शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

‘लग्नसराईला नोटाबंदीचे विघ्न’

By admin | Updated: December 24, 2016 00:27 IST

तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक,

कामशेत : तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक, साखरपुडा व लग्न असे विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईत कामशेत बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण शासनाने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाने लग्नकार्य असणारी कुटुंबे व त्याचबरोबर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. नोटबंदीच्या विळख्यात लग्नसराई अडकल्याने अनेकांची मोठी गोची झाली आहे. शासनाने जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून ४५ दिवस पूर्ण झाले असून, या निर्णयाने अनेक ठिकाणी मोठे परिणाम झाले आहेत. सर्वत्र चलनटंचाई निर्माण होऊन मंदीचे सावट आले आहे. सगळीकडे व्यावहारिक परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून, अनेकांच्या घरामध्ये लग्नकार्य निघाले असल्याने या कार्यासाठी लागणारा पैसा बँकांमधील खात्यात असूनही काढता येत नसल्याने अनेक वधू-वर पित्याची मोठी गोची झाली आहे. शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध नाहीत. जेथे पैसे उपलब्ध आहेत तेथे भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. शिवाय एका आठवड्यात २४ हजार रुपयेच काढण्याची मुभा असल्याने लग्नकार्यात लागणारा लाखो रुपयांचा खर्च कसा भागवायचा हा यक्ष प्रश्न अनेकांना पडला आहे. लग्नाची तारीख जवळ येत असल्याने वधू, वर पित्यांची रात्रीची झोप उडाली असल्याचे बोलले जाते. अनेकांनी आपल्या घरातील लग्नकार्ये उभे ढकलली आहेत. कार्यासाठी येणाऱ्या पै-पाहुण्यांसाठी, तसेच पूजा व इतर धार्मिक विधीसाठी किराणा बाजार भरायचा आहे. पण, पुरेसे पैसे नसल्याने ओळखीच्या व्यापाऱ्यांकडे काही जणांनी उधारीवर बाजार भरला आहे. काहींनी बाजाराचे बिल चेकद्वारे दिले आहे. याशिवाय देवादिकांचे कार्यक्रम, लग्नाचा बस्ता, मानपानाचे कपडे, नवरा-नवरीसाठी सोन्याचे अलंकार खरेदी, घराची रंगरंगोटी, कार्यालयाचे बुकिंग, घरासमोरील मंडप व्यवस्था, फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग, वधू-वरांचे कपडे, लग्नाचे रुखवत, वरातीसाठी डीजे-बेंजो-रथ-बग्गी, फटाके व आतिषबाजी, केटरिंग, जागरण-गोंधळ, सत्यनारायण पूजा व देवदर्शन आदी नानाविध कार्यक्रमासाठी मोठ्या रकमेची गरज असताना हे पैसे आणायचे कोठून या विचारात वधू-वर पिता पडले आहेत. बँकांमधून पुरेसे पैसे मिळत नाहीत. एटीएम सुविधा विस्कळीत, सावकारी ठप्प, उसनवारीसाठी कोणी तयार नाही. या सर्वांमुळे लग्नकार्य निर्विघ्न कसे पार पडणार याची चिंता वधू-वर कुटुंबांना सतावत आहे. विवाह कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक ग्राहक ‘शेठ पैसे नाहीत, घरात कार्य आहे, बँकांचे व्यवहार सुरळीत झाल्यावर सर्व बिल चुकते करतो’ अशी आर्जव करीत असल्याने उधारीचे व्यवहार वाढले आहेत. (वार्ताहर)