शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

तरण तलावातून लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 4, 2017 02:38 IST

पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून (दि. २) शहरात २५ टक्के पाणीकपात करून दिवसाआड

भोसरी : पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून (दि. २) शहरात २५ टक्के पाणीकपात करून दिवसाआड पाणीपुरवठा देण्याचे महापालिकेने जाहीर केले. पण सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या प्रशासनाकडून मात्र शहरातील १२ तरण तलावांवर पाण्याची अक्षरश: उधळपट्टी चालली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या या प्रकाराबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे ४१० लाख लिटर पाण्याची गरज आहे. पवना धरणातील अपुरा जलसाठा पाहता ती पूर्ण करणे अशक्य असल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व जलतरण तलावांत कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा होतो, असे जरी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सर्वच तलावांवर महापालिकेचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येते. कारण अनेक ठिकाणच्या कूपनलिका बंद आहेत, तर काही ठिकाणी कूपनलिका कार्यान्वित असूनही त्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणे ठेकेदारांना परवडत नसल्याने सर्रास महापालिकेच्या पिण्यायोग्य पाण्याचाच वापर केला जात असल्याचे दिसून येते. तसेच शॉवरसाठीही दररोज १० हजार लिटर पाण्याचा अपव्यय एका तलावात होत असल्याचे चित्र आहे. भोसरी येथील तलावावर दररोज ८ बॅचमध्ये सुमारे १००० नागरिक जलतरणाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत असतात. येथे महिला व पुरुषांसाठी एकूण २० शॉवरची व्यवस्था आहे. पोहण्यापूर्वी व पोहल्यानंतर शॉवर घेण्यासाठीचे पाणीही महापालिकेचेच असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील सर्वच शॉवरच्या जाळ्या गायब झालेल्या असून पाण्याची गळती चालूच असते. महापालिकेचे पाणी बर्फ बनवणाऱ्या कंपन्या तसेच इतर रासायनिक कंपन्यांना दिले जाते. बाटलीबंद पाणी कारखाने व जार बॉटलमार्फत दररोज लाखो लिटर पाणी शहराबाहेर पाठवले जात असल्याने शहरवासीयांच्या हक्काचे पाणी पळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत अशा व्यवसायांवरही पाणी वापराबाबत बंधन घालणे गरजेचे असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)दुर्लक्ष : पाण्याचा पुनर्वापर फक्त कागदावर महापालिकेची उद्याने व जलतरण तलावांत पाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पुनर्वापर यंत्रणा ठेकेदारांना बंधनकारक असूनही तिचा वापर टाळला जात असल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येते. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.