शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

वारकऱ्यांची वाट अद्यापही बिकटच

By admin | Updated: May 11, 2017 04:27 IST

आळंदी-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालले आहे. त्यामुळे याही वर्षी वारकरी बांधवांची पंढरीची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : आळंदी-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने चालले आहे. त्यामुळे याही वर्षी वारकरी बांधवांची पंढरीची वाट बिकटच असल्याचे दिसून येत आहे. देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर अशा ५०० किलोमीटर पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चऱ्होली-दिघी परिसरात अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरूही करण्यात आले नाही. त्यातच या रस्त्याच्या बांधकामात अनेक तांत्रिक व नैसर्गिकदृष्ट्या धोकादायक त्रुटी असल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यातच अर्ध्याहून अधिक रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने महिनाभरात देहू व आळंदीला पंढरपूर वारीसाठी जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसून येते आहे. आळंदीपासून चऱ्होलीपर्यंत रस्ता रुंदीकरणास अद्याप सुरुवातही झाली नाही. चऱ्होली फाटा ते वडमुखवाडी या भागात रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे; पण पदपथ व रस्ता दुभाजकाचे काम अपूर्ण आहे. साई मंदिर परिसरातील पदपथांचा राडारोडा अद्यापही हटवलेला नाही. ड्रेनेजची संरक्षक झाकणेही ठिकठिकाणी धोकादायरीत्या उघडी आहेत. मॅगझिन चौक ते दिघीपर्यंतचे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गाचे पथदिवे व पदपथांचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्याचे रुंदीकरणाची झाले आहे; पण दुभाजक रस्त्याच्या मधोमध मांडून ठेवले असल्याने अपघातांचा धोका संभवतो. एकंदरीत रस्ता रुंदीकरणाच्या कामात नियोजनाचा अभाव असून, सुसूत्रता नसल्यानेच कामास विलंब लागत आहे. महिनाभरात काम पूर्ण होणे निव्वळ अशक्य असल्याचे परिसरातील नागरिकांचे मत आहे. त्यामुळे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाचे रुंदीकरण, सुशोभीकरण, तसेच वारकरी बांधवांसाठी निवास व्यवस्था, दोन्ही बाजूस स्वच्छतागृहे उभारण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे दिसत आहे. त्याचा त्रास लाखो वारकरी बांधवांना सहन करावा लागणार आहे.संतसृष्टीचे कामही धीम्या गतीने विसावा पादुका चौकात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराजांच्या भेटीचे महाराष्ट्रातील सर्वांत भव्य समूहशिल्प साकारले जात आहे. त्याच्या पहिल्या फेजमधील चबुतऱ्याच्या कामाला नुकताच प्रारंभ झाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या मुख्य शिल्पासमवेत संत सोपानदेव, निवृत्तिनाथ, मुक्ताबाई आणि वारकरी असे एकूण २६ पुतळे या शिल्पात असणार आहेत; पण रस्ता रुंदीकरणाच्या कामासोबतच या कामालाही दिरंगाई होत असल्याने नागरिकांत नाराजी आहे.