शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

अनियोजनाने पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पूर्वसूचना न मिळाल्याने पिंपरी, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात असा दावा महापालिका करीत असली, तरी प्रत्यक्षातपणे दोन दिवस कपात होत आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला. जाहीर प्रकटनही न दिल्याने गेल्या आठवडाभरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिलांचे नियोजन विस्कटले आहे. जलउपसा केंद्रातील कामामुळे गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. मात्र, कोणत्या भागातील पाणी नाही, ही माहिती न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शुक्रवारी संभाजीनगर व शाहूनगर, यमुनानगर, रुपीनगर, जगताप डेअरी, तसेच कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, जुनी सांगवी व नवी सांगवीतील नायडू टाक्यांवरील सर्व भाग, नेहरूनगरातील गंगानगर, महेशनगर, डी. वाय़ पाटील कॉलेज परिसर, मोशी सेक्टर चार ते सहा, गंधर्वनगरी व खानदेशनगर, पेठ क्रमांक ७ व १० येथील निवासी भाग, चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुल, काळजेवाडी, कोतवालवाडी, पठारे मळा, बुर्डे वस्ती, चºहोली गावठाण या भागात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, यापैकी संत तुकारामनगर, नेहरूनगरातील काही भागात पाणी न आल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागली.आठवड्यातील दोन दिवस कपातीचा फटकाशहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आठवड्यातील एक दिवस पाणी कपातीचे धोरण अवलंबले आहे. मात्र गुरुवारी रावेत येथील जलउपसा केंद्रातील कामामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद केला होता. शनिवारी कृष्णानगर, शिवतेजनगर, घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर, किवळे व विकासनगर, मामुर्डी, पुनावळे रावेत गावठाण, वाकड इंदिरा कॉलेज, काळाखडक, पंडित पेट्रोलपंप, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, प्रेरणा शाळा, चिंतामणीनगरी, रेलविहार, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी, नागसेननगर, संत तुकारामनगर यशवंत चौक, वल्लभनगर, मोशीतील आदर्शनगर, संत तुकारामनगर या भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद होता.मात्र, याच भागात गुरुवारीही पाणीकपातीचा सामना करावा लागला. पिण्याचे पाणी आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली. मानसिक त्रास सहन करावा लागला. अनियोजनामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.