शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: May 4, 2017 00:06 IST

रब्बी हंगामातील कांदा काढणी आता संपत आली आहे. मात्र कांद्याच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. शेतकरी

 कारेगाव : रब्बी हंगामातील कांदा काढणी आता संपत आली आहे. मात्र कांद्याच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच आहे. शेतकरी मात्र कांदा विक्रीसाठी लगबग करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात कांदा हे महत्त्वाचे पीक असून ते मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश भाग जिरायती असल्याने व कांदा चार ते पाच महिन्यांत निघत असल्याने कांदापीक घेण्यास शेतकरी प्राधान्य देतात. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने कांदापिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली. त्यामुळे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले, परंतु बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. तरीही शेतकरी कांदा विकण्यास प्राधान्य देत आहे. आता तर दोन ते तीन रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. अपवादानेच कोणा तरी शेतकऱ्यांना चार रुपये दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च सोडाच विक्री खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील काही वर्षात कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा चाळीचे काम झाले आहे; परंतु मागील वर्षी ठेवलेला कांदा बाजारभावाअभावी तसाच राहिला. त्या सडलेल्या कांद्याचा उकीरड्यावरील वास अद्यापही गेला नाही. यंदा चांगले उत्पन्न होऊनही बाजार मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. बाजार कमी असल्याने कांदा व्यापारी यांना पैशाची खात्री नसतानाही शेतकरी कांदा विकत आहे. मार्केटमध्ये बाजार सतत कमी होत असल्याने व्यापारी कांदा घेऊनही पैसे देताना घासाघीस करत आहेत. तर काही ठिकाणी पैसे देण्यास विलंब करत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पुणे मार्केटला योग्य बाजार मिळत नसल्याने शेतकरी वाशी, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात कांदा पाठवत आहेत; परंतु सब घोडे बारा टक्के असाच अनुभव त्याला येत आहे. काही शेतकरी परराज्यात बंगलोर, कोचीनला माल पाठवत आहेत. परंतु, वाहतूक खर्च अधिक असल्याने त्याला तोटाच सहन करावा लागत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच दररोज आभाळ निघत असल्याने शेतकऱ्यांला कांदा विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात कांदा शेतकरी विकत आहेत.(वार्ताहर)शासनाने अनुदान देण्याची गरज""सद्य:स्थितीमध्ये शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दिवसेंदिवस उत्पादन खर्च वाढतच चालला आहे. कांदापिकाला मागील तीन वर्षांपासून योग्य व किफायतशीर दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. त्यासाठी शासनाने कांद्याला अनुदान देण्याची गरज असल्याची शेतकऱ्यांत चर्चा आहे. तसेच कांदा दरातील घसरण दररोज सुरूच असल्याने शेतकऱ्यांसाठी कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे.मार्चअखेरीस पीककर्ज नवे-जुने करण्यासाठी घेतलेले सावकारी कर्ज कसे फेडायचे, हा नवा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.