शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

कपातीतही होतोय पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: March 17, 2016 03:16 IST

शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या

भोसरी : शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या सहा जलतरण तलावांवर दररोज साठ हजार लिटरच्या आसपास पाणी लागत आहे. ऐन पाणीकपातीच्या धोरणावर पोहणाऱ्यांच्या हौशीपायी पाण्याचा अपव्यय होत आहे.शहरात १५ टक्के पाणीकपात आयुक्तांनी जाहीर केली आहे. शहरात एकूण १० तलाव आहेत. त्यातील नेहरुनगरचा जलतरण तलाव बंद आहे. तर थेरगाव येथील जलतरण तलावाचे काम सुरू आहे. असे एकूण आठ जलतरण तलाव सध्या सुरू आहेत. भोसरी, थेरगाव, यमुनानगर, निगडी, मोहननगर, केशवनगर, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी या भागातील जलतरण तलावात पोहणाऱ्यांची गर्दीत वाढ होत आहे. प्रत्येक जलतरण तलावावर साधारणत: बॅक वॉशसाठी आठवड्यातून एकदा कमीत कमी एक ते दोन हजार लिटर पाणी लागते. सर्व जलतरण तलावांवर बॅक वॉशसाठी १५ ते २० हजार लिटर पाणी लागत आहे. सहा जलतरण तलावांवर बोअरवेलच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. जलतरण तलावाचे शॉवरदेखील बोअरवेलच्या पाण्यावरच आहेत. उन्हाळ्यात नागरिक शॉवर्सचा जास्त वापर करतात. जलतरण तलावाचे पाणी या दिवसांमध्ये जास्त खराब होते असल्याने पाण्याचा जास्त वापर होत आहे.आठवड्यातून एकदा जलतरण तलावांचे पाणी फि ल्टर करावे लागते. यासाठी जलतरण तलावांना डक्ट बसविलेले आहेत. जलतरण तलाव वॉश केल्यानंतर सर्व घाण डक्टमधून बाहेर पडते. यासाठी तलाव बॅक वॉश करावा लागतो. साधारणत: काही ठिकाणी बॅक वॉशचे पाणी रीसायकल होते. मात्र पाणी रीसायकल करण्याची पद्धत सर्व तलावांवर अवलंबली जात नाही. त्यामुळे बॅक वॉश करतानाही पाण्याचा अपव्यय होत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जलतरण तलावांवर एका बॅचला ८० ते १०० नागरिक पोहण्यासाठी येत आहेत. तलावांवर पोहण्यासाठी गर्दी होत आहे. काही जलतरण तलावांवर तर नागरिकांना प्रवेश देण्यास कठीणाई निर्माण होत आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड ग्रामीणसह काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पाणीसाठा कमी राहिल्याने दीड महिना जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. सध्या मात्र सर्वसाधारण सभा व स्थायी सभेत तसा निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशासनही अद्यापपर्यंत संभ्रमात आहेत. पुरेसा पिण्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र, साठा संपण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झाला आहे. जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा एवढा गैरवापर का, असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा आहे.अद्यापपर्यंत जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, पाण्याची कमतरता जाणवल्यास जलतरण तलाव बंद केले जातील. तशी चर्चा सुरू आहे. अद्याप तसा ठराव सर्वसाधारण सभेत झालेला नाही. तशी चौकशी करून हा निर्णय घेण्यात येईल. - दतात्रय फुंदे, सहायक आयुक्त