शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांची वाट अद्यापही बिकटच

By admin | Updated: May 11, 2017 04:27 IST

आळंदी-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालले आहे. त्यामुळे याही वर्षी वारकरी बांधवांची पंढरीची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : आळंदी-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालले आहे. त्यामुळे याही वर्षी वारकरी बांधवांची पंढरीची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे. देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर अशा ५०० किलोमीटर पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चऱ्होली-दिघी परिसरात अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरूही करण्यात आले नाही. त्यातच या रस्त्याच्या बांधकामात अनेक तांत्रिक व नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक त्रुटी असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यातच अर्ध्याहून अधिक रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने महिनाभरात देहू व आळंदीला पंढरपूर वारीसाठी जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. आळंदीपासून चऱ्होलीपर्यंत रस्ता रुंदीकरणास अद्याप सुरुवातही झाली नाही. चऱ्होली फाटा ते वडमुखवाडी या भागात रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; पण पदपथ व रस्ता दुभाजकाचे काम अपूर्ण आहे. साई मंदिर परिसरातील पदपथांचा राडारोडा अद्यापही हटवलेला नाही. ड्रेनेजची संरक्षक झाकणेही ठिकठिकाणी धोकादायरीत्या उघडी आहेत. मॅगझिन चौक ते दिघीपर्यंतचे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाचे पथदिवे व पदपथांचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे रुंदीकरणाची झाले आहे; पण दुभाजक रस्त्याच्या मधोमध मांडून ठेवले असल्याने अपघातांचा धोका संभवतो. एकंदरीत रस्ता रुंदीकरणाच्या कामात नियोजनाचा अभाव असून, सुसूत्रता नसल्यानेच कामास विलंब लागत आहे. महिनाभरात काम पूर्ण होणे निव्वळ अशक्य असल्याचे परिसरातील नागरिकांचे मत आहे. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाचे रुंदीकरण, सुशोभीकरण, तसेच वारकरी बांधवांसाठी निवास व्यवस्था, दोन्ही बाजूस स्वच्छतागृहे उभारण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास लाखो वारकरी बांधवांना सहन करावा लागणार आहे.संतसृष्टीचे कामही धीम्या गतीने विसावा पादुका चौकात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांच्या भेटीचे महाराष्ट्रातील सर्वांत भव्य समूहशिल्प साकारले जात आहे. त्याच्या पहिल्या फेजमधील चबुतऱ्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या मुख्य शिल्पासमवेत संत सोपानदेव, निवृत्तिनाथ, मुक्ताबाई आणि वारकरी असे एकूण २६ पुतळे या शिल्पात असणार आहेत; पण रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच या कामालाही दिरंगाई होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.