शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अनियोजनाने पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पूर्वसूचना न मिळाल्याने पिंपरी, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात असा दावा महापालिका करीत असली, तरी प्रत्यक्षातपणे दोन दिवस कपात होत आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला. जाहीर प्रकटनही न दिल्याने गेल्या आठवडाभरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिलांचे नियोजन विस्कटले आहे. जलउपसा केंद्रातील कामामुळे गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. मात्र, कोणत्या भागातील पाणी नाही, ही माहिती न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शुक्रवारी संभाजीनगर व शाहूनगर, यमुनानगर, रुपीनगर, जगताप डेअरी, तसेच कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, जुनी सांगवी व नवी सांगवीतील नायडू टाक्यांवरील सर्व भाग, नेहरूनगरातील गंगानगर, महेशनगर, डी. वाय़ पाटील कॉलेज परिसर, मोशी सेक्टर चार ते सहा, गंधर्वनगरी व खानदेशनगर, पेठ क्रमांक ७ व १० येथील निवासी भाग, चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुल, काळजेवाडी, कोतवालवाडी, पठारे मळा, बुर्डे वस्ती, चºहोली गावठाण या भागात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, यापैकी संत तुकारामनगर, नेहरूनगरातील काही भागात पाणी न आल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागली.आठवड्यातील दोन दिवस कपातीचा फटकाशहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आठवड्यातील एक दिवस पाणी कपातीचे धोरण अवलंबले आहे. मात्र गुरुवारी रावेत येथील जलउपसा केंद्रातील कामामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद केला होता. शनिवारी कृष्णानगर, शिवतेजनगर, घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर, किवळे व विकासनगर, मामुर्डी, पुनावळे रावेत गावठाण, वाकड इंदिरा कॉलेज, काळाखडक, पंडित पेट्रोलपंप, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, प्रेरणा शाळा, चिंतामणीनगरी, रेलविहार, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी, नागसेननगर, संत तुकारामनगर यशवंत चौक, वल्लभनगर, मोशीतील आदर्शनगर, संत तुकारामनगर या भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद होता.मात्र, याच भागात गुरुवारीही पाणीकपातीचा सामना करावा लागला. पिण्याचे पाणी आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली. मानसिक त्रास सहन करावा लागला. अनियोजनामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.