शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

अनियोजनाने पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 01:25 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नागरिकांना पूर्वसूचना न मिळाल्याने पिंपरी, नेहरूनगर, खराळवाडी, कासारवाडी, संत तुकारामनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात असा दावा महापालिका करीत असली, तरी प्रत्यक्षातपणे दोन दिवस कपात होत आहे.कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घेतला. जाहीर प्रकटनही न दिल्याने गेल्या आठवडाभरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महिलांचे नियोजन विस्कटले आहे. जलउपसा केंद्रातील कामामुळे गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले होते. मात्र, कोणत्या भागातील पाणी नाही, ही माहिती न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. शुक्रवारी संभाजीनगर व शाहूनगर, यमुनानगर, रुपीनगर, जगताप डेअरी, तसेच कस्पटेवस्ती, विशालनगर, पिंपळे निलख गावठाण, जुनी सांगवी व नवी सांगवीतील नायडू टाक्यांवरील सर्व भाग, नेहरूनगरातील गंगानगर, महेशनगर, डी. वाय़ पाटील कॉलेज परिसर, मोशी सेक्टर चार ते सहा, गंधर्वनगरी व खानदेशनगर, पेठ क्रमांक ७ व १० येथील निवासी भाग, चºहोली येथील डॉ. डी. वाय. पाटील संकुल, काळजेवाडी, कोतवालवाडी, पठारे मळा, बुर्डे वस्ती, चºहोली गावठाण या भागात पाणीपुरवठा होत असतो. मात्र, यापैकी संत तुकारामनगर, नेहरूनगरातील काही भागात पाणी न आल्याने पाण्यासाठी वणवण करावी लागली.आठवड्यातील दोन दिवस कपातीचा फटकाशहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आठवड्यातील एक दिवस पाणी कपातीचे धोरण अवलंबले आहे. मात्र गुरुवारी रावेत येथील जलउपसा केंद्रातील कामामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद केला होता. शनिवारी कृष्णानगर, शिवतेजनगर, घरकुल, पूर्णानगर, शरदनगर, अजंठानगर, किवळे व विकासनगर, मामुर्डी, पुनावळे रावेत गावठाण, वाकड इंदिरा कॉलेज, काळाखडक, पंडित पेट्रोलपंप, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, प्रेरणा शाळा, चिंतामणीनगरी, रेलविहार, चिंचवडेनगर, रजनीगंधा सोसायटी, नागसेननगर, संत तुकारामनगर यशवंत चौक, वल्लभनगर, मोशीतील आदर्शनगर, संत तुकारामनगर या भागात शनिवारी पाणीपुरवठा बंद होता.मात्र, याच भागात गुरुवारीही पाणीकपातीचा सामना करावा लागला. पिण्याचे पाणी आणण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली. मानसिक त्रास सहन करावा लागला. अनियोजनामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.