शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर विभागाचा वॉच

By admin | Updated: October 17, 2015 01:01 IST

एकेकाळी जुन्या दुचाकीवर फिरणारे भुरटे भाईगिरी करू लागल्यापासून आलिशान वाहने वापरताना दिसून येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून अंडरवर्ल्डला हप्ता जातो

पिंपरी : एकेकाळी जुन्या दुचाकीवर फिरणारे भुरटे भाईगिरी करू लागल्यापासून आलिशान वाहने वापरताना दिसून येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून अंडरवर्ल्डला हप्ता जातो, हे खळबळजनक वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) विभागाची या भागाकडे करडी नजर असून, कोणीतरी गळाला लागण्याची शक्यता आहे. शहरात आलिशान मोटारीतून फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आलिशान वाहनांमधून फिरणाऱ्यांमध्ये केवळ उद्योजक नव्हे, तर लँड माफिया, जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल, भाई असे लोक आहेत. आलिशान मोटारी वापरणाऱ्यांमध्ये उद्योजकांपेक्षा इतरांचे प्रमाण या शहरात मोठे आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अनेकांनी सुमारे दोन हजार कोटींचा प्राप्तिकर थकवल्याचे उघडकीस आले आहे. प्राप्तिकर विभागाने त्यातील बहुतेकांना नोटीस पाठविल्या आहेत. या नोटीस पाठविल्यानंतर गुन्हेगारीजगतात खळबळ उडाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील लोकांना नोटीस पोहोचल्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतील, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. संपत्तीचे खुलेआम प्रदर्शन करणारे शहरातील महाभाग प्राप्तिकर विभागाच्या जाळयात का अडकत नाहीत, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. प्राप्तिकर विभागाला थकीत वसुलीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा नव्याने प्राप्तिकर भरणारे अनेकजण सापडतील, अशी परिस्थिती शहरात आहे. (प्रतिनिधी)प्राप्तिकर विभागाने ज्यांना नोटीस पाठविल्या त्यांच्यापैकी ३० हून अधिक लोकांचा पत्ता नाही. ज्या पत्त्यावर नोटीस पाठवल्या, त्या ठिकाणी ते लोक राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नावाला उद्योजक प्रत्यक्षात दुसऱ्याच धंद्यात सक्रिय अशा लोकांपर्यंत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोहोचतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. या शहरात हातातील पाचही बोटांत सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात मोठे गोफ, हातात ब्रेसलेट अशा आभूषणांचे प्रदर्शन घडविणाऱ्यांकडे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेले, तर प्राप्तिकर विभागाच्या महसुलात निश्चित वाढ होईल. शिवाय असे ओंगळवाणे प्रदर्शन रोखले जाईल. सावकारी दुर्लक्षितव्याजाने पैसे द्यायचे, मनमानी पद्धतीने वसूल करायचे, असा व्याजाने पैसे देणाऱ्यांचा धंदा तेजीत आहे. कोणत्याही प्रकारचा सावकारी व्यवसायाचा, व्याजाने पैसे देण्याचा परवाना नसलेले अनेक जण आहेत. ते ज्यांना कर्ज स्वरूपात व्याजाने पैसे देतात, त्यांची पिळवणूक करतात. त्यांच्याकडून आगाऊ धनादेश घेऊन ठेवतात. व्याजाने पैसे देऊन मनमानी पद्धतीने वसूली करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली आहे. असे अनेक जण प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिले आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.