शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी पूल वापराअभावी निरुपयोगी

By admin | Updated: January 24, 2017 01:57 IST

तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या वडगाव रेल्वे स्थानकाला शौचालय, रेल्वेफाटक आणि पार्किंग या प्रमुख तीन समस्यांनी ग्रासले

वडगाव मावळ : तालुक्याचे प्रमुख ठिकाण असलेल्या वडगाव रेल्वे स्थानकाला शौचालय, रेल्वेफाटक आणि पार्किंग या प्रमुख तीन समस्यांनी ग्रासले आहे. सुसज्ज अशा स्थानकावर इतर सर्व सोयी नागरिकांसाठी असून, प्रवाशांच्या हलगर्जीपणामुळे वापराअभावी स्थानकातील पादचारी पूल निरुपयोगी बनत चालला आहे.वडगावच्या उतरेकडील भागातील लोकांना वडगावमध्ये केशवनगर, राजपुरी, सांगावी, वारंगवाडी,कातवी आदी ठिकाणावरून रेल्वेलाइन ओलांडून रोज यावे लागते. अंदाजे २० हजार नागरिकांना जीव मुठीत घेऊन गेटमधून रेल्वेलाइन ओलांडावी लागते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात. विद्यार्थी, नोकरदार, दुग्ध व्यावसायिकांना या रेल्वे फाटकाचा नाहक त्रास होतो. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत. वडगाव हे इतर सर्व रेल्वे स्थानकाप्रमाणे नेहमी गजबजलेले असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये, महाविद्यालय, दवाखाने, न्यायालय असल्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची वर्दळ असते. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. वडगाव स्थानकाची प्रमुख समस्या म्हणजे या स्थानकात गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. गेल्या अनेक वर्षांपासून महिला रेल्वे कर्मचारीसाठी असणारे स्वच्छतागृह वापरात आहे. परंतु ते देखील ठरावीकच महिलांना माहिती असल्यामुळे इतर महिलांची या स्थानकावर कुचंबणा होते . आता नव्याने स्वच्छतागृह रेल्वेकडून बांधण्यास सुरुवात झाली असून, ते कामदेखील अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे स्थानकावर त्वरित स्वच्छतागृह बांधण्याची मागणी महिलांकडून होत आहे. स्थानकासाठी पार्किंग सुविधेचा अभाव जाणवतो. स्थानकाच्या बाहेर पार्किंग करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध आहे. परंतु या ठिकाणी पार्किंग देखभाल करण्यासाठी कर्मचारी किंवा कोणी खासगी व्यक्ती नसल्यामुळे प्रवासी कशीही वाहने लावून जातात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होताना दिसते. प्रवासी घाईघाईत वाहने प्रवेशद्वारासमोरच लावत असल्यामुळे प्रवाशांना अडथळा निर्माण होत आहे. मोफत पार्किंगमुळे न्यायालय, शासकीय कार्यालयात येणारे वाहने सर्रास येथे लावून जातात. अनेकदा ते वेळेत परत येत नाहीत. रेल्वे प्रवाशांच्या वाहनांसामोरच नागरिक वाहन लावून गेल्यामुळे अनेकदा प्रवासी आणि नागरिकांमध्ये बाचाबाची होते.