शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

‘लग्नसराईला नोटाबंदीचे विघ्न’

By admin | Updated: December 24, 2016 00:27 IST

तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक,

कामशेत : तुळशीचे लग्न झाल्यानंतर प्रामुख्याने लग्नकार्याला सुरुवात होत असून, मुलगा-मुलगी बघण्याचा कार्यक्रम, कुंकुमतिलक, साखरपुडा व लग्न असे विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईत कामशेत बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण शासनाने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाने लग्नकार्य असणारी कुटुंबे व त्याचबरोबर बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. नोटबंदीच्या विळख्यात लग्नसराई अडकल्याने अनेकांची मोठी गोची झाली आहे. शासनाने जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून ४५ दिवस पूर्ण झाले असून, या निर्णयाने अनेक ठिकाणी मोठे परिणाम झाले आहेत. सर्वत्र चलनटंचाई निर्माण होऊन मंदीचे सावट आले आहे. सगळीकडे व्यावहारिक परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच असून, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असून, अनेकांच्या घरामध्ये लग्नकार्य निघाले असल्याने या कार्यासाठी लागणारा पैसा बँकांमधील खात्यात असूनही काढता येत नसल्याने अनेक वधू-वर पित्याची मोठी गोची झाली आहे. शहरातील बहुतांश बँकांमध्ये पैसे उपलब्ध नाहीत. जेथे पैसे उपलब्ध आहेत तेथे भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. शिवाय एका आठवड्यात २४ हजार रुपयेच काढण्याची मुभा असल्याने लग्नकार्यात लागणारा लाखो रुपयांचा खर्च कसा भागवायचा हा यक्ष प्रश्न अनेकांना पडला आहे. लग्नाची तारीख जवळ येत असल्याने वधू, वर पित्यांची रात्रीची झोप उडाली असल्याचे बोलले जाते. अनेकांनी आपल्या घरातील लग्नकार्ये उभे ढकलली आहेत. कार्यासाठी येणाऱ्या पै-पाहुण्यांसाठी, तसेच पूजा व इतर धार्मिक विधीसाठी किराणा बाजार भरायचा आहे. पण, पुरेसे पैसे नसल्याने ओळखीच्या व्यापाऱ्यांकडे काही जणांनी उधारीवर बाजार भरला आहे. काहींनी बाजाराचे बिल चेकद्वारे दिले आहे. याशिवाय देवादिकांचे कार्यक्रम, लग्नाचा बस्ता, मानपानाचे कपडे, नवरा-नवरीसाठी सोन्याचे अलंकार खरेदी, घराची रंगरंगोटी, कार्यालयाचे बुकिंग, घरासमोरील मंडप व्यवस्था, फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग, वधू-वरांचे कपडे, लग्नाचे रुखवत, वरातीसाठी डीजे-बेंजो-रथ-बग्गी, फटाके व आतिषबाजी, केटरिंग, जागरण-गोंधळ, सत्यनारायण पूजा व देवदर्शन आदी नानाविध कार्यक्रमासाठी मोठ्या रकमेची गरज असताना हे पैसे आणायचे कोठून या विचारात वधू-वर पिता पडले आहेत. बँकांमधून पुरेसे पैसे मिळत नाहीत. एटीएम सुविधा विस्कळीत, सावकारी ठप्प, उसनवारीसाठी कोणी तयार नाही. या सर्वांमुळे लग्नकार्य निर्विघ्न कसे पार पडणार याची चिंता वधू-वर कुटुंबांना सतावत आहे. विवाह कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक ग्राहक ‘शेठ पैसे नाहीत, घरात कार्य आहे, बँकांचे व्यवहार सुरळीत झाल्यावर सर्व बिल चुकते करतो’ अशी आर्जव करीत असल्याने उधारीचे व्यवहार वाढले आहेत. (वार्ताहर)