शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

अतिजोखमीचे रुग्ण ठरतायेत बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:22 IST

स्वाइन फ्लू या आजाराने जुलै महिन्यापासून शहरात थैमान घातले आहे. त्याची तीव्रता अद्याप कमी झाली नाही.

- प्रकाश गायकर पिंपरी : स्वाइन फ्लू या आजाराने जुलै महिन्यापासून शहरात थैमान घातले आहे. त्याची तीव्रता अद्याप कमी झाली नाही. दिवसागणिक दोन ते तीन रुग्णांना या आजाराची लागण होत असून, मृतांची संख्याही वाढत आहे. या आजाराने आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांना अतिजोखमीचे इतर आजार असल्याचे समोर आले आहे. इतर आजारांमुळे प्रतिकार क्षमता कमी झाल्याने हे रुग्ण स्वाइन फ्लूचे बळी ठरत आहेत.स्वाइन फ्लूने जानेवारी महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत या आजाराची तीव्रता कमी झालेली पाहयला मिळाली. मात्र जुलैमध्ये अचानक डोके वर काढत या आजारांने तब्बल ३२ जणांचा बळी घेतला. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १७ रुग्णांना हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंड, कर्करोग, उच्च रक्तदाब यांसारखे अतिजोखमीचे आजार होते. तसेच दगावलेले रुग्ण व बाधित रुग्णांमध्ये ३० वर्ष वयोगटापासून पुढील संख्या अधिक आहे. २०१५ साली तब्बल ६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यानंतर २४ तासांत टॅमी फ्लूची गोळी घेणे आवश्यक आहे. या आजाराचा धोका ओळखून नागरिकांनी वेळेत उपचार घेण्याची आवश्यकता आहे. मात्र बहुतांश वेळा नागरिकांकडून उपचार घेण्यासाठी चालढकल केली जाते. परिणामी हा आजार बळावत जाऊन रुग्ण दगावल्याच्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत. नागरिक हा आजार बळावल्यानंतर उपचारास सुरुवात करतात. तोपर्यंत स्वाइन फ्लूच्या विषाणूंनी ‘ओव्हर स्टेज’ गाठलेली असते. अनेकवेळा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती करूनही नागरिकांकडून हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध असूनही नागरिकांनी वेळेत लस न घेतल्याने स्वाइन फ्लूचा आजार बळावला आहे. राज्यातील महापालिका स्वायत्त असल्याने पालिकांतर्गत क्षेत्रात आवश्यकतेनुसार टॅमी फ्लू लस पुरवण्यास शासनाने नकार दिला. परिणामी काही प्रमाणात लसीची कमतरता जाणवली. राज्य सरकारने केवळ एक हजार लस उपलब्ध करून दिली होती. महापालिकेने आतापर्यंत सुमारे तीस हजार लस खरेदी केली आहे.अतिजोखमीच्या रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लक्षणे आढळताच रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयात जाऊन तपासणी करावी.>स्वाइन फ्लू आजार आटोक्यात आणण्यासाठीआरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. आतापर्यंत दगावलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्ण इतर आजारांनी त्रस्त होते. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेतले पाहिजेत.- डॉ. लक्ष्मण गोफणे,समन्वयक, स्वाइन फ्लू विभागपिं. चिं. महापालिका