शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By admin | Updated: March 23, 2017 04:19 IST

सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे.

तळेगाव दाभाडे : सध्या कांदाकाढणी अंतिम टप्प्यात असून, बाजारभाव नसला तरी शेतकरी कांदा विकण्याची लगबग करत आहे.मावळ तालुक्यातील वडगाव, माळवाडी, कोटेश्वर वाडी, इंदोरी, जांबवडे, सुदुंबरे, खालुंब्रे आदी भागामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांदाकाढणी अंतिम टप्प्यात आहे. गतवर्षी कांद्याच्या कमी बाजारभावामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेल्या कुऱ्हाडीची जखम ताजी असताना चालू वर्षीसुद्धा हा बाजारभाव शेतकऱ्यांचे ‘पानिपत’ करत आहे. चालू वर्षीही भाव नाही. साठवायचा तर, गतवर्षी सडलेल्या, उकिरड्यावर फेकलेल्या कांद्याचा वास अद्यापही गेलेला नाही. गतवर्षी कांद्याने शेतकऱ्यांची मोठी दैना केली. उत्पादन भरपूर निघाले पण बाजार ‘डाऊन.’ सोन्यासारखा माल कवडीमोल भावाने विकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. बहुतांश शेतकऱ्यांनी ह्यया बाजारभावात कांदा विकूनही साधी मजुरीही भागात नाहीह्ण म्हणून कांदा साठवणे पसंत केले. त्यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षीचा कटू अनुभव असल्याने यावर्षी कांदा ठेवण्याचा कोणताच शेतकरी विचार करत नाही. पुणे, नगर या ठिकाणी बाजारभाव नाहीत. दोन पैसे जरा बऱ्यापैकी मिळतील या आशेने येथील शेतकरी सोलापूर, कोल्हापूर अशा लांबच्या बाजारपेठा गाठत आहे. मात्र ‘सब घोडे बारा टक्के’ असाच अनुभव त्याला सर्वत्र येत आहे. उलट वाहतूक खर्च वाढतो व अधिक तोटा होतो. मात्र हा तोटा सहन करून शेतकरी कांदा मात्र घरी न ठेवता विक्रीसाठीच पाठवत आहे. (वार्ताहर)शेतीविरोधी धोरणाने कांदा उत्पादक हतबल-पिंपरी : जिल्ह्यात कांदा व भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असलेल्या मावळ तालुक्यातील शेतकरी वर्ग राज्य व केंद्र शासनाच्या शेतीविरोधी धोरणामुळे आर्थिक हतबल झाला आहे. ही परिस्थिती वेळीच सुधारली नाही तर विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसारखी आत्महत्या करण्याची वेळ दूर नसल्याची भीती शेतकरीवर्गात पसरली आहे.गेली दोन वर्षे शेतकरीवर्ग नगदी पीक कांदा तसेच टॉमेटो व भाजीपाला वर्गातील पिकांचे उत्पादन करण्यासाठी बँका तसेच सोसायटीतून कर्जे उचलून त्यासाठी खर्च केले आहेत. तयार झालेला माल कवडीमोलाने बाजारात विकला गेल्यामुळे या पिकांचा भांडवली खर्चदेखील वसूल झालेला नाही. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांची सध्या ‘आई भीक मागू देत नाही, बाप पोट भरून देत नाही’ अशी अवस्था झाली आहे.शेती सोडून शेतकरी दुसरे काही करू शकत नाही. शेती केली तर मायबाप सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतात उत्पादित झालेल्या शेतमालाचा भांडवली खर्चदेखील वसूल होत नाही. मग शेतकरीवर्गाने जगायचे कसे, हा गहन प्रश्न शेतकरीवर्गाला पडला आहे. भाजीपाला खाणाऱ्याला स्वस्त देण्याच्या धोरणामुळे शेतकरीवर्ग पूर्णपणे आर्थिक भरडला गेला आहे. शेतकरीवर्गाला कर्जमाफी नको, कर्जमुक्ती नको, शेतकऱ्यांना त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पिकविलेल्या शेतमालाला भांडवली खर्चाच्या तुलनेत हमी भाव पाहिजे, अशी तीव्र भावना शेतकरीवगार्तून व्यक्त होत आहे.शासनाने आर्थिक बजेटमधे कृषी सिंचनावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करून शेतकऱ्यांचा कैवारी असल्याचे दाखवले असले, तरी सध्या शेतीत तयार होणारा माल जर कवडीमोल भावाने विकला जात असेल तर सध्या उत्पादन होणारा शेतमाल व सिंचनाचे क्षेत्र वाढल्यावर अधिकचा उत्पादित शेतमाल असे भरमसाट उत्पादन झाल्यावर भविष्यात शेतकऱ्यांचे काय होईल, याची चिंता सर्वसामान्य शेतकरीवगार्ला पडली आहे. शासन हमी भावावर चकार शब्द काढत नाही. फक्त उत्पादन क्षेत्र वाढवण्यावर शासन भर देत असल्याची चिंता शेतकरीवर्गाला सतावत आहे. बाजारात शेतमालाचे दर वाढायला सुरुवात झाली, की शेतकरीवर्ग आनंदी होतो. आता शेतमालाचे चांगले चार पैसे हातात येतील व मी कर्जमुक्त होईन, अशी परिस्थिति निर्माण झाली की शासन लगेच त्याला पायबंद घालते. त्यामुळे शेतकरी अधिकच कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. शेतकऱ्याला आता कोणीच वाली नाही अशी शेतकरीवर्गाची भावना आहे.