शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका व्हेंटिलेटरवर, सहा महिने उलटूनही नाही गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:47 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तांतरानंतर पाणी, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करू लागले आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तांतरानंतर पाणी, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन हे मूलभूत प्रश्नही गंभीर स्वरुप धारण करू लागले आहेत. त्यामुळे शिवसेनेसह विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने महापालिकेचा कारभार व्हेंटिलेटरवर असल्याची टीका केली आहे.महापालिकेतील सत्तातराला सहा महिने पूर्ण झाली. तरीही महापालिकेचा कारभार पारदर्शक व गतीमान झालेला नाही. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील व पालकमंत्री गिरीश बापट यांनीही महापालिकेच्या पदाधिका-यांवर बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली. तसेच, कारभारात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्टÑवादीच्या नगरसेवकांची महापालिकेत बैठक घेऊन चुकीच्या कारभारावर ताशेरे ओढले. आता राष्ट्रवादीकडून शहरात जन हाहाकार आंदोलन करण्यात येणार आहे.राष्ट्रवादीबरोबर आता शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही महापालिकेच्या कारभाराचे आॅपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महापालिकेचा कारभार व्हेंटिलेटरवर आहे, असा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. तरशास्ती करात माफी, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न माजी आमदार विलास लांडे यांनी उपस्थित केला आहे. तर योग्य वेळ आल्यानंतर प्रहार करू, असा इशारा विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दिला आहे.सत्ताधाºयांची हतबलताभाजपाच्या हाती एकहाती सत्ता देऊनही मूलभूत प्रश्न सुटण्याऐवजी आणखी तीव्र होऊ लागले आहेत. कचरा, पिण्याचे पाणी, वाढते साथीचे आजार, जलनिस्सारण आदी प्रश्नांनी गंभीर रूप धारण केले आहे. निविदाप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. मैला शुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नाहीत. सत्ताधाºयांचा प्रशासनावर वचक न राहिल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे.गत आठवड्यामध्ये आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी संयुक्त बैठक घेतली होती. त्यानंतर महापौर नितीन काळजे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी आयुक्तांसह सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात संथगतीने सुरू असणाºया कामांचा आढाव घेण्यात आला होता. आदेश देऊनही अधिकारी ऐकत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. सत्ताधाºयांनीही अधिकारी ऐकत नाही, अशी हतबलता व्यक्त केली आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये जुंपली आहे.मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयश१पिंपरी : महापालिका प्रशासनाने शहरातील आरोग्य, पाणी, घनकचºयाबाबत होणाºया प्रश्नांविषयी कबुली दिली असली, तरी नागरिकांना वेठीस धरण्याचे काम कोणी करीत असेल, तर ते चुकीचे आहे. विविध प्रश्नांवर तोडगा निघत नसल्याने महापालिका यंत्रणा मूलभूत समस्या सोडविण्यात अपयशी ठरत आहे. महापालिका व्हेंटिलेटरवर आहे, अशी टीका खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.२ महापालिकेतील विविध रखडलेल्या प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकाभवनात आयुक्तांबरोबर बैठक घेतली.या वेळी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, महिला आघाडी प्रमुख सुलभा उबाळे, नगरसेवक नीलेश बारणे, अश्विनी चिंचवडे, अमित गावडे आदी उपस्थित होते.३ खासदार बारणे म्हणाले, ‘‘मूलभूत सुविधा पुरविणे हे महापालिकेचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र, कचºयाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम ठप्प झाले आहे. केवळ कोणी कोर्टात गेले आहे, असे उत्तर देऊन भागणार नाही. पर्यायी उपाययोजना करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. रस्त्यांवर, चौकाचौकांत अतिक्रमण वाढत आहे. बाहेरच्या राज्यातून आलेल्या पथारीवाल्यांचा त्रास नागरिकांना होत आहे.४पिण्याचे पाणी कोणत्याही परिसरात पूर्ण दाबाने येत नाही. पवना धरण पूर्ण भरले असतानाही टंचाई कशी? साथीच्या आजारांचा विळखा पडला आहे. आरोग्य विभाग अकार्यक्षम असल्याचे दिसून येते. नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते. याकडेही दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या शाळांमध्येही स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. ’’राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप केले. गोबल्स नीतीचा अवलंब केला. साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून भाजपाने सत्ता मिळविली आहे. सहा महिने झाले. परंतु, राष्ट्रवादीवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करू शकले नाहीत. आता योग्य वेळ आली की, त्यांच्यावर प्रहार आहे, असे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड