शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

प्राप्तिकर विभागाचा वॉच

By admin | Updated: October 17, 2015 01:01 IST

एकेकाळी जुन्या दुचाकीवर फिरणारे भुरटे भाईगिरी करू लागल्यापासून आलिशान वाहने वापरताना दिसून येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून अंडरवर्ल्डला हप्ता जातो

पिंपरी : एकेकाळी जुन्या दुचाकीवर फिरणारे भुरटे भाईगिरी करू लागल्यापासून आलिशान वाहने वापरताना दिसून येत आहेत. पिंपरी-चिंचवडमधून अंडरवर्ल्डला हप्ता जातो, हे खळबळजनक वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) विभागाची या भागाकडे करडी नजर असून, कोणीतरी गळाला लागण्याची शक्यता आहे. शहरात आलिशान मोटारीतून फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आलिशान वाहनांमधून फिरणाऱ्यांमध्ये केवळ उद्योजक नव्हे, तर लँड माफिया, जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल, भाई असे लोक आहेत. आलिशान मोटारी वापरणाऱ्यांमध्ये उद्योजकांपेक्षा इतरांचे प्रमाण या शहरात मोठे आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अनेकांनी सुमारे दोन हजार कोटींचा प्राप्तिकर थकवल्याचे उघडकीस आले आहे. प्राप्तिकर विभागाने त्यातील बहुतेकांना नोटीस पाठविल्या आहेत. या नोटीस पाठविल्यानंतर गुन्हेगारीजगतात खळबळ उडाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील लोकांना नोटीस पोहोचल्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतील, अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. संपत्तीचे खुलेआम प्रदर्शन करणारे शहरातील महाभाग प्राप्तिकर विभागाच्या जाळयात का अडकत नाहीत, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. प्राप्तिकर विभागाला थकीत वसुलीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा नव्याने प्राप्तिकर भरणारे अनेकजण सापडतील, अशी परिस्थिती शहरात आहे. (प्रतिनिधी)प्राप्तिकर विभागाने ज्यांना नोटीस पाठविल्या त्यांच्यापैकी ३० हून अधिक लोकांचा पत्ता नाही. ज्या पत्त्यावर नोटीस पाठवल्या, त्या ठिकाणी ते लोक राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. नावाला उद्योजक प्रत्यक्षात दुसऱ्याच धंद्यात सक्रिय अशा लोकांपर्यंत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी पोहोचतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे. या शहरात हातातील पाचही बोटांत सोन्याच्या अंगठ्या, गळ्यात मोठे गोफ, हातात ब्रेसलेट अशा आभूषणांचे प्रदर्शन घडविणाऱ्यांकडे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष गेले, तर प्राप्तिकर विभागाच्या महसुलात निश्चित वाढ होईल. शिवाय असे ओंगळवाणे प्रदर्शन रोखले जाईल. सावकारी दुर्लक्षितव्याजाने पैसे द्यायचे, मनमानी पद्धतीने वसूल करायचे, असा व्याजाने पैसे देणाऱ्यांचा धंदा तेजीत आहे. कोणत्याही प्रकारचा सावकारी व्यवसायाचा, व्याजाने पैसे देण्याचा परवाना नसलेले अनेक जण आहेत. ते ज्यांना कर्ज स्वरूपात व्याजाने पैसे देतात, त्यांची पिळवणूक करतात. त्यांच्याकडून आगाऊ धनादेश घेऊन ठेवतात. व्याजाने पैसे देऊन मनमानी पद्धतीने वसूली करणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली आहे. असे अनेक जण प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित राहिले आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.