

पाण्याच्या टाक्या ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: March 21, 2017 05:18 IST

येथील परांडेनगरमध्ये चार दिवसांपूर्वी साडेतीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

दिघी : येथील परांडेनगरमध्ये चार दिवसांपूर्वी साडेतीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टाकीत पडून मृत्युमुखी पडण्याची ही दिघीतील दुसरी घटना होय. त्यामुळे परिसरात होत असलेल्या बांधकामावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, बांधकाम व्यावसायिक यांनी सुरक्षिततेच्या नियमाला बगल दिल्याने निष्पाप मुलांचे नाहक बळी जात असल्याचे वास्तव आहे. दिघी परिसरात बांधकामांना पेव फुटले आहे. रस्तोरस्ती, गल्ली-बोळात सर्रास बांधकामांना ऊत आला आहे. या बांधकामावर असलेल्या मजूर, ठेकेदार यांच्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलेही नियम पाळले जात नाहीत.उंच ठिकाणी काम करताना सेफ्टी बेल्टचा वापर टाळत बांधकामावरील कामगार वर्ग जिवावर उदार होऊन काम करताना दिसतो. हेल्मेट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी बूट अशी सुरक्षेबाबतची कुठलीही साधने, साहित्य ठेकेदाराकडूनच पुरविले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय बांधकाम क्षेत्रात धोकादायक ठरणाऱ्या जागा सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता वाऱ्यावर सोडून दिले असतात. यामध्ये बांधकामांना लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी भूमिगत बांधलेल्या पाण्याच्या टाक्या उघड्यावर सोडलेल्या असतात. दिघीतील परांडेनगरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सुमीत अनिल चौहान या साडेतीन वर्षाच्या बालकाचा अंत झाला. तर एका बांधकामावर एक कामगार खालून विटा फेकत होता व दुसरा कामगार त्या वरच्यावर झेलत गोळा करत असताना हातातील निसटलेली वीट बालकाच्या डोक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सुरक्षेचे उपाय नाकारल्याने त्याची झळ आपल्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सोसावी लागल्याचे समोर आले आहे. बांधकामावर बांधलेल्या पाण्याच्या टाक्या सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. प्रत्येक बांधकामावर हिच परिस्थिती आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत झाकण करणे सोईचे असताना लाकडी फळी टाकून वेळ निभावून नेली जाते. हीच दुर्लक्षित केलेली बाब जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांच्या जिवावर उठली असून, टाकीमध्ये बालक पडण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांच्या जिवाशी खेळणाऱ्या व या घटनांना जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जेणेकरून अशा घटना वारंवार घडणार नाहीत. (वार्ताहर)