शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीविक्रीत बनावटगिरी

By admin | Updated: April 20, 2017 06:59 IST

उन्हाळ््यामध्ये हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सध्या बाटलीबंद पाणी व जार पाण्याच्या

भोसरी : उन्हाळ््यामध्ये हॉटेलमध्ये किंवा कुठे फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेतल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे सध्या बाटलीबंद पाणी व जार पाण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नळाचे पाणी देऊन काळाबाजार सुरू असून, लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेषत: बस स्थानक, हॉटेल्स, लग्न कार्यक्रम यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी दुकानदारांकडून देण्यात येणारे बाटलीबंद पाणी खराब येऊ लागल्याने अशी बाटली घ्यावी की नाही याबाबत लोकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली सध्या विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद पाण्याची तडाखेबंद विक्री चालू आहे. पाण्याचा पैसा करण्याचा हा उद्योग फोफावला असताना या दिवसात दरवर्षी मिनरल वॉटरची कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे बघायला मिळते. बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली अनेक कंपन्या पाण्याची विक्री करीत आहेत. त्यात दूषित पाणी असल्याचे दिसून येत असल्याच्या तक्रारी आहेत.गेल्या काही दिवसांत शहरातील सामाजिक संस्थातर्फे उभारण्यात येणाऱ्या पाणपोयांची संख्या कमी झाल्यामुळे लोकांना पाण्याची बाटली घेण्याशिवाय पर्याय नसतो. एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत २० रुपये आहे. गेल्या काही वर्षांत शीतपेय तयार करणाऱ्या नामांकित कंपन्या बाटलीबंद पाण्याची विक्री करीत आहेत. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज ओळखून पाणी विक्रीसाठी लहान-मोठ्या ५० पेक्षा जास्त कंपन्या भोसरी परिसरात बाटलीबंद पाणी विक्री करीत आहेत.भोसरी परिसरात पाण्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही ज्या ठिकाणावरून पाणी जार आणि डब्यांमध्ये भरून ग्राहकांपर्यंत पोचवतो. तिथे पाणी शुद्धीकरणाची मशिनरी व यंत्रे लावलेली आहेत पण अधिक नफा व कमी वेळेत जास्त उत्पन्नाच्या लालसेपोटी बहुतेक वेळा थेट नळाचे पाणी भरून दिले जाते. थंड पाण्याच्या डब्यांत एक दिवस आधी पाणी भरून फ्रिजरमध्ये ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी ते ग्राहकांपर्यंत पोचवले जाते. याकडे अन्न, औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. एखादी दुघर्टना घडल्यानंतरच जाग येणार का? असा प्रश्न शहर परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)