शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

वारकऱ्यांची वाट अद्यापही बिकटच

By admin | Updated: May 11, 2017 04:27 IST

आळंदी-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालले आहे. त्यामुळे याही वर्षी वारकरी बांधवांची पंढरीची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : आळंदी-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालले आहे. त्यामुळे याही वर्षी वारकरी बांधवांची पंढरीची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे. देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर अशा ५०० किलोमीटर पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चऱ्होली-दिघी परिसरात अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरूही करण्यात आले नाही. त्यातच या रस्त्याच्या बांधकामात अनेक तांत्रिक व नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक त्रुटी असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यातच अर्ध्याहून अधिक रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने महिनाभरात देहू व आळंदीला पंढरपूर वारीसाठी जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. आळंदीपासून चऱ्होलीपर्यंत रस्ता रुंदीकरणास अद्याप सुरुवातही झाली नाही. चऱ्होली फाटा ते वडमुखवाडी या भागात रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; पण पदपथ व रस्ता दुभाजकाचे काम अपूर्ण आहे. साई मंदिर परिसरातील पदपथांचा राडारोडा अद्यापही हटवलेला नाही. ड्रेनेजची संरक्षक झाकणेही ठिकठिकाणी धोकादायरीत्या उघडी आहेत. मॅगझिन चौक ते दिघीपर्यंतचे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाचे पथदिवे व पदपथांचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे रुंदीकरणाची झाले आहे; पण दुभाजक रस्त्याच्या मधोमध मांडून ठेवले असल्याने अपघातांचा धोका संभवतो. एकंदरीत रस्ता रुंदीकरणाच्या कामात नियोजनाचा अभाव असून, सुसूत्रता नसल्यानेच कामास विलंब लागत आहे. महिनाभरात काम पूर्ण होणे निव्वळ अशक्य असल्याचे परिसरातील नागरिकांचे मत आहे. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाचे रुंदीकरण, सुशोभीकरण, तसेच वारकरी बांधवांसाठी निवास व्यवस्था, दोन्ही बाजूस स्वच्छतागृहे उभारण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास लाखो वारकरी बांधवांना सहन करावा लागणार आहे.संतसृष्टीचे कामही धीम्या गतीने विसावा पादुका चौकात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांच्या भेटीचे महाराष्ट्रातील सर्वांत भव्य समूहशिल्प साकारले जात आहे. त्याच्या पहिल्या फेजमधील चबुतऱ्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या मुख्य शिल्पासमवेत संत सोपानदेव, निवृत्तिनाथ, मुक्ताबाई आणि वारकरी असे एकूण २६ पुतळे या शिल्पात असणार आहेत; पण रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच या कामालाही दिरंगाई होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.