शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

नियोजनाअभावी चिखलीत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:05 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदीमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. विभागाकडून कृष्णानगर येथील पंप हाऊस येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी चिखली, तळवडे भागात विस्कळीत पुरवठा होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि पाण्याचे नियोजन विस्कटल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील एकाही भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होत नाही. महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कान टोचूनही प्रश्न सुटलेला नाही. जलवाहिन्या फुटून पाणीगळतीचे प्रमाण वाढतच आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही. कृष्णानगर येथील पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तेथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण तळवडे भाग, संपूर्ण चिखली भाग, रामनगर, अजंठानगर, विद्यानगर या भागातील पाणीपुरवठा कमी दाबाने व अनियमित राहील. त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी व पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे. बेजबाबदार अधिकाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी दररोज ४६० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. वाढत्या नागरीकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. पाणी गळतीचे प्रमाण ३० टक्क््यांहून अधिक असल्याने महापालिका प्रशासन गळती रोखण्याचे काम करत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी पाणीटंचाईचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड