शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

पाणीविक्रीत बनावटगिरी

By admin | Updated: April 20, 2017 06:59 IST

उन्हाळ््यामध्ये हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सध्या बाटलीबंद पाणी व जार पाण्याच्या

भोसरी : उन्हाळ््यामध्ये हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सध्या बाटलीबंद पाणी व जार पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नळाचे पाणी देऊन काळाबाजार सुरू असून, लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेषत: बस स्थानक, हॉटेल्स, लग्न कार्यक्रम यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी दुकानदारांकडून देण्यात येणारे बाटलीबंद पाणी खराब येऊ लागल्याने अशी बाटली घ्यावी की नाही याबाबत लोकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याची तडाखेबंद विक्री चालू आहे. पाण्याचा पैसा करण्याचा हा उद्योग फोफावला असताना या दिवसात दरवर्षी मिनरल वॉटरची कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे बघायला मिळते. बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली अनेक कंपन्या पाण्याची विक्री करीत आहेत. त्यात दूषित पाणी असल्याचे दिसून येत असल्याच्या तक्रारी आहेत.गेल्या काही दिवसांत शहरातील सामाजिक संस्थातर्फे उभारण्यात येणाऱ्या पाणपोयांची संख्या कमी झाल्यामुळे लोकांना पाण्याची बाटली घेण्याशिवाय पर्याय नसतो. एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत २० रुपये आहे. गेल्या काही वर्षांत शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्या बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज ओळखून पाणी विक्रीसाठी लहान-मोठ्या ५० पेक्षा जास्त कंपन्या भोसरी परिसरात बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत.भोसरी परिसरात पाण्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही ज्या ठिकाणावरून पाणी जार आणि डब्यांमध्ये भरून ग्राहकांपर्यंत पोचवतो. तिथे पाणी शुद्धीकरणाची मशिनरी व यंत्रे लावलेली आहेत पण अधिक नफा व कमी वेळेत जास्त उत्पन्नाच्या लालसेपोटी बहुतेक वेळा थेट नळाचे पाणी भरून दिले जाते. थंड पाण्याच्या डब्यांत एक दिवस आधी पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी ते ग्राहकांपर्यंत पोचवले जाते. याकडे अन्न, औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एखादी दुघर्टना घडल्यानंतरच जाग येणार का? असा प्रश्न शहर परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)