शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: May 4, 2017 00:06 IST

रब्बी हंगामातील कांदा काढणी आता संपत आली आहे. मात्र कांद्याच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. शेतकरी

 कारेगाव : रब्बी हंगामातील कांदा काढणी आता संपत आली आहे. मात्र कांद्याच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. शेतकरी मात्र कांदा विक्रीसाठी लगबग करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात कांदा हे महत्त्वाचे पीक असून ते मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश भाग जिरायती असल्याने व कांदा चार ते पाच महिन्यांत निघत असल्याने कांदापीक घेण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने कांदापिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले, परंतु बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. तरीही शेतकरी कांदा विकण्यास प्राधान्य देत आहे. आता तर दोन ते तीन रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. अपवादानेच कोणा तरी शेतकऱ्यांना चार रुपये दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सोडाच विक्री खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील काही वर्षात कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा चाळीचे काम झाले आहे; परंतु मागील वर्षी ठेवलेला कांदा बाजारभावाअभावी तसाच राहिला. त्या सडलेल्या कांद्याचा उकीरड्यावरील वास अद्यापही गेला नाही. यंदा चांगले उत्पन्न होऊनही बाजार मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. बाजार कमी असल्याने कांदा व्यापारी यांना पैशाची खात्री नसतानाही शेतकरी कांदा विकत आहे. मार्केटमध्ये बाजार सतत कमी होत असल्याने व्यापारी कांदा घेऊनही पैसे देताना घासाघीस करत आहेत. तर काही ठिकाणी पैसे देण्यास विलंब करत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुणे मार्केटला योग्य बाजार मिळत नसल्याने शेतकरी वाशी, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात कांदा पाठवत आहेत; परंतु सब घोडे बारा टक्के असाच अनुभव त्याला येत आहे. काही शेतकरी परराज्यात बंगलोर, कोचीनला माल पाठवत आहेत. परंतु, वाहतूक खर्च अधिक असल्याने त्याला तोटाच सहन करावा लागत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच दररोज आभाळ निघत असल्याने शेतकऱ्यांला कांदा विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा शेतकरी विकत आहेत.(वार्ताहर)शासनाने अनुदान देण्याची गरज""सद्य:स्थितीमध्ये शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढतच चालला आहे. कांदापिकाला मागील तीन वर्षांपासून योग्य व किफायतशीर दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यासाठी शासनाने कांद्याला अनुदान देण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे. तसेच कांदा दरातील घसरण दररोज सुरूच असल्याने शेतकऱ्यांसाठी कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे.मार्चअखेरीस पीककर्ज नवे-जुने करण्यासाठी घेतलेले सावकारी कर्ज कसे फेडायचे, हा नवा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.