शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

अहिराणीसाठी हवी एकजूट

By admin | Updated: October 12, 2015 01:01 IST

अहिराणी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी खान्देशी बांधवांवर आहे. त्यासाठी एकजूट करण्याची गरज आहे. अहिराणी आपली माय आहे

पिंपरी : अहिराणी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी खान्देशी बांधवांवर आहे. त्यासाठी एकजूट करण्याची गरज आहे. अहिराणी आपली माय आहे, जे लोक अहिराणीला विसरतात, ते आईला विसरण्यासारखे आहे, असे मत निवृत्त पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य सांस्कृतिक कला क्रीडा मंचाच्या वतीने चिंचवड वाल्हेकरवाडीतील स्रेहसंमेलन, अहिराणी काव्यमैैफल कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर धुळ्याचे उपजिल्हाधिकारी भागवत सैंदाणे, अभिनेते पंढरीनाथ कांबळे, योगेश महाजन, दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते कैलास वाणी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब पिंगळे, साहित्यिक एम. के. भामरे, प्रकाश पाटील, बापूसाहेब हटकर, रवींद्र माळी, पंकज निकम, शिवदास जोंधळे, उद्योजक अशोक खिंवसरा, संयोजिका विजया मानमोडे, भाजपाचे सरचिटणीस नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, नितीन पाटील, संभाजी बारणे, सुरेश शिरोळे, रवी महाजन, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. धिवरे म्हणाले, ‘‘खान्देशात भेद नाही, असे आपण म्हणतो. मात्र, पश्चिम आणि पूर्व असा भेद आहे. अहिराणी ही कस्तुरी आहे. तिचे संवर्धन करण्याची गरज आहे. आज भाषा संवर्धनासाठी आणि शहरातील नागरिक एकत्रित येण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला. त्यामुळे मला वज्जी आनंद झाला आहे. आपण परदेशात गेलो की, देश भाषेचा अभिमान वाटतो. मात्र, आपण शहरात एकत्र आलो की, एकमेकांशी मराठीत बोलतो. मूळ विसरतो. शहरीकरणात खान्देशातील माणसे अहिराणीत बोलत नाहीत. कारण त्यांना अहिराणी येत नाही, हे वास्तव आहे. आपणच आपल्या भाषेला वाढवायला हवे. आज सर्वत्र खान्देशी माणसांनी प्रगती केली आहे. ही माणसे निरागस असतात. ही भाषा सरळ आहे. त्यामुळे एकजूट करणे गरजेचे आहे.’’भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत शिरोळे यांनी व्यक्त केले. तर भाषा वाढावी, यासाठी प्रयत्न करावेत, असे मत पिंगळे यांनी व्यक्त केले. प्रकाश पाटील यांनी भाषा संवर्धनाची जबाबदारी खान्देशी बांधवाचीच असल्याचे सांगितले. प्रास्ताविकात विजया मानमोडे म्हणाल्या, ‘‘अहिराणीच्या प्रेमापोटी विविध क्षेत्रांतील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. भाषा संवर्धनाची जबाबदारी आपली आहे. लिहिण्यात, वाचण्यात या भाषेचा वापर करायला हवा. आपण शहरात येऊन माय आणि मातीचे संस्कार विसरत चाललो आहोत, ही दुर्दैवाची बाब आहे. भाषेचे संवर्धन होण्यासाठी आजचा सोहळा आयोजित केला आहे.’’भटोलाल बागुल, शिवदास बागुल यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित मानमोडे, रोहित मानमोडे, रवींद्र महाजन, सुरेश मानमोडे, छाया भदाने, संध्या साळुंखे, वाल्मिक सोनवणे यांनी संयोजन केले. (प्रतिनिधी)