शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

अनियोजनाने पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पूर्वसूचना न मिळाल्याने पिंपरी, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात असा दावा महापालिका करीत असली, तरी प्रत्यक्षातपणे दोन दिवस कपात होत आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला. जाहीर प्रकटनही न दिल्याने गेल्या आठवडाभरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिलांचे नियोजन विस्कटले आहे. जलउपसा केंद्रातील कामामुळे गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. मात्र, कोणत्या भागातील पाणी नाही, ही माहिती न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शुक्रवारी संभाजीनगर व शाहूनगर, यमुनानगर, रुपीनगर, जगताप डेअरी, तसेच कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, जुनी सांगवी व नवी सांगवीतील नायडू टाक्यांवरील सर्व भाग, नेहरूनगरातील गंगानगर, महेशनगर, डी. वाय़ पाटील कॉलेज परिसर, मोशी सेक्टर चार ते सहा, गंधर्वनगरी व खानदेशनगर, पेठ क्रमांक ७ व १० येथील निवासी भाग, चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुल, काळजेवाडी, कोतवालवाडी, पठारे मळा, बुर्डे वस्ती, चºहोली गावठाण या भागात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, यापैकी संत तुकारामनगर, नेहरूनगरातील काही भागात पाणी न आल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागली.आठवड्यातील दोन दिवस कपातीचा फटकाशहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आठवड्यातील एक दिवस पाणी कपातीचे धोरण अवलंबले आहे. मात्र गुरुवारी रावेत येथील जलउपसा केंद्रातील कामामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद केला होता. शनिवारी कृष्णानगर, शिवतेजनगर, घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर, किवळे व विकासनगर, मामुर्डी, पुनावळे रावेत गावठाण, वाकड इंदिरा कॉलेज, काळाखडक, पंडित पेट्रोलपंप, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, प्रेरणा शाळा, चिंतामणीनगरी, रेलविहार, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी, नागसेननगर, संत तुकारामनगर यशवंत चौक, वल्लभनगर, मोशीतील आदर्शनगर, संत तुकारामनगर या भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद होता.मात्र, याच भागात गुरुवारीही पाणीकपातीचा सामना करावा लागला. पिण्याचे पाणी आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली. मानसिक त्रास सहन करावा लागला. अनियोजनामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.