शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

कपातीतही होतोय पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: March 17, 2016 03:16 IST

शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या

भोसरी : शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या सहा जलतरण तलावांवर दररोज साठ हजार लिटरच्या आसपास पाणी लागत आहे. ऐन पाणीकपातीच्या धोरणावर पोहणाऱ्यांच्या हौशीपायी पाण्याचा अपव्यय होत आहे.शहरात १५ टक्के पाणीकपात आयुक्तांनी जाहीर केली आहे. शहरात एकूण १० तलाव आहेत. त्यातील नेहरुनगरचा जलतरण तलाव बंद आहे. तर थेरगाव येथील जलतरण तलावाचे काम सुरू आहे. असे एकूण आठ जलतरण तलाव सध्या सुरू आहेत. भोसरी, थेरगाव, यमुनानगर, निगडी, मोहननगर, केशवनगर, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी या भागातील जलतरण तलावात पोहणाऱ्यांची गर्दीत वाढ होत आहे. प्रत्येक जलतरण तलावावर साधारणत: बॅक वॉशसाठी आठवड्यातून एकदा कमीत कमी एक ते दोन हजार लिटर पाणी लागते. सर्व जलतरण तलावांवर बॅक वॉशसाठी १५ ते २० हजार लिटर पाणी लागत आहे. सहा जलतरण तलावांवर बोअरवेलच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. जलतरण तलावाचे शॉवरदेखील बोअरवेलच्या पाण्यावरच आहेत. उन्हाळ्यात नागरिक शॉवर्सचा जास्त वापर करतात. जलतरण तलावाचे पाणी या दिवसांमध्ये जास्त खराब होते असल्याने पाण्याचा जास्त वापर होत आहे.आठवड्यातून एकदा जलतरण तलावांचे पाणी फि ल्टर करावे लागते. यासाठी जलतरण तलावांना डक्ट बसविलेले आहेत. जलतरण तलाव वॉश केल्यानंतर सर्व घाण डक्टमधून बाहेर पडते. यासाठी तलाव बॅक वॉश करावा लागतो. साधारणत: काही ठिकाणी बॅक वॉशचे पाणी रीसायकल होते. मात्र पाणी रीसायकल करण्याची पद्धत सर्व तलावांवर अवलंबली जात नाही. त्यामुळे बॅक वॉश करतानाही पाण्याचा अपव्यय होत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जलतरण तलावांवर एका बॅचला ८० ते १०० नागरिक पोहण्यासाठी येत आहेत. तलावांवर पोहण्यासाठी गर्दी होत आहे. काही जलतरण तलावांवर तर नागरिकांना प्रवेश देण्यास कठीणाई निर्माण होत आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड ग्रामीणसह काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पाणीसाठा कमी राहिल्याने दीड महिना जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. सध्या मात्र सर्वसाधारण सभा व स्थायी सभेत तसा निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशासनही अद्यापपर्यंत संभ्रमात आहेत. पुरेसा पिण्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र, साठा संपण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झाला आहे. जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा एवढा गैरवापर का, असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा आहे.अद्यापपर्यंत जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, पाण्याची कमतरता जाणवल्यास जलतरण तलाव बंद केले जातील. तशी चर्चा सुरू आहे. अद्याप तसा ठराव सर्वसाधारण सभेत झालेला नाही. तशी चौकशी करून हा निर्णय घेण्यात येईल. - दतात्रय फुंदे, सहायक आयुक्त