शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

अतिजोखमीचे रुग्ण ठरतायेत बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:22 IST

स्वाइन फ्लू या आजाराने जुलै महिन्यापासून शहरात थैमान घातले आहे. त्याची तीव्रता अद्याप कमी झाली नाही.

- प्रकाश गायकर पिंपरी : स्वाइन फ्लू या आजाराने जुलै महिन्यापासून शहरात थैमान घातले आहे. त्याची तीव्रता अद्याप कमी झाली नाही. दिवसागणिक दोन ते तीन रुग्णांना या आजाराची लागण होत असून, मृतांची संख्याही वाढत आहे. या आजाराने आतापर्यंत ३३ रुग्ण दगावले आहेत. स्वाइन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्णांना अतिजोखमीचे इतर आजार असल्याचे समोर आले आहे. इतर आजारांमुळे प्रतिकार क्षमता कमी झाल्याने हे रुग्ण स्वाइन फ्लूचे बळी ठरत आहेत.स्वाइन फ्लूने जानेवारी महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जून महिन्यापर्यंत या आजाराची तीव्रता कमी झालेली पाहयला मिळाली. मात्र जुलैमध्ये अचानक डोके वर काढत या आजारांने तब्बल ३२ जणांचा बळी घेतला. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १७ रुग्णांना हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंड, कर्करोग, उच्च रक्तदाब यांसारखे अतिजोखमीचे आजार होते. तसेच दगावलेले रुग्ण व बाधित रुग्णांमध्ये ३० वर्ष वयोगटापासून पुढील संख्या अधिक आहे. २०१५ साली तब्बल ६४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यानंतर २४ तासांत टॅमी फ्लूची गोळी घेणे आवश्यक आहे. या आजाराचा धोका ओळखून नागरिकांनी वेळेत उपचार घेण्याची आवश्यकता आहे. मात्र बहुतांश वेळा नागरिकांकडून उपचार घेण्यासाठी चालढकल केली जाते. परिणामी हा आजार बळावत जाऊन रुग्ण दगावल्याच्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत. नागरिक हा आजार बळावल्यानंतर उपचारास सुरुवात करतात. तोपर्यंत स्वाइन फ्लूच्या विषाणूंनी ‘ओव्हर स्टेज’ गाठलेली असते. अनेकवेळा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जनजागृती करूनही नागरिकांकडून हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध असूनही नागरिकांनी वेळेत लस न घेतल्याने स्वाइन फ्लूचा आजार बळावला आहे. राज्यातील महापालिका स्वायत्त असल्याने पालिकांतर्गत क्षेत्रात आवश्यकतेनुसार टॅमी फ्लू लस पुरवण्यास शासनाने नकार दिला. परिणामी काही प्रमाणात लसीची कमतरता जाणवली. राज्य सरकारने केवळ एक हजार लस उपलब्ध करून दिली होती. महापालिकेने आतापर्यंत सुमारे तीस हजार लस खरेदी केली आहे.अतिजोखमीच्या रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. लक्षणे आढळताच रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयात जाऊन तपासणी करावी.>स्वाइन फ्लू आजार आटोक्यात आणण्यासाठीआरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. आतापर्यंत दगावलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्ण इतर आजारांनी त्रस्त होते. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेतले पाहिजेत.- डॉ. लक्ष्मण गोफणे,समन्वयक, स्वाइन फ्लू विभागपिं. चिं. महापालिका