शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तरण तलावातून लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 4, 2017 02:38 IST

पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून (दि. २) शहरात २५ टक्के पाणीकपात करून दिवसाआड

भोसरी : पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून (दि. २) शहरात २५ टक्के पाणीकपात करून दिवसाआड पाणीपुरवठा देण्याचे महापालिकेने जाहीर केले. पण सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या प्रशासनाकडून मात्र शहरातील १२ तरण तलावांवर पाण्याची अक्षरश: उधळपट्टी चालली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या या प्रकाराबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे ४१० लाख लिटर पाण्याची गरज आहे. पवना धरणातील अपुरा जलसाठा पाहता ती पूर्ण करणे अशक्य असल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व जलतरण तलावांत कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा होतो, असे जरी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सर्वच तलावांवर महापालिकेचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येते. कारण अनेक ठिकाणच्या कूपनलिका बंद आहेत, तर काही ठिकाणी कूपनलिका कार्यान्वित असूनही त्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणे ठेकेदारांना परवडत नसल्याने सर्रास महापालिकेच्या पिण्यायोग्य पाण्याचाच वापर केला जात असल्याचे दिसून येते. तसेच शॉवरसाठीही दररोज १० हजार लिटर पाण्याचा अपव्यय एका तलावात होत असल्याचे चित्र आहे. भोसरी येथील तलावावर दररोज ८ बॅचमध्ये सुमारे १००० नागरिक जलतरणाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत असतात. येथे महिला व पुरुषांसाठी एकूण २० शॉवरची व्यवस्था आहे. पोहण्यापूर्वी व पोहल्यानंतर शॉवर घेण्यासाठीचे पाणीही महापालिकेचेच असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील सर्वच शॉवरच्या जाळ्या गायब झालेल्या असून पाण्याची गळती चालूच असते. महापालिकेचे पाणी बर्फ बनवणाऱ्या कंपन्या तसेच इतर रासायनिक कंपन्यांना दिले जाते. बाटलीबंद पाणी कारखाने व जार बॉटलमार्फत दररोज लाखो लिटर पाणी शहराबाहेर पाठवले जात असल्याने शहरवासीयांच्या हक्काचे पाणी पळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत अशा व्यवसायांवरही पाणी वापराबाबत बंधन घालणे गरजेचे असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)दुर्लक्ष : पाण्याचा पुनर्वापर फक्त कागदावर महापालिकेची उद्याने व जलतरण तलावांत पाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पुनर्वापर यंत्रणा ठेकेदारांना बंधनकारक असूनही तिचा वापर टाळला जात असल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येते. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.