शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

कपातीतही होतोय पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: March 17, 2016 03:16 IST

शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या

भोसरी : शहरात पाणीकपात असताना जलतरण तलाव मात्र जोमात सुरू आहेत. दररोज जलतरण तलावाला साधारणत: पिण्याचे २५ ते ३० हजार लिटर पाणी लागत आहे. तर बोअरवेलच्या सहा जलतरण तलावांवर दररोज साठ हजार लिटरच्या आसपास पाणी लागत आहे. ऐन पाणीकपातीच्या धोरणावर पोहणाऱ्यांच्या हौशीपायी पाण्याचा अपव्यय होत आहे.शहरात १५ टक्के पाणीकपात आयुक्तांनी जाहीर केली आहे. शहरात एकूण १० तलाव आहेत. त्यातील नेहरुनगरचा जलतरण तलाव बंद आहे. तर थेरगाव येथील जलतरण तलावाचे काम सुरू आहे. असे एकूण आठ जलतरण तलाव सध्या सुरू आहेत. भोसरी, थेरगाव, यमुनानगर, निगडी, मोहननगर, केशवनगर, सांगवी, पिंपळे गुरव, कासारवाडी या भागातील जलतरण तलावात पोहणाऱ्यांची गर्दीत वाढ होत आहे. प्रत्येक जलतरण तलावावर साधारणत: बॅक वॉशसाठी आठवड्यातून एकदा कमीत कमी एक ते दोन हजार लिटर पाणी लागते. सर्व जलतरण तलावांवर बॅक वॉशसाठी १५ ते २० हजार लिटर पाणी लागत आहे. सहा जलतरण तलावांवर बोअरवेलच्या पाण्याचा पाणीपुरवठा होत आहे. जलतरण तलावाचे शॉवरदेखील बोअरवेलच्या पाण्यावरच आहेत. उन्हाळ्यात नागरिक शॉवर्सचा जास्त वापर करतात. जलतरण तलावाचे पाणी या दिवसांमध्ये जास्त खराब होते असल्याने पाण्याचा जास्त वापर होत आहे.आठवड्यातून एकदा जलतरण तलावांचे पाणी फि ल्टर करावे लागते. यासाठी जलतरण तलावांना डक्ट बसविलेले आहेत. जलतरण तलाव वॉश केल्यानंतर सर्व घाण डक्टमधून बाहेर पडते. यासाठी तलाव बॅक वॉश करावा लागतो. साधारणत: काही ठिकाणी बॅक वॉशचे पाणी रीसायकल होते. मात्र पाणी रीसायकल करण्याची पद्धत सर्व तलावांवर अवलंबली जात नाही. त्यामुळे बॅक वॉश करतानाही पाण्याचा अपव्यय होत आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जलतरण तलावांवर एका बॅचला ८० ते १०० नागरिक पोहण्यासाठी येत आहेत. तलावांवर पोहण्यासाठी गर्दी होत आहे. काही जलतरण तलावांवर तर नागरिकांना प्रवेश देण्यास कठीणाई निर्माण होत आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवड ग्रामीणसह काही भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे.(वार्ताहर)गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात पाणीसाठा कमी राहिल्याने दीड महिना जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. सध्या मात्र सर्वसाधारण सभा व स्थायी सभेत तसा निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्रशासनही अद्यापपर्यंत संभ्रमात आहेत. पुरेसा पिण्याचा साठा उपलब्ध आहे. मात्र, साठा संपण्याची वाट प्रशासन पाहत आहे काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना निर्माण झाला आहे. जलतरण तलावांसाठी पिण्याच्या पाण्याचा एवढा गैरवापर का, असा प्रश्न सामान्य नागरिकांसमोर उभा आहे.अद्यापपर्यंत जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय झालेला नाही. सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा आहे. मात्र, पाण्याची कमतरता जाणवल्यास जलतरण तलाव बंद केले जातील. तशी चर्चा सुरू आहे. अद्याप तसा ठराव सर्वसाधारण सभेत झालेला नाही. तशी चौकशी करून हा निर्णय घेण्यात येईल. - दतात्रय फुंदे, सहायक आयुक्त